मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
कुठवर हा भव पुरे पुरे...

रामजोशी - कुठवर हा भव पुरे पुरे...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


कुठवर हा भव पुरे पुरेरे । नाहीं यांत किमपि सौख्यरे ।

सांगून चुकलों परंतु न तुझी खटपट सरे सरेरे ॥ध्रु०॥

ही तनु तुजला काय जिरे जिरेरे । हे विषय दिसती साजिरे ।

हे मदमस्त गजरथवाजि रे । आले असती अजी रे ।

सावध हो मनीं विचार न करिसे यांतील कांहीं तरी उरे उरे ॥१॥

जेथील धन तेथें विरेविरे । समजुत कधी व्हावी रे ।

अशी पुन: तनु यावीरे । काही विरक्ति चित्तीं धरावी रे ।

यासाठी ही वळख करुनि घे । बाबा जीव जेणें उधरे धरे ॥२॥

कामादिक रिपु खरे खरेरे । नच यास सलग राख रे ।

जाहले केश सकल वाख रे । कांहीं भजन सुधा चाख रे ॥

यासाठी कविराय म्हणतसे तार भवार्णव हरे हरे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP