मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|अज्ञात शाहिर| यशस्वी झाले श्रीमंत पहिले... अज्ञात शाहिर चाल - “ लक्षुमि गर्वे निं... बुधीहाळ किला बाका ॥ दुरुन... त्रिंबकराव दाभाडे एका खडी बोला कशि गत झाली ... शाहूमहाराज शिव झाला । अवत... तुझे गुणमी वर्णू किती छत्... भाऊ नाना तलवार धरून । गेल... भाऊसारखा मोहरा । आम्हांवर... भाऊ नानाच दुःख ऐकतां ह्रद... धन्य भगवाना नेलास मोतीदाण... सांग रमाबाई सत्त्वधीर । र... दक्खनचा दिवा मालवला हिरा ... दुक्षिणचा दिवा मालऽऽऽवला ... सवाई माधवराव पेशवे सवाई च... शिपाई थाट रोहिले जाट गांठ... पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... जसा रंग श्रीरंग खेळले वृं... द्वापारीं श्रीमाधवविलास भ... १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० कमि नव्हते पृथ्वींत अवंतर... श्रीमंत बाजीराव प्रभुचें ... वाहवाजी मल्हार नाव केलें ... घनी छत्रपती शिवराज नेमले ... सकी आद करवीर तकत थोरजागा... करविर किल्ला बहु रंगेला प... सुभेदार यशवंत कन्हेया सदा... उगा भ्रमसि बा उगा कशाला य... दक्षणच्या पेशव्यांशीं घाल... जास्त आढळले सबब त्या दोघा... पंढरीराया करा दया हालीव स... यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पुणे शहर किलवाणी दिसती जा... दिन असतां आंधार आकाशतळीं ... गगन कडकडून पडलें, पार नाह... श्रीमंत ईश्वरी अंश धन्य त... जगदीश्वर कोपला गोष्ट झाली... श्रीमंत पेशवे प्रधान बहु ... भले भले सरदार जमून सारे प... श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... धोशा धुळपाचा अति आनंदराव ... नमीन मंगलमूर्ती ॥ म्यां न... १ माझे मन नमन मंगलमूर्ति ... आजि इंग्रजाचा गर्व । केला... सेखोजी सहोदरातें आला । या... सर केला टिपू सुलतान फिरंग... शिपाई चाकरी गेले नागपुराल... भले नाना फडणीस केली कीर्त... सोमवाराचे दिवशीं निघाले प... मानवी तनू अवतार धरूनी केल... सोडून सारा राज्यपसारा निघ... श्रीमंत म्हाराज पेशवे धनी... श्रीमंत बाजीराव कन्हया श्... श्रिमंत झाले लोक श्रिमंता... केले दंग समशेरजंग इंगरेजा... करूनि गेली राज ह्याराज सक... सति धन्यधन्य कलियुगीं अहि... पुण्यप्रतापी धन्य जगामधि ... सवाई जानराव धुळप मोहरा वि... धनी सयाजी महाराज धुरंधर भ... दामाजीपंतांनी जगविले ब्रा... नांदगांव प्रगाणा जागा आजं... श्रीमंत पंतप्रधान उभैता भ... तिसर्या रघूजी भोसल्याचा पोवाडा दुसर्या बाजीरावाचा - यशस्वी झाले श्रीमंत पहिले... पोवाडा म्हणजे इतिहासाचे एक साधन. पोवाडा नेहमी समकालीन साक्षीदाराप्रमाणे विश्वसनीय असतो. Tags : povadaपोवाडामराठी शाहीर - प्रभाकर Translation - भाषांतर यशस्वी झाले श्रीमंत पहिले सर्वे लढायाला । आतांच आलें अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥ दादासाहेब पुण्यप्रतापी निस्स्मि शिवभक्त । स्वारी करून दरसाल हालविलें दिल्लीलें दिल्लीचें तक्त ॥ आनंदीबाइ सुशील शिरोमणी सुगुणसंयुक्त । पतिभजनीं सादर घडोघडी अखंड आसक्त ॥ बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त । जन्मांतरीं तप केले निराहारी राहून एकभुक्त ॥ चाल ॥ शके सोळाशे शहाण्णवीं अति उत्तम जयसंवत्सरीं । पौषशुद्ध दशमीस भरणी नक्षत्र भौमवासरीं ॥ ठीक पहिल्या प्रहरांत जन्मले रात्रीच्या अवसरीं ॥(चाल)॥ पहा बाईसाहेब धारमुक्कामीं राहुनी । कंठिला काळ कांही दिवस दुःख साहुनी । केलें तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥(चाल)॥ गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला । कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥समाधान सर्वांस वाटलें कोपरगावास । स्वारी शिकारिस बरोबर जाती कथा उत्सवास जे करणें तें पुसून करिती अमृतरावास ॥ एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावांस । असें असुन नावांनीं मांडिला अति सासुरवास ॥ हळुच नेउन जुन्नरास ठेविलें श्रीमंतरावास ॥(चाल)॥ इतक्या संधींत सवाई माधवराव मरण पावले । तेव्हांपासून नानांनीं राक्षसी कपटा डौल दाविले ॥ परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥(चाल)॥ आले खडकीपुलावर श्रीमंतास घेउनी । दर्शनास नाना परिवारें घेउनी ॥ दाखविली याद रावास एकांतीं नेऊनी ॥(चाल पहिली)॥ भय मानून शिंद्यांचे निघाले वाईस जायला । सातार्यांत राहून लागले भेद करायाला ॥२॥आपण बाळोबा होऊन एक केली खचित मसलत । चिमाप्पास धनि करून राखिली जुनाट दौलत ॥ करारांत दोघांच्या झाली कांहीं किंचित गफलत । म्हणुनी फिरून नानांनीं उलटी मारुनी केली गल्लत । सूत्रधारी जो पुरुष जाच्या गुणास जग भुलत । हातांत सगळे दोर पतंगापरी फौजा हालत ॥(चाल)॥ परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण । राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ॥ कठीण गांठ नानाशीं न चाले तेथें जारण मारण ॥(चाल)॥ महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ॥ बाळोबास शिंद्यांकडून कैद करविलें ॥ शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥(चाल पहिली)॥ रास्ते झाले जामीन प्रसंगी अवगड समयाला ॥ असा गुजरला वक्त नेले मांहवगण पाहायाला ॥३॥घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले । द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥ शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले । दलबादल डेर्यांत श्रीमंतासन्निध संगटले ॥ बाजीराव राज्यावर बसतां आनंदें जन नटले ॥ तोफांचे भडिमार हजारों बार तेव्हां सुटले ॥(चाल)॥ नंतर नाना एक विसांमधीं समाधिस्त झाले । महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधिं आपले ॥ यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥(चाल)॥ शिंद्यांची करून माळव्यांत खातरजमा ॥ केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा । सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥(चाल पहिली)॥ कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला । घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥दिला मार पळणास । जातिनें पुण्यास येऊनियां ॥ शहर सभोंते वेढुन बसले चौक्य ठेवुनियां ॥ खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनियां । सुखांत होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनियां ॥ इठग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनियां । सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनियां ॥(चाल)॥ अगोदर सोजर तुरुक धांवले मद्रासी दक्षिणी । त्या भयानें होळकर परतले नाहीं कोणी संरक्षणीं ॥ भरघोसानें श्रीमंत त्यावर पुण्यास येतां क्षणीं ॥(चाल)॥ झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ॥ परि घरांत शिरला शत्रु सबळ पारखा । लाल शिरां टोपी अंगीं आठ प्रहर अंगरखा ॥(चला पहिली)॥ धर्म कर्म ना जातपात स्थल नाहीं बसायाला । असें असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥फार दिवस आधिं जपत होते या इंग्रज राज्याला । अनायासें झालें निमित्त पंढरपुरास कज्जाला ॥ संकट पडलें कांहिं सुचेना प्रधानपूज्याला । रति फिरली सारांश, मिळाले लोक अपूज्याला ॥ भय चिंता रोगांनी ग्रासिलें काळीज मज्जांला । पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥(चाल)॥ परम कठिण वाटलें आठवलें त्रिभुवन राव बाजीला । थोर थोर मध्यस्त घातले साहेबांचे समजीला ॥ निरुपाय जाणुनी हवालीं केले मग त्रिंबकजीला ॥(चाल)॥ ठेविला बंदोबस्तींने नेउन साष्टीस । एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस । केलें गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥(चाल पहिली)॥ स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला । शोध लावून साहेबांनी तेथे पाठलिवें धरायला ॥६॥इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची । म्हणून साहेब लोकांनी आरंभिली आगळिक दाव्याची ॥ वसई प्रांत कल्ल्याण गेली गुजराथ पुराव्याची । रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ॥ कर्नाटक दिलें लिहून ठाणीं बैसली पराव्यांची । कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥(चाल)॥ अश्चिनमासीं वद्य एकादशी दोन प्रहर लोटतां । श्रीमंत बापूसाहेब एकांतीं पर्वतीस भेटतां ॥ हुकूम होताक्षणीं रणांगणी मग फौजा लोटतां ॥(चाल)॥ बैसले राव दुर्बिणींत युद्ध लक्षित । भले भले उभे सरदारसैन्य रक्षित । लागून गोळी ठार झाले मोर दीक्षित ॥(चाल प०)॥ तसाच पांडोबांनी उशीर नाहीं केला उठायाला । उडीसरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥आला त्रास वाटतें फार ह्यावरून लक्षुमिस । विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुंकडून खामीस । फसले शके सत्राशें एकुणचाळीसच्या रणभूमीस । ईश्वरसंवत्सरांत कार्तिक शुक्ल आष्टमीस । प्रहर दिसा रविवारीं सर्व आले आरब गुरमीस । खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्तामीस ॥(चाल)॥ दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्याशी लढूं । नर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणांत डोंगर चढूं । शिपाईगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढूं ॥(चाल)॥ लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी । दीड पहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी । गेली स्वारी मशाला हिलाला मग लावुनी ॥(चाल पहिली)॥ जलदी करुनी साहेबांनी लाविलें निशाण पुणियाला । खेंचुन वाडयाबाहेर काढलें कदीम शिपायाला ॥८॥सकळ शहरचे लोक हजारों हजार हळहळती । सौख्य स्मरून राज्याचें मीनापरी अखंड तळमळती ॥ रात्रंदिवस श्रीमंत न घेतां उसंत पुढें पळती । यमस्वरूप पलटणें मागें एकदांच खळभळती ॥ धडाक्यानें तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती । त्यांत संधी साधून एकाएकी दुरुन कोसळती ॥(चाल)॥ भणाण जालें सैन्य सोडिली कितिकांनी सोबत । कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनि चुंबत । कितीक मुकामीं अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥(चाल)॥ कोठें डेरे डांडे कोठें उंट तट्टें राहिली । कोठें सहज होऊन झटपट रक्तें वाहली । कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥(चाल पहिली)॥ बहुत कोमावली पहावेना दृष्टिनें उभयांला । हर हर नारायण असे कसे केलें सखयाला ॥९॥माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणीं भिडले । जखम करून जर्नेलास फिरतां जन म्हणती पडले ॥ गोविंदराव घोरपडयाचे दोन हात भले झडले । आनंदराव बाबर ढिगांमधीं खुप जाऊन गढले । मानाजी शिंदे मागें फिरतना डोई देऊन अडले । छत्रपती महाराज तळावर समस्त सांपडले ॥(चाल)॥ घाबरले श्रीमंत सुचेना मन गेलें वेधुनी । बाईसाहेबांना तशिच घोडयावर पाठीस बांधुनी । नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधूनिं ॥(चाल)॥ दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले । नाहीं स्नान शयन नाहीं स्वस्थपणें जेवले । आले आले ऐकतां उठपळ राव धावले ॥(चाल)॥ गर्मगळित जाहले लागले शुष्क दिसायाला । बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन । रागरंग नाहीं आनंद ठाऊक रायालागुन ॥ सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन । कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ॥ धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन । कर्म पुढें प्रारब्ध धावतें लगबग मागुन ॥(चाल)॥ पांढरकवडयावर रचविल्या घनगारा अद्धुत । थंडीनें मेले लोक उठविले गारपगार्यांनी भुत । बेफाम होतें लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥(चाल)॥ ओढवले कसे सर्वांचे समयी संचित । कडकडून पडलें गगन जसें अवचित ॥ दुःखाचे झाले डोंगर नाहीं सुख किंचित ॥(चाल पहिली) अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला । कोणे ठिकाणी नदीत लागलें सैन्य बुडायाला ॥११॥जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती । कळेल तिकडे भरदिसास प्रभु काटयांमधि शिरती ॥ आपला घोडा आपण स्वहस्तें चुचकारुन धरती । खाली पसरून उपवस्त्र दिलगिरींत वर निद्रा करती ॥ अस्तमानीं कधी रात्री भात भक्षिती पाटावरती । दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥(चाल)॥ पेशव्यांचे वंशांत नाहीं कोणी असा कहर पाहिला । हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ॥ बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥(चाल)॥ नर्मदेस शालिवाहन शक संपला । त्या ठायीं ठेविला शकपंती आपला ॥ भरचंद्रहूग्रहणांत जसा लोपला ॥(चाल पहिली)॥ सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला । सिद्ध झाले मालकमास राव राजेंद मिळायाला ॥१२॥समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिरवले । सद्धद झाला कंठ नेत्र दोन्ही पाण्यानें भरले ॥ आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले । ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ॥ केवळ असा विश्वासघात केल्यानें कोण तरले । इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥(चाल)॥ तुमची आमची हीच भेट आतां राव सर्वांना सांगती ॥ कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ॥ ऐसें उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ॥(चाल)॥ महाराज ऐसें उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ॥(चाल)॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये । दूर ढकलुन शरणागतास लावूं नये ॥ पहा कसाबाचें घर गाईस दावू नये ॥(चाल पहिली)॥ हिंमत सोडूं नये सर्व पुढें येईल उदयाला । कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावें ह्र्दयाला ॥१३॥प्राण असुन शरीरांत बुडालों वियोग लोटांत । बरोबर येतों म्हणुन घालिती किती डोयी पोटांत ॥ निराश जाणुन झाली रडारड मराठी मोटांत । निर्दयांनी लांबिवली पालखी पलटण कोटांत ॥ मातबर लोकांची ओझी चालतात मोटांत । गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटांत ॥(चाल)॥ कुंका वांचून कपाळ मंगळसूत्रावांचुन गळा । तसा सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ॥ धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥(चाल)॥ कसें प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविलें, अगदींच पुण्याच्या लोकांना फसविलें । हुर हुर करीत्त का उन्हांत बसविलें ॥(चाल पहिली)॥ काहीं तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला । कोणास जावें शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥विपरित आला काळ मेरुला गिळलें मुंग्यांनी । पंडितास जिंकिलें सभेमध्ये मदांध भंग्यांनी । भीमास आणिलें हारीस रणांगणीं अशक्त लुंग्यांनी । कुबेरास पळविलें अकिंचन कसे तेलंग्यानी ॥ जळीं राघव माशास अडविलें असंख्य झिंग्यांनी । जर्जर जाहला विष्णवाहन बदकांचे दंग्यांनीं ॥(चाल)॥ ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडविले । हरिश्चंद आणि रामचंद्र नळ पांडवांस रडविलें । फितुर करून सर्वांनी असलें राज्य मात्र बुडविलें ॥(चाल)॥ म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर । तर दृष्टी पुढें पडतील राव लवकर ॥ महादेव गुणजिन श्रीमंतांचे चाकर ॥(चाल पहिली)॥ प्रभाकराची जडण घडण कडकडित म्हणायाला । धुरु नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायांला ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP