मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
पद्यपंक्ति

पद्यपंक्ति

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


आम्हीं नव्हतों अमुचे बाप,
उगाच कां मग पश्चात्ताप ?
आसवें न आणूं नयनीं
मरून जाऊं एक दिनीं !

अमुचा पेला दुःखाचा
डोळे मिटूनी प्यायाचा,

पितां बुडाशीं गाळ दिसे,
त्या अनुभव हें नांव असे !
फेंकुनि द्या तो जगावरी,
अमृत होउ तो कुणातरी !

जें शिकलों शाळेमाजी,
अध्याह्रत ही टीप तयाः---
“ द्वितीय पुरुषीं हें योजीं,
प्रथम पुरुष तो सोडुनियां ! ”

१८९८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP