मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
खेळिया

भारुड - खेळिया

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९१६.
खेळिया नवल कैसे जाले रे । आपणासी आपण व्याले रे ॥ध्रु०॥
बाप ना माय आंगेचि होये । कर्णकुमारी पाहे रे । खेळिया ॥१॥
सदा बाळंतिणीपरी ते । आपण वांझचि होउनी राहे रे ॥२॥
वायोपोटी अगीन भाई रे । अगीनीपोटी पाणी रे ॥३॥
आंगड्याचे फेराडे म्हणाल झणी । जाणे अनुभवज्ञानी रे ॥४॥
कांही बोलिले नाही चालिले । वाईच आडळा आले रे ॥५॥
रामासी मिळतां रामचि जाले । कोडेंचि मोकळे केले रे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP