मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक २१ व २२ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक २१ व २२ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक २१ व २२ Translation - भाषांतर अज्ञानात्मानसोपाधे: कर्तृत्वादीनि चात्मनि ॥कल्पन्तेंबुगते चंद्रचलनादि यथांभस: ॥२१॥कोण्हीयेक नदीचीया तिरिं । मार्ग चालता निसिमाझारिं । चंद्र दिसे चालल्यापरि । उदकाचिया अतुनि ॥५१॥ मार्गस्थ जाय पूर्वेप्रति । त्यास चंद्राचि दिसे तैसीच गति । होवोनि अज्ञानाचि भ्रांति । विपरीत भान जाहालें ॥५२॥ अथवा सरोवराचिया माझारिं । उदक चंचळ होतां निर्धारिं । भ्रांतासि दिसे नानापरि । चंद्रबिंब चंचळत्वें ॥५३॥ तैसि आत्मस्वरूपिं अज्ञानउपाधि । देहे इंद्रियमनबुद्धि । यांचिया योगें कर्तृत्वसिद्धि । आत्मयासि दिसतसे ॥५४॥ परि आत्माआसे निष्क्रिय । व्यापारशून्य निरामय । तया निर्व्यापारासि काय । व्यापार लागुं शकेल पैं ॥५५॥ तरि हें कर्तृत्व असे कवणाचें । हें तूज सांगोनि देतों साचें । श्रुत्या युक्त्या अनुभवाचें । बोलणें हें ऐक पां ॥५६॥रागेच्छासुखदु:खादिबुद्धौसत्यां प्रवर्तते ।सुषुप्तौ नास्ति तन्नाशे तस्माद्बुद्धेस्तु नात्मन: ॥२२॥रागइच्छासुखदु:ख आदिकरोन । हे बुद्धिचेचि असति गूण । सच्चिदानंद आत्मलक्षण । नोव्हेति जाण निश्चइं ॥२५७॥ जागृति आणि स्वप्नावस्था । बुद्धिचा ठाइं असति तत्वता । ह्मणोनिया सर्व व्यवस्था । होय कर्मअकर्माचि ॥५८॥बुद्धिचे ठाइं काम वसति । बुद्धिच धरि विषयाचि प्रीति । सूखइच्छा धरोनिया निगुति । इंद्रीयद्वारें प्रवतें पैं ॥५९॥ विषयप्राप्तिनें मानि सुख । तें प्राप्त न होतां मानि दु:ख । बुद्धिच होउनि सर्वतोमुख । प्रवर्त होय कर्मासि ॥२६०॥ तेचि बुद्धि सुषुप्तिमाझारिं । लीन होतां आज्ञानाभीतरिं । रागेच्छाअ सुखदु:खें सहपरिवारिं । नाशाप्रति पावति ॥६१॥ तेव्हां आत्मा तरि असतचि आसे । परी रागइच्छादी कर्म नसे । मागति बुद्धि उठतांचि ठसे । रागेच्छादिकाचे उमटति ॥६२॥ तरि जें करणें क्रियाकर्म । तें सर्वहि जाण बुद्धिचे धर्म । अविनासि आत्मा निर्धर्म । निष्क्रियत्वें असे पैं ॥६३॥ तंव सिष्य ह्मणे जि बरें कथिलें । हें माझ्या प्रत्ययालागि आलें । परि आत्मलक्षणातें सांगितलें । पाहिजे मजलागुनि ॥६४॥ मग श्रीगुरु ह्मणति भला । रे भला । येथवरि तुवां व्यतिरेक ऐकिला । तो आनात्मा जाणोनिया वहिला । ठेवि वेगळा जडभाग ॥६५॥ पुन्हा हे शंका न घेइ सर्वथा । कर्तृत्व नेमि बुद्धेंद्रियाचे माथा । सांडोनि देइ अविचारगाथा । किं कर्ता आत्मा म्हणउनि ॥६६॥ जैसें कुंकु आणि गोपीचंदन । करितां येकत्र मेळवण । नसे अरक्त ना शुभ्रपण । दोन्हिहि होति विपरित ॥६७॥ तैसें अज्ञानयोगेंकरुन । आत्मा आणि देह येकत्रपण । मेळवोनिया विपरीत भान । जालें होतें तुजलागिं ॥६८॥ तरि सांडोनि बुघ्यादिकाचा संग । होइ पां आत्मस्वरूपीं नि:संग । तेणेंकरोनि भवभंग । होइल तुझा निश्चइं ॥६९॥ आतां किंलक्षण । कैसि तयाचि वोळखण । ते तूज सांगतों निश्चयें करून । करि श्रवण ये क्षणिं ॥७०॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP