मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
कांपे भूमि पुन:पुन्हा थरथ...

तुटलेले दुवे - कांपे भूमि पुन:पुन्हा थरथ...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


कांपे भूमि पुन:पुन्हा थरथरा, अग्नी जिभा हालावी,
सिन्धु द्वीप गिळूनि नाचत सुटे मत्त नृपालापरी,
पाही चोहिकडे भयार्त जनता मुङग्यांपरी धावरी,
बैसे घावच पूर्वराष्टहृदयीं, खुण्टे गती मानवी.
आपत्ति स्मरणीय ही परि फिकी क्रान्त्यांपुढे त्या पडे,
गेल्या होऊनि पश्चिमेस न परी झाला जगाचा लय;
जीर्णाच्या प्रलयांतुनी अपजती तत्त्वें नवीम निर्भय,
ही मुक्तिप्रगतिध्वजा वर चढे, वार्‍यासवें बागडे.
रक्ताच्याच नद्या वहात सुटल्या माजे अशी यादवी,
हो सम्राटकुल दुष्ट नष्ट बुडुनी, हो रङक अग्रेसर,
अन देशोधडिला प्रभुप्रतिनिधी तो जाय भिक्षेवर,
चोरांना पळवूनि राष्ट्रा अपुली स्वायत्तता दाखवी.
आम्हांला अवतारराज्य अथवा सुल्तानशाही नको;
रङकांचें समतासुराज्य मिळुं दे तें, आन काही नको.

७ मार्च १९२४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP