मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५१ वा

पांडवप्रताप - अध्याय ५१ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीपांडुरंगा पंढरीशा ॥ पांडवपालका पुराणपुरुषा ॥ पद्मजजनका पयोब्यिवासा ॥ पंकजनेत्रा परात्परा ॥१॥
तुझें चरित्र जें वर्णिलें ॥ तें पूर्वा ध्यायीं शल्य पर्व संपलें ॥ येथूनि गदा पर्व कथियेलें ॥ वैशंपायनें जन मेजया ॥२॥
धृत राष्ट्र म्हणे संजया प्रती ॥ दुर्यो धनासी पांडव हुडकिती ॥ मज खेद वाटतो चित्तीं ॥ पुढील कथीं वर्त मान ॥३॥
संजय म्हणे पांडवसेना ॥ चहूंकडे शोधीतसे दुर्यो धना ॥ शिबिरें सदनें पाहती नाना ॥ चहूंकडू नियां सर्वही ॥४॥
तों कृतवर्मा कृपी सुत ॥ कृपीबंधु तिजा सत्य ॥ तेही दुर्यो धना शोधीत ॥ र्‍हादाजवळी पातले ॥५॥
म्हणती बाहेर येईं दुर्यो धना ॥ युद्ध करूनि मारूं पृतना ॥ अथवा जाऊं सायुज्य सदना ॥ समरांगणीं झुंजोनियां ॥६॥
आंतूनि दुयो धन बोलत ॥ मी श्रमलों असें रें अत्यंत ॥ उदयीक युद्ध करूं यथार्थ ॥ जिंकूं सत्य पंडुसुतां ॥७॥
तों भीमाचे पारधी जाण ॥ जात होते श्वापदें मारून ॥ तिंहीं ते शब्द ऐकून ॥ जाऊन भीमा सांगितलें ॥८॥
कीं द्वैपायनडोहा मधून ॥ तिघांशी बोलिला सुयो धन ॥ ऐसें पांडवीं ऐकोन ॥ परध्यांसी दिधलीं धन वस्त्रें ॥९॥
पांच पांडव आणि केशव ॥ उरली पृतना धांवे सर्व ॥ धृष्टद्युम्न प्रतिपांडव ॥ नंदन द्रौपदीचे धांवती ॥१०॥
तंव ते तिघे जण रथी ॥ पळोनि गेले वना प्रती ॥ पांडव र्‍हासमीप येती ॥ परी तो गुप्त न बोले ॥११॥
स्वगदा जवळी घेऊन ॥ जळीं निजला सुयो धन ॥ पांडवांसी म्हणे मधु सूदन ॥ कपद पहा कैसें याचें ॥१२॥
मग धर्म बोले ते समयीं ॥ दुर्यो धना तूं बाहेर येईं ॥ आतां लपोनि व्यर्थ कायी ॥ डाग लागेल क्षत्रिय धर्मा ॥१३॥
एवढा तुझा अभिमान ॥ आजि कोठें टाकिला नेऊन ॥ युद्ध करीं बाहेर येऊन ॥ समरांगण गाजवीं ॥१४॥
काय करिसी वांचोन ॥ राज्य अथवा स्वर्ग भुवन ॥ एक घे साधूनि जळामधून ॥ बाहेर लवकर येईं तूं ॥१५॥
दुर्यो धन म्हणे मी विरथ ॥ श्रमलों एकला आहें येथ ॥ मग म्हणे तो पंडुसुत ॥ आम्ही बहुत श्रमलों आहों ॥१६॥
दुर्यो धन म्हणे माझी पृतना ॥ आटूनि गेली स्वर्गभुवना ॥ धर्मा मी जाईन वना ॥ तूं राज्य करीं आपुलें ॥१७॥
धर्म म्हणे तुवां जे दिधली ॥ ते मी उर्वी नेघें कदाकाळीं ॥ पूर्वीं आम्हीं मागितली ॥ परी त्वां गोष्टी ऐकिली नाहीं ॥१८॥
दिवाधिदेव नारायण ॥ शिष्टाई करूं आला जाण ॥ तूं बोलिलासी काय वचन ॥ मना माजी आठवीं तें ॥१९॥
सुईच्या अग्रीं मृत्तिका जाण ॥ इतुकी मी नेदीं युद्धा विण ॥ तरी बाहेर येईं माजवीं रण ॥ दोहोंतून एक साधीं पां ॥२०॥
तूं घालूनि विष घोर ॥ मारीत होतासी वृकोदर ॥ अग्नि लावूनि लाक्षा मंदिर ॥ दग्ध केलें आम्हांतें ॥२१॥
दुःशासनें द्रौपदीचे केश ॥ धरूनि आणिली सभेस ॥ करू नियां कपटपाश ॥ राज्य माझें हरियेलें ॥२२॥
रात्रीं घाला घालावया ॥ आलासी आम्हां मारा वया ॥ असो किती म्हणू नियां ॥ अन्याय तुझे सांगावे ॥२३॥
तरी ये तूं आतां झडकरी ॥ समयीं धर्म युद्ध करीं ॥ सुयो धन म्हणे निघतां बाहेरी ॥ अवघे मिळूनि माराल ॥२४॥
धर्मा तुझ्या वचनें करून ॥ मी आतां बाहेर येईन ॥ परी माझें अधमांग लक्षून ॥ कदा ताडण न कीजे ॥२५॥
धर्म म्हणे तूं ये झडकरी ॥ मानेल तैसेंचि युद्ध करीं ॥ आम्हीही पांच निर्धारीं ॥ एकेक जाण युद्ध करुं ॥२६॥
वाद्यें न वाजवूं रणीं ॥ हांक न फोडूं कोणी ॥ भोंवते उगेचि उभे राहूनी ॥ आम्ही सर्व युद्ध पाहूं ॥२७॥
भीम म्हणे मी तूं दोघे जण ॥ युद्ध करूं समरीं निर्वाण ॥ मग भुजंग निघे वारुळांतून ॥ तेवीं सुयो धन निघाला ॥२८॥
क्रोधें नेत्र रक्तांबर ॥ दिसे खवळला जैसा व्याघ्र ॥ इंद्राहातीं जैसें वज्र ॥ तैसी गदा करीं झळके ॥२९॥
धृष्टद्युम्न सात्यकी बळी ॥ हस्तावरी हस्त हाणिती ते वेळीं ॥ गदगदां हांसती सकळी ॥ देखोनि बोले सुयो धन ॥३०॥
हांसतां बहुत मिळोन ॥ परी गदा घायें चूर्ण करीन ॥ व्याघ्राच्या चेष्टा करून ॥ वृषभ कैसा वांचेल ॥३१॥
एक एक उठोन ॥ करा मजशीं युद्धकंदन ॥ धर्मा तूं धर्म परायण ॥ साक्ष होईं या गोष्टी ॥३२॥
एकावरी बहुत जण ॥ न उठावे हा धर्म पूर्ण ॥ पार्थ म्हणे तरी अभिमन्य ॥ कैसा मारिला समरां गणीं ॥३३॥
आतां तूं सांगसी स्वधर्म ॥ ते वेळे कां रे केला अधर्म ॥ मग बोले राजा धर्म ॥ बांधीं वीरगुंठी सांवरूनि ॥३४॥
तूं पांचांत एकासी मारीं ॥ तुज हें राज्य देऊं निर्धारीं ॥ ऐकतां रागावला कंसारी ॥ भीम अंतरीं दचकला ॥३५॥
श्रीरंग म्हणे ते वेळे ॥ नेमवचन काय केलें ॥ तुवां पूर्वीं ऐसेंचि बुडविलें ॥ द्यूतप्रसंगीं खेळोनियां ॥३६॥
न करितां प्रधानांशीं विचार ॥ नृपें न बोलावें उत्तर ॥ तेणें एकासी जरी मारिले सत्वर ॥ तरी मग राज्य द्यावें कीं ॥३७॥
आपणासी नाहीं बुद्धि साचार ॥ दुसरियासी न पुसे विचार ॥ तरी तो अनर्थीं पडेल निर्धार ॥ यांत संदेह नसेचि ॥३८॥
भीम बळेंचि आहे सबळ ॥ दुर्यो धन बळकट विशेष कुशळ ॥ कैसी संपादेल ही वेळ ॥ मज हे चिंता जाळीतसे ॥३९॥
भीम म्हणे कंशांतका ॥ तूं असतां आम्हां पाठिराखा ॥ या दुर्यो धना मशका ॥ क्षण न लागे जिंकावया ॥४०॥
भीम गदा घेऊनि उठिला ॥ हांकें ब्रह्मकटाह गाज विला ॥ दुर्यो धन सरसावला ॥ जरासंधासारिखाचि ॥४१॥
वृकोदर म्हणे ते वेळीं ॥ शकुनीच्या बोलें कर्में केलीं ॥ तीं दुःखफळें सकळी ॥ भोगीं आतां पापिया ॥४२॥
भीष्म द्रोण कर्म वीर ॥ रणपंडित जैसे दिनकर ॥ ते तुवां मारविले समग्र ॥ तूंचि एकटा राहसी ॥४३॥
दुर्यो धन म्हणे वल्गना ॥ किती करिसी भीमसेना ॥ जीवनाविण मेघगर्जना ॥ व्यर्थ जैसी गडगडी ॥४४॥
आजि तुझा घेईन प्राण ॥ गजपुरीचें राज्य पावेन ॥ तों बळराम तीर्थें करून ॥ तेथें आला अकस्मात ॥४५॥
सर्वीं केलें त्यासी नमन ॥ बावीसां दिवसां आला परतोन ॥ परी युद्धाचा अठरावा दिन ॥ निश्चय पूर्ण जाणावा ॥४६॥
भीम सेन दुर्यो धन ॥ बळिरामाचे शिष्य जाण ॥ रेवतीवराचे वंदिती चरण ॥ प्रार्थून पहा म्हणती ॥४७॥
बळिभद्र म्हणे ऐका मात ॥ स्यमंतपंचक थोर तीर्थ ॥ युद्ध करितां मोक्ष प्राप्त ॥ चला तेथें अवघेही ॥४८॥
म सर्वही उठोन ॥ आले स्यमंतपंचकतीर्था लागून ॥ युद्धा सरसावले दोघे जण ॥ देवगण विलोकिती ॥४९॥
सिंहावरी सिंह जैसा ॥ वृकोदराचा चपेटा तैसा ॥ हांका फोडिती तेणें आकाशा ॥ कंप वाटे सुटला पैं ॥५०॥
पूर्वीं जरा संध भीम सेन ॥ कीं सुंदोप सुंद दोघे जण ॥ कीं वाली आणि सूर्य नंदन ॥ तैसे दोघे भिडतो पैं ॥५१॥
कीं मेरु आणि विंध्याचल ॥ तैसे दोघे दिसती सबल ॥ हांकेसरसा ब्रह्मांडगोल ॥ डोलूं लागला तेधवां ॥५२॥
धर्मासी म्हणे दुर्यो धन ॥ तुम्हीं युद्ध पहावें सर्व बैसोन ॥ अवघे अवश्य म्हणोन ॥ धरणीवरी बैसले ॥५३॥
भयें कांपतसे क्षिती ॥ पाताळीं भोगींद्र दचकला चित्तीं ॥ कूर्म वराह कांपती ॥ रिचवती भगणें तेधवां ॥५४॥
काननीं श्वापदांचे पाळे ॥ स्थानें सोडूनि पळूं लागले ॥ पर्वत शिखरें त्या वेळे ॥ कोसळती उर्वीवरी ॥५५॥
सप्तसमुद्र उचंबळती ॥ मेरुमंदार आदळती ॥ असो भीम सेनें चित्तीं ॥ पुर्वदुःखें आठविलीं ॥५६॥
करकरां खाऊ नियां दांत ॥ म्हणे कैसें जाळिलें जोहरांत ॥ विष घालू नियां गंगेंत ॥ बुडविलें मज लागुनि ॥५७॥
द्रौपदी सभेसी आणून ॥ अंक दाख विला उघडा करून ॥ ते मांडी आजि मी चूर्ण ॥ करीन हे समरांगणीं ॥५८॥
गौर्गौः म्हणोनि वचन ॥ बोलिलासी कीं दुर्गा वरून ॥ षंढतिळ पंडुनंदन ॥ म्हणो नियां बोलिलासी ॥५९॥
रात्रीं नसतां सिद्ध अन्न ॥ तुवां पाठविला अत्रिनंदन ॥ ताट ढकलूनि जगज्जीवन ॥ आला धांवोन तेधवां ॥६०॥
सुयोधन अन्यायी थोर ॥ ठाव नाहीं द्यावया उत्तर ॥ म्हणे भीमा तुझें आजि कलेवर ॥ प्राणा विरहित करीन मी ॥६१॥
तों भीमें गदाघायीं ॥ दुर्यो धन ताडिला ह्रदयीं ॥ तंव तेणें लवलाहीं ॥ भीग वर्मीं ताडिला ॥६२॥
कुंकुमें माखले अचल ॥ कीं पळस फुलले बहुसाल ॥ तैसे अशुद्धें दोघे बंबाळ ॥ आरक्तवर्ण दिसती पैं ॥६३॥
नाना मंडलें दाविती ॥ स्थिरक चमक नाना गती ॥ चक्राकार फेरे फिरती ॥ पाहों न शकती बैसकार ॥६४॥
एक दक्षिणे कडे दाविती ॥ एक उत्तर पदें चालती ॥ पूर्व पश्चिमे गिरक्या देती ॥ हणिती मर्में पाहो नियां ॥६५॥
गदेशीं गदा झगटती ॥ माहा ज्वाला तेथें उमटती ॥ दोघेही मागें न सरती ॥ भय चित्तीं नच वाटे ॥६६॥
मांडी खुटीं येऊन ॥ सवेंचि घेती ऊर्ध्व उड्डाण ॥ एकमेकांच्या घायें करून ॥ मूर्च्छना येऊन पडताती ॥६७॥
भीम उठे मूर्च्छा सांवरून ॥ पाहे दुर्यो धना विलोकून ॥ तंव तो व्याकुळ देखोन ॥ उभा राहिला क्षणभरी ॥६८॥
सवेंचि उठोनि दुर्यो धन ॥ मागुती प्रवर्ते युद्धा लागून ॥ जगदीश्वरासी म्हणे अर्जुन ॥ युद्ध दारुण परम हें ॥६९॥
जय कोणासी असे प्राप्त ॥ हें मज न कळेचि नि़श्चित ॥ हरि म्हणे हा मायिक नष्ट धूर्त ॥ मायेनेंचि मारावा ॥७०॥
शठाप्रति शठपण ॥ करूनि घ्यावा याचा प्राण ॥ भीमासी हरि दाखवी खूण ॥ मांडीवरी हाणो नियां ॥७१॥
मैत्रेयाचा शाप दारुण ॥ मांडीवरी गदा घाय पडोन ॥ शेवटीं तूं जाशील मरून ॥ जाणे मधुसूदन वर्म हें ॥७२॥
द्रौपदीचाही शाप पूर्ण ॥ भीमाचें तेंचि नेमवचन ॥ त्याही वरी पाप दारुण ॥ दुर्यो धन आचरला ॥७३॥
एरव्हीं दुर्यो धन योद्धा कुशळ ॥ कुलिशा ऐसी गदा सबळ ॥ समरां गणीं आला काळ ॥ त्यासही हारी आणील तो ॥७४॥
असो दोघांशीं युद्ध होत ॥ सकल वीर भोंवते पहात ॥ नाना मंडलें उड्डाणें घेत ॥ हांका फोडीत अनिवार ॥७५॥
उफराटी उडी घेत दुर्यो धन ॥ ते वेळे वरते जाहले चरण ॥ तों भीमें गदा उचलून ॥ वामांकावरी घातली ॥७६॥
पक्वफळ होय चूर्ण ॥ तैसी मांडी गेली विदारून ॥ वृक्ष पडे उन्मळून ॥ तैसा भूमीवरी पडियेला ॥७७॥
जाहले नाना उत्पात ॥ गगनीं उठले त्रिविध केत ॥ धरा जाहली कंपित ॥ मेघ वर्षत रक्त तेव्हां ॥७८॥
सुमनवृष्टि भीमावरी ॥ निर्जर करिती ते अवसरीं ॥ असो दुर्यो धनाचा मुकुट झडकरी ॥ भीम हाणी लाथेनें ॥७९॥
शिरावरी पाय देऊन ॥ रगडूनियां केलें चूर्ण ॥ आम्हांसी षंढतिळ जाण ॥ बोलिलासी कैसा तूं ॥८०॥
धर्म म्हणे त्वां भीमा पाहीं ॥ अनुचित कर्म केलें ये समयीं ॥ हें सर्व रायां मानलें नाहीं ॥ मागें पुढें निंदिती तुज ॥८१॥
अकरा अक्षौहिणी दळाचा पती छत्रधर दुर्यो धन नृपती ॥ अहा कर्मा कैसी गती ॥ पडिला क्षितीं मूर्च्छित ॥८२॥
अजात शत्रु धर्म राव खरा ॥ नयनीं वाहती अश्रधारा ॥ म्हणे दुर्यो धन कौरवेश्वरा ॥ कैसें प्राक्तन तुझें हें ॥८३॥
खेद न धरीं ह्र्दय कमलीं ॥ तुझी क्रिया तुजसी पळली ॥ तुझ्या स्त्रिया रडतील सकळी ॥ तें मी श्रवणीं केवीं ऐकूं ॥८४॥
तों क्रोध युक्त बोले बळिराम ॥ भीमा धिकू धिकू तुझा पराक्रम ॥ अधमांग न ताडावें हा नेम ॥ त्या वरी हें कर्म विशेष केलें ॥८५॥
पृथ्वी पति सुयो धन वीर ॥ त्याचें लत्तेनें मर्दिलें शिर ॥ क्रोधें उचलूनि मुसळ नांगर ॥ बळिभद्र उठिला पैं ॥८६॥
मग धांवोनि चक्रपाणी ॥ मिठी घातली मागूनि जघनीं ॥ समा धान तये क्षणीं ॥ करीत ज्येष्ठ बंघूचें ॥८७॥
तुम्हीं आम्हीं धरिला अवतार ॥ कीं हरावया पृथ्वीचा भार ॥ त्यांची पाठी राखावी साचार ॥ पितृभगिनी सुत हे कीं ॥८८॥
त्यासी शाप होता पहिला ॥ तो त्याचा त्यासी फळास आला ॥ आणि कलियुगाचा आरंभ जाहला ॥ स्वधर्म चालिला बुडत पैं ॥८९॥
भीमापासूनि पडिलें अंतर ॥ आतां धर्मा कडे पाहूनि साचार ॥ क्षमा करावी हा निर्धार ॥ नाहीं विचार दुसरा पैं ॥९०॥
रथीं बैसोनि रेवतीवर ॥ द्वारकेसी गेला सत्वर ॥ मग धर्माचें समाधान श्रीधर ॥ नानापरी करीतसे ॥९१॥
असो जय वाद्यांची घाई ॥ एकचि लागली ते समयीं ॥ सिंहनादें ते सर्वही ॥ वीर गर्जती आनंदें ॥९२॥
सर्व राजे मिळोन ॥ करिती भीमाचे स्तवन ॥ धर्मद्वेषी दुर्यो धन ॥ बरा मारिला चांडाल ॥९३॥
कृष्णा कडे दुर्यो धन ॥ क्रोधें पाहे विलोकून ॥ म्हणे तुवां कंसाचा प्राण ॥ कपटें करून घेतला ॥९४॥
तुवांचि हें सर्व करविलें ॥ कपटें राजे मार विले ॥ जरासंधासी वधविलें ॥ कपट बुद्धि करू नियां ॥९५॥
आणी कही कालयवन ॥ गोवळ्या मार विलासी कपटें करून ॥ धर्म मुखें असत्य बोल वून ॥ घेतलासी प्राण द्रोणाचा ॥९६॥
शिखंडी तुवां पुढें घालून ॥ व्यासनीं पाडिला गंगा नंदन ॥ चक्र काढावया गुंतला कर्ण ॥ त्याचाही प्राण घेतला तुवां ॥९७॥
माझा कर्ण वीर एकला ॥ त्रैलोक्यासी जो आगळा ॥ काळरूप तूं गोवळा ॥ तुवांचि गिळिला समरांगणीं ॥९८॥
धर्म युद्ध तुम्हीं केलें नाहीं ॥ कपटेंचि मारविले सर्वही ॥ हरि म्हणे आलों जे समयीं ॥ मानिली नाहीं शिष्टाई कां ॥९९॥
तुवां जे अन्याय केले बहुत ॥ तेचि आजि फळा आले समस्त ॥ केशीं धरूनि ओढीत ॥ माझी बहीण सभे नेली ॥१००॥
तुम्ही कपटी चांडाल दुर्जन ॥ तुमचें ऐसेंचि करावें हनन ॥ मी अवतार धरिला पूर्ण ॥ याचि कार्या लागूनि ॥१०१॥
श्लोक ॥ परित्राणाय साधूनां विना शाय च दुष्कृताम‍ ॥ धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥१०२॥
टीका ॥ नाना प्रकारें करून ॥ मारावे अवघे दुर्जन ॥ सद्भक्तांचें प्रति पालन ॥ करावया लागीं पैं ॥१०३॥
उतरा वया धरा भार ॥ मी अवतरलों सर्वेश्वर ॥ रामावतारीं रजनीचर ॥ पूर्वींच म्यां मारियेले ॥१०४॥
नाना अवतार धरून ॥ केलें दुष्टांचें निर्दलन ॥ हिरण्यकशिपु मर्दून ॥ प्रर्‍हाद म्यां रक्षियेला ॥१०५॥
सर्षप बीज पेरिलें बहुत ॥ गोधूम कैसे होती प्राप्त ॥ दुष्ट कर्म जे जाचरत ॥ ते परलोक केवीं पावती ॥१०६॥
असो श्रीरंगाचें स्तवन ॥ पांडव करिती कर जोडून ॥ तूं अनंत ब्रह्यांड नायक मन मोहन ॥ भक्तजनांसी रक्षिसी ॥१०७॥
पांडवपालक गोविंद ॥ हें त्रिभुवनीं गर्जे ब्रीद ॥ तैसाचि करूनि घोष विशद ॥ दुंदुभि तेव्हां ठोकिल्या ॥१०८॥
तरी यावरी पीतवसना ॥ ब्रह्मांड नायका जगन्मोहन ॥ नीलोत्पलदलवर्णा ॥ शिबिरा प्रति चला आतां ॥१०९॥
दुर्यो धनाचीं शिबिरें ओस ॥ जडितस्तं भावरी रत्न कळस ॥ कनकवर्ण दिसती राजस ॥ अतिउदास भण भणित पैं ॥११०॥
कर्ण द्रोण गंगा सुत ॥ यांचींही शिबिरें भण भणित ॥ एवं ओसचि समस्त ॥ नाहीं रक्षक कोणीही ॥१११॥
दिव्या स्तरणें मृदुमवाळ ॥ ओठांगणें गादिया तेजाळ ॥ कोश सदनें विशाळ ॥ भण भणित पडियेलीं ॥११२॥
गांडीवासी गवसणी ॥ घाली तेव्हां पाकशी सनी ॥ तूणीर ठेविला आटोपूनी ॥ जो कल्पांतींही सरेना ॥११३॥
कोणी सेवक उरले किंचित ॥ ते धर्मासी जाहले शरणागत ॥ म्हणती कौरवीं पाळिलें आजि पर्यंत ॥ यावरी धर्मा रक्षीं तूं ॥११४॥
असो जयवाद्यें वाजवीत ॥ स्वस्थला गेले पंडुसुत ॥ अर्जुनाचा विजय रथ ॥ जगन्निवासें सोडिला ॥११५॥
उभय कृष्ण उतरले सवेग ॥ तत्क्षणीं सोडिले नसतां तुरंग ॥ अंजनी ह्रदया विंदभृंग ॥ पुसोनि गेला सेतुबंधा ॥११६॥
खालीं उतरतां भगवान ॥ धडधडां जळाला स्यंदन ॥ जळावया काय कारण ॥ जन मेजय पुसतसे ॥११७॥
मग बोले वैशंपायन ॥ द्रोण कर्ण गंगा नंदन ॥ यांहीं अस्त्रें सोडिलीं दारुण ॥ पार्थ प्राणहरणार्थ जीं ॥११८॥
परी श्रीरंग आणि मारूती ॥ अर्पिते जाहले निज शक्ती ॥ जीं ब्रह्मांड जाळूं शकती ॥ होतीं सभोंवतीं तळपत ॥११९॥
तीं कार्य सरलिया समग्र ॥ रिता देखोनि रहंवर ॥ प्रलयाग्नितुल्य सत्वर ॥ चहूंकडूनि धांवलीं ॥१२०॥
धडधडां जळाला रथ ॥ पांच पांडव आश्वर्य करीत ॥ धर्म भीम आणि पार्थ ॥ श्रीवल्लभासी पुसती पैं ॥१२१॥
कां जळला स्वामी स्यंदन ॥ हास्य मुखें बोले राजी वनयन ॥ अर्जुनाचा घ्यावया प्राण ॥ अस्त्रदेवता जपत होत्या ॥१२२॥
कार्य सरल्यावरी समग्र ॥ आम्ही उतरलों हरिहर ॥ तों रागें अस्त्रें धांवलीं समग्र ॥ रहंवर त्यांहीं जाळिला ॥१२३॥
गांडीत चाप अक्षय तूणीर ॥ पार्थें काढिलीं होतीं अगोदर ॥ तेवढीं उरलीं निर्धार ॥ कृष्णेच्छें करू नियां ॥१२४॥
एवं सर्व जगज्जीवनें रक्षिलें ॥ हें पांडवांसी पूर्ण कळों आलें ॥ अभिमान सर्वांचे गळाले ॥ अहंकर्तव्यापणाचे ॥१२५॥
सूत्रधार तो सर्वेश्वर ॥ हें प्रत्यया आलें समग्र ॥ मग कृष्णस्तवन अपार ॥ करिते जाहले सप्रेमें ॥१२६॥
आदिपुरुषा परात्परा ॥ सत्यज्ञाना अगोचरा ॥ सर्वरक्षका त्रिभुवनेश्वरा ॥ वेदशास्त्रां अगम्य तूं ॥१२७॥
अनंत जन्में तप केलें ॥ तें एकदांचि फळा आलें ॥ सोयरा होऊनि ये वेळे ॥ सोय आमुची रक्षिली ॥१२८॥
करू नियां पुण्याच्या राशी ॥ बहुत दिवस भाकें गोंविलासी ॥ नीचकर्म ह्रषीकेशी ॥ सारथ्य तुवां अवलंबिलें ॥१२९॥
तुझिया उपकारांचें ऋण ॥ आम्ही कोणे काळीं होऊं उत्तीर्ण ॥ पृथ्वीचें पत्र करूनि जाण ॥ लिहितां गुण न सरती ॥१३०॥
ऐसी श्रीकृष्णलीला अगाध ॥ पांधव वर्णितां होती सद्नद ॥ मग त्यांसी ह्रदयी धरूनि मुकुंद ॥ समाधान करी त्यांचें ॥१३१॥
असो पांडव यावरी ॥ राहिले दुर्यो धनाचे शिबिरीं ॥ सर्व संपत्ति निर्धारीं ॥ घेते जाहले आनंदें ॥१३२॥
यावरी तो जगन्निवास ॥ जाता जाहला हस्तिना पुरास ॥ रथीं बैसोनि परम पुरुष ॥ धृत राष्ट्रासी भेटला ॥१३३॥
गांधारीस बोलावून ॥ करी उभयतांचें समाधान ॥ बहुत शास्त्र पद्धति सांगोन ॥ मन त्यांचें मोहीतसे ॥१३४॥
पुढील टाकूनि कार्य भाग ॥ कां तेथें गेला श्रीरंग ॥ तरी गांधारी पतिव्रता अंभग ॥ शाप देईल पांडवां ॥१३५॥
जाळोनियां करील भस्म ॥ हें जाणोनि भक्त मनोभिराम ॥ तिचें समाधान परम ॥ नाना प्रकारें करीतसे ॥१३६॥
एक मुहुर्त पर्यंत जाणा ॥ गांधारीस आली दुःखमूर्च्छना ॥ मग सावध होऊनि तया क्षणा ॥ पुत्र दुःखें आरंबळे ॥१३७॥
श्रीहरि म्हणे गांधारी ॥ मी शिष्टाईस आलों ते अवसरीं ॥ दुर्यो धनासी शिकविलें नाना परी ॥ परी तो नायके कोणाचें ॥१३८॥
मैत्रेय विदुर सत्यवती नंदन ॥ शारद्वत आणि भीष्म द्रोण ॥ बहुतांचें नायकिलें वचन ॥ तरी पांडवांवरी बोल नाहीं ॥१३९॥
आतां तुम्हीं एक ऐकावें ॥ पांडव आपुले पुत्र म्हणावे ॥ तुम्हां दोघांचे कणवे ॥ धर्म शोक करी बहु ॥१४०॥
अबें सौवली तूं पतिव्रता पूर्ण ॥ पूर्वीं बोलली होतीस वचन ॥ जेथें धर्म जय कल्याण ॥ तें वचन खरें जाहलें ॥१४१॥
तों जग द्नुरु पराशर सुत ॥ प्रकटला तेव्हां अकस्मात ॥ तयांचें समाधान करीत ॥ म्हणे पांडव सुत तुमचेचि ॥१४२॥
श्रीकृष्ण तयां प्रति पुसोन ॥ वेगें चालिला पिटीत स्यंदन ॥ अनर्थ करील द्रोण नंदन ॥ म्हणून जात त्वरेनें ॥१४३॥
आला देखोनि जगज्जीवन ॥ आनंदले पंडुनंदन ॥ श्रीरंगें अवघें वर्तमान ॥ जाहलें तितुकें कथियेलें ॥१४४॥
इकडे राजा दुर्यो धन ॥ धुळींत लोळे दीनवदन ॥ केश विखुरले चहूंकडून ॥ ते स्वहस्तें आकर्षीत ॥१४५॥
श्वासोच्छ्वास टाकूनि बोलत ॥ हे अवस्था कीं मज प्राप्त ॥ तों संजय आला तेथ ॥ खेदें स्फुंदत उभा पुढें ॥१४६॥
दुर्यो धन बोले दीन वदन ॥ माझीं माय बापें वृद्ध पूर्ण ॥ कोणासी जातील शरण ॥ आम्हांसी पाळा म्हणो नियां ॥१४७॥
पडिला माझा लक्ष्मण ॥ माझी स्त्री न ठेवी कदा प्राण ॥ अरे संजया तूं सांगें जाऊन ॥ गुरु सुतादि तिघांतें ॥१४८॥
मग संजयें जाऊनि वनांत ॥ तिघांसी केलें सर्व श्रुत ॥ मग कृपाचार्य कृतवर्मा कुपी सुत ॥ आले धांवत बैसोनि रथीं ॥१४९॥
तों दुर्यो धन पडला रण मंडळीं ॥ मुखीं सर्वांगीं माखली धुळी ॥ गदाघायें तलमळी ॥ हुंकारे बळी क्षणोक्षणीं ॥१५०॥
जें दुर्यो धनाचें कपाळ ॥ केशरकस्तूरीनें शोभे विशाळ ॥ तेथें पार्थाचे सायक सबळ ॥ बैसोनि रक्त वाहातसे ॥१५१॥
जो कुसुमशेजे अरुवारी ॥ भ्रमरमंचकीं पहुडे मंदिरीं ॥ तो गदा घायें धरित्री वरी ॥ कैसा लोळत पडिला हो ॥१५२॥
अकरा अक्षौहिणी दळाचा नाथ ॥ त्याभोंवतीं भूतें बैसलीं समस्त ॥ मांसवांटणी करीत ॥ पाहे तटस्थ उगाचि ॥१५३॥
कीटक मक्षिका बहु तोडिती ॥ हात हालवावयासी नाहीं शक्तीं ॥ अहा रे कर्माची कैसी गती ॥ पुढतपुढती बोल तसे ॥१५४॥
तों तिघे जवळी येऊन ॥ स्फुंदस्फुंदोनि करिती रोदन ॥ म्हणती दुर्यो धना तूं निधान ॥ चालिलासी यावरी ॥१५५॥
लक्ष्मी हे परम चंचल ॥ मरीचि जलन्याय ॥ सकल ॥ क्षणक्षणा फिरे काल ॥ कैसा येईल न कळे केव्हां ॥१५६॥
तंव तो दुर्यो धन बोलत ॥ तुम्हीं पराक्रम केले अद्भुत ॥ आम्ही जाहलों दैवहत ॥ ऐकोनि बोलत अश्वत्थामा ॥१५७॥
हात चोळूनि सत्वर ॥ दशनीं रगडिले अधर ॥ माझी शपथ निर्धार ॥ यावरी परिस राय तूं ॥१५८॥
पांडव आणि पांचाळ ॥ यांचीं शिरें आणितों नलगे वेळ ॥ हें आतांचि न करीं तत्काळ ॥ तरी मी द्रोणज कदा नव्हें ॥१५९॥
दुर्यो धन मनीं हर्षला ॥ उदकाचा घट आणविला ॥ अश्वत्थामा अभिषेकिला ॥ सेनापति म्हणू नियां ॥१६०॥
मग दुर्यो धनाची घेऊनि आज्ञा ॥ तिघे गेले पुढती वना ॥ वटवृक्षातळीं जाणा ॥ जाऊ नियां राहिले ॥१६१॥
आतां यावरी गुरु सुत ॥ पांडवशिविरांत करील अनर्थ ॥ रात्रीं जाऊनि अकस्मात ॥ प्राण घेईल बहुतांचे ॥१६२॥
एकेचि अध्यायीं जाण ॥ गदापर्व संपलें संपूर्ण ॥ पुढें सौप्तिक पर्व गहन ॥ रसाळ आतां परिसिजे ॥१६३॥
पांडुरंग ब्रह्मानंद ॥ जो साधु ह्रदया रविंद मिलिंद ॥ श्रीधरवरद प्रसिद्ध ॥ घोष गाजे बहुत पैं ॥१६४॥
पुढें सौप्तिकपर्व परमपावन ॥ श्रीधर मुख निमित्त करून ॥ बोलेल कैसें रुक्मिणीरमण ॥ ब्रह्मानंदें परिसा तें ॥१६५॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ गदा पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकावन्नाव्यांत कथियेला ॥१६६॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे दुर्यो धन पतनं नाम एकपंचाशत्तमाध्यायः ॥५१॥

॥ श्रीपांडवप्रताप गदापर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP