मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
रात्र संपली, दिवसहि गेले,...

निराशा - रात्र संपली, दिवसहि गेले,...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


रात्र संपली, दिवसहि गेले,
अंधपणा ये फिरुनि धरेला,
खिन निराशा परि हृदयाला - या सोडित नाहीं.

नित्यापरि रविकिरणें देती
रंग मनोहर सांध्यमुखीं तीं,
खळबळ ओढा गुंगत गीती - राईंतुनि वाहे.

सुंदर सगळें, मोहक सगळें,
खिन्नपणा परि मनिंचा न गळें,
नुसती हुरहुर होय जिवाला - कां न कळे कांहीं !

चंद्रविंब धरि अभिनव कांती,
मेघ तयांनीं धवलित होती,
परि हृदयीं नैराश्यकालिमा - मम खंडत नाहीं !

भोवर्‍यांत जणुं पडलों कोठें,
स्वप्न भयंकर दिसतें वाटे,
जीवित केवळ करुणासंकुल - नैराश्यें होई !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP