मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली|
मैत्रीचा सहजी निघे विषय त...

तुटलेले दुवे - मैत्रीचा सहजी निघे विषय त...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


मैत्रीचा सहजी निघे विषय तो सम्भाषणौघामधी,
तच्चेतोनयनापुढे मग ऊभी राहुनि मित्राकृती
येतत्कण्ठ भूरूनि, तो मज म्हणे : “पूजार्ह त्याची स्मृती.
मृत्यूनेच दुराविलें जगिं तया, दुर्वार तो पारधी.
गेले दीस किती सुखांत असतां सङगें जिवाचा सखा !
गोष्टी बोलत ती पहाट कितिदा होऊनि गेली बरें !
दे अद्यापि अमूर्त सङगत मुकी तो पूर्वमैत्री स्मरे, -
आहे भाव तसाच गाढ अमुचा कृष्णार्जुनासारखा.”
झाला तो मग गप्प आणिक बघूं माझ्याकडे लागला,
जन्माचें मम होय नाटक असें शोकान्त, साङगूं कसें ?
डोळ्यांनी बघतों दुरूनि तुज तों जीवास काही ड्से,
योगांतील वियोग साहुनि पुरा हा जीव वैतागला.
ये तूझाच विचार निष्क्रिय यदा मी ऐकला रात्रिचा,
मित्राचा पुरवेल अन्त, न लगे केव्हाहि तो मैत्रिच.

१० ऑगस्ट १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP