मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मुक्तेश्वरांची कविता

मुक्तेश्वरांची कविता

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


म्हणे, ‘विधातिया मूर्खा । काय रेखिली कर्मरेखा ? ।
आम्हां ऐशा अभाग्यपुरुषां । काय म्हणोनि निर्मिलें ? ॥
कुंतिण्भोजाची नंदिनी । वसुदेवाची पवित्र भगिनी ।
राया पांडूची वीरपत्नी । स्नुषा विचित्रवीर्याची कांता ।
भूतळीं लोळे प्रेता ।  तुल्य दिसे मज द्दष्टीं ॥
सत्यशील पवित्र परम । पुण्यश्लोकांमाजी उत्तम ।
धर्मस्वरूप राजा धर्म । कर्म भोगी केवढें ? ॥
ज्याचिये उपमे त्रिजगतीं । भार्गवराम कीं दाशरथी ।
तो हा अर्जुन वीर क्षिती । लोके रंकासारिखा ॥
ज्यांचिया रूपा वेधोनि पुढती । देवांगना न लाविती पातीं ।
चातुर्या लाजोनि सरस्वती । पांडुरवर्ण विवर्णा ॥
ते हे माद्रीकुमर दोन्ही । अतिसकुमार सर्वगुणी ।
स्यमंत आणि कौस्तुभमणि । जेंवि कां धुळीनें लेपिले ॥
याहीपरतें थोर दु:ख । भोगिलें आणि भोगिती लोक ।
परी हें सर्वथा न घडे देख । एका पांडावांवेगळें ॥
वोश्ववनिता हो ! पवित्र । पोटीं प्रसवावा सभाग्यपुत्र ।
रूपविद्याबळपात्र । काज नाहीं ययाचें ॥
रूप विद्या बळ वरिष्ठ । त्या आम्हां पांडवां ऐसी वाट ।
इतर मानवांतें कष्ट । काय होती कळेना ॥
भाग्यरेखा नसतां भाळीं । वंध्या विद्याकळा सकळी ।
जैंसी प्राणेंवीण मोकळीं । काय करावीं इंद्रियें ? ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP