मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ३६ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ३६ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ३६ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीपांडुरंगपुर विहारा ॥ ब्रह्मानंदा अत्युदारा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीवरा ॥ जगद्वंद्या जगद्नुरो ॥१॥विद्वज्जन विश्रामधामा ॥ योगिजनमनो विहंगमा ॥ द्वारकाधीशा पुरुषोत्तमा ॥ नामरूपातीत तूं ॥२॥गोपीनयनाञ विकास मित्र ॥ विषकंठवंद्या शत पत्र नेत्रा ॥ कमलोद्भव जनका नीलगात्रा ॥ सुत्रामा महिमा नेणेचि ॥३॥उद्भव ह्रदयाञ मिलिंदा ॥ अक्रूरचित्त चात कजलदा ॥ क्षीराब्धि जामाता सुखकंदा ॥ द्विरदवरदा द्विजेंद्रवहना ॥४॥आनकदुंदु भितप महो दया ॥ पीतव सना कमला लया ॥ तुझी लीला पंढरीराया ॥ येथूनि पुढें वदवावी ॥५॥विराट पर्व मागें संपलें ॥ येथूनि उद्योग पर्व रसागळें ॥ वैशंपायनें कथियेलें ॥ वेद व्यास प्रसादें ॥६॥जन मेयया ऐसा श्रोता ॥ व्यास शिष्य मुख्य सरस वक्ता ॥ तेणें गाइली जे कथा ॥ तेचि आतां परिसिजे ॥७॥प्राकृत भाषा हे आरुष ॥ म्हणोनि न ठेवावा दोष ॥ मूळ भारतींचा सारांश ॥ अर्थ चतुरीं विलोकावा ॥८॥बहुत बोलतां वाढेल ग्रंथ ॥ ध्वनित बोलतां न कळे अर्थ ॥ पाल्हाळ संकोच टाकूनि परिमित ॥ रस सुरस वर्णिला ॥९॥आद्यंत न पाहतां अर्थ ॥ द्वेषें दोष ठेवी अकस्मात ॥ जाणिजे तो शत मूर्ख निश्चित ॥ नव्हे पंडित विवेकी ॥१०॥केवढी खळ आहे आपुली बुद्धी ॥ महा चतुरांचे ग्रंथ निंदी ॥ नसता दोष ठेवी कुबुद्धी ॥ तरी पडेल बंदीं यमाचे ॥११॥श्रीधर विनवी पंडितां ॥ पुढें ऐकावी रसाळ कथा ॥ विराट पर्व संततां ॥ कथा शेवटीं वर्णिली ॥१२॥विराटें आपुली कन्या ॥ उत्तरा दिधली अभिमन्या ॥ सर्व नृप आले लग्ना ॥ आणि पांडवां भेटा वया ॥१३॥विराट नगरा समीप ग्राम ॥ उपलव्य जयाचें नाम ॥ पांडव नृपां सहित परम ॥ सुखें तेथें राहिले ॥१४॥ब्रह्मा नंदें पंडुनंदन ॥ सभेंत बैसले आनंद घन ॥ चतुर वृद्ध परम निपुण ॥ विराट द्रुपद बैसती ॥१५॥सात्यकी आणि रेवतीरमण ॥ निकट बैसती प्रीती करून ॥ श्रीरंग आणि फाल्गुन ॥ भेटोनि जवळी बैसती ॥१६॥नकुल सहदेव भीमसेन ॥ हे धर्माचे पाठीसी विराज मान ॥ द्रौपदीचे पंच नंदन ॥ आणि अभिमन्यु पुढें शोभे ॥१७॥आणि कही राजे आप्त ॥ सभोंवते बैसले समस्त ॥ धृष्टद्युम्न आणि विराट सुत ॥ राज कुमार विराजती ॥१८॥वाघें राहवूनि समस्त ॥ उगे राहिले एक मुहूर्त ॥ कोणीही न बोले तेथ ॥ पाहती तटस्थ उगेचि ॥१९॥सुरम्य श्रीरंगाचें वदन ॥ समस्त पाहती विलोकून ॥ यावरी तो जगज्जीवन ॥ बोलता जाहला तेधवां ॥२०॥कौरवांचे अन्याय बहुत ॥ तुम्हीं देखिले ऐकिले समस्त ॥ पंडुरायाचें राज्य यथार्थ ॥ हें विख्यात जाणतां कीं ॥२१॥जेणें स्वसत्ताव सनें करूनी ॥ पालाणिली हे कुंभिनी ॥ सर्वही राजे जिंकूनी ॥ शत मख आचरला ॥२२॥त्या पंडुनृपाचे हे सुत ॥ त्रिभुवनीं विख्यात बलाद्भुत ॥ भीमार्जुनांचे पुरुषार्थ ॥ देखिले कीं समस्तीं ॥२३॥हिडिंब बक किर्मीर ॥ कीचक मारिले समग्र ॥ त्या भीमासी हे धार्त राष्ट्र ॥ मारितां अशक्य काय असे ॥२४॥खांडववन देऊनि समग्र ॥ सुखी केला वैश्वानर ॥ निर्जरां सहित निर्जरेंद्र ॥ केला जर्जर समरांगणीं ॥२५॥निवात कवचांचा पुशिला ठाव ॥ शेवटीं कौरव पळविले सर्व ॥ गोग्रहण काली अभिनव ॥ पुरुषार्थ केला धनंजयें ॥२६॥ऐसा अंगीं पुरुषार्थ ॥ परी यांहीं रक्षिलें सत्य ॥ वनवास आणि अज्ञात ॥ त्रयोदश वर्षें क्रमियेलीं ॥२७॥अजात शत्रु धर्मनृपती ॥ केवळ भोळा चक्रवर्ती ॥ त्यासी जिंकूनि कपटद्यूतीं ॥ गांजिली सती द्रौपदी ॥२८॥तरी दुर्योधनाचा समाचार ॥ घ्यावया आतां काय उशीर ॥ राज्य विभाग समग्र ॥ देतो किंवा नाहीं तो ॥२९॥नाहीं तरी तुम्ही आम्ही आप्त ॥ पांडवांचे आहों समस्त ॥ युद्ध करूनि अद्भुत ॥ कौरव दुष्ट संहारावे ॥३०॥जेवीं मातेचिया कैवारें ॥ अवनी निःक्षत्रिय केली परशुधरें ॥ तेवीं द्रौपदीचे मिषें समग्रें ॥ कौरव सपक्ष आटती ॥३१॥पंडूचे पंच कुल दीपक सुढाळ ॥ मम स्नेहें भरित तेजाळ ॥ त्यांवरी पडतां कौरव पतंग सकळ ॥ भस्म होती सपक्ष ते ॥३२॥कीं उगवले पंचा दित्य ॥ तेथें कायसे कौरव खद्योत ॥ त्रयोदश वर्षें रजनींत ॥ झगमगीत होते पैं ॥३३॥पंच पांडव कुठार तीक्ष्ण ॥ मी धर्ता स्वसत्तें करून ॥ छेदीन कौरव वृक्ष दारुण ॥ शाखां उपशाखां समवेत ॥३४॥कीं हे पांडव पंच प्रलयाग्न ॥ मी साह्य सबळ प्रभंजन ॥ कौरव शुष्ककंटक विपिन ॥ जाळीन क्षण न लागतां ॥३५।यावरी बोले रोहिणी सुत ॥ होय धर्मदुर्योधनांचें हित ॥ तो प्रकार करावा बहुत ॥ दीजे राज्य अर्ध वांटूनी ॥३६॥तरी एक शिष्ट द्यावा पाठवून ॥ त्यांचें करी समाधान ॥ विदुर कृपाचार्य भीष्म द्रोण ॥ तेथें वडील आहेत ॥३७॥युद्ध न करावें साचार ॥ साम करावें हा निर्धार ॥ धर्में द्यूत खेळूनि समग्र ॥ राज्य आपुलें हारविलें ॥३८॥शकुनीचा अन्याय काय तेथ ॥ तों सात्यकी बोले क्रोध युक्त ॥ म्हणे कृष्णा ग्रजा तूं यथार्थ ॥ दुर्जनांचा पाठिराखा ॥३९॥धर्मराज भोळा अत्यंत ॥ दुर्जनीं कपटें जिंकिलें सत्य ॥ उद्यां कौरव रणीं मारूनि समस्त ॥ धर्मा पुढें पहुडवीन ॥४०॥महा पुरुषार्थी पंच वीर ॥ हे प्रतिपांडव पंच कुमार ॥ हा प्रत्यर्जुन सौभद्र ॥ यापुढें समरीं कोण तगे ॥४१॥क्षत्रिय धर्म हा साचार ॥ कीं दुर्जन संहारावे समग्र ॥ द्दष्टीं देखतां मारक विखार ॥ तोंड आधीं ठेंचावें ॥४२॥कीं वृश्चिक द्दष्टीं देखोन ॥ पादरक्षेनें करिजे चूर्ण ॥ परपीडक संहारून ॥ आधीं टाकावे धर्म हा ॥४३॥धर्में यावरी तत्त्वतां ॥ कदा न धरावी नम्रता ॥ राज्य न देतां समस्तां ॥ मृत्यु नगरा धाडावें ॥४४॥राज्य घ्यावें हिरोन ॥ अथवा आपुले वेंचावे प्राण ॥ मग काय व्यर्थ वांचोन ॥ षंढवत संसारीं ॥४५॥धर्मा ऐक माझें उत्तर ॥ धाकुटे अथवा वडील वीर ॥ त्यांसी सांगोनि पाठवीं नमस्कार ॥ वचनें नम्र बोलावीं ॥४६॥आपुल्या सामर्थ्यवैभवें करुन ॥ शत्रु विभांडावे संपूर्ण ॥ इतुकें नव्हे तरी कृष्ण वदन ॥ करून जावें वनांतरीं ॥४७॥पुरुष लक्षण हेंचि परम ॥ जों कुडींत आहे आत्माराम ॥ तोंवरी पुरुषार्थाचा संभ्रस ॥ ब्रह्मांड भरी दाविजे ॥४८॥यावरी द्रौपदी बोले वचन ॥ परम पापात्मा दुर्योधन ॥ त्याशीं गेलियाही प्राण ॥ मृदु वचन न बोलावें ॥४९॥वृक व्याघ्र विखार पाहें ॥ यांशीं मृदु बोलोनि साध्य काय ॥ पत्रें पाठवूनि सकळ राय ॥ सत्वर आधीं बोलावा ॥५०॥त्वरा करा आतां बहुत ॥ भगदत्तादि राजे समस्त ॥ छप्पन्न देशींचे नृपनाथ ॥ बोलावा सत्वर त्यां आधीं ॥५१॥चतुःसमुद्र पर्यंत ॥ सप्तद्वीप नव खंडांत ॥ वसती राजे समस्त ॥ आधीं येथें बोलावा ॥५२॥सहस्त्र कामें सोडून ॥ आधीं पत्रें पाठवा लिहून ॥ दुर्योधन प्रार्थून ॥ नेईल आधीं एकादा ॥५३॥पांचाल राज बोलिला तेव्हा ॥ आमुचा पुरोहित चतुर बरवा ॥ तो पुढें पाठवावा ॥ कुंजर पुरासी ये वेळे ॥५४॥श्रीरंग म्हणे राया सुजाणा ॥ बोलिलासी उत्तम वचना ॥ एक शिष्ट पाठवूनि आणा मना ॥ अंतर त्यांचें कैसें असे ॥५५॥साम भेद दंड करून ॥ शत्रु करावे आपणा धीन ॥ ओळखूनि पराचें चिन्ह ॥ चतुरें तैसेंचि वर्तावें ॥५६॥मंत्रें आकर्षिजे विषधर ॥ उदकें शांत वावा वैश्वानर ॥ वेदांत ज्ञानें भवसमुद्र ॥ उतरूनि जावें पैलपारा ॥५७॥काम क्रोध शत्रु समग्र ॥ ते विवेकीं जिंकावे साचार ॥ भक्तिबळें ईश्वर ॥ आपणाधीन करावा ॥५८॥शमदमबळें करून ॥ मनोजय करिती सज्ञान ॥ व्युत्पत्तीच्या बळें गहन ॥ अर्थ काढिती पंडित ॥५९॥पाषाणा खालीं सांपडे हस्त ॥ तो युक्तीनें काढावा अकस्मात ॥ बळें करूनि ओढितां तेथा ॥ व्यथा प्राप्त पैं ॥६०॥तैसा आधीं साम करून ॥ वश करावा सुयोधन ॥ समयोचित जाणे चिन्ह ॥ ऐसा शिष्ट पाठवावा ॥६१॥सभेसी बैसतां जाऊन ॥ दिसे जैसा वाचस्पति समान ॥ सरस्वती ज्यासी प्रसन्न ॥ समयो चित शब्द देत ॥६२॥वेद शास्त्र पुराण ॥ हें ज्यासी करतला मल कवत पूर्ण ॥ तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ सभा स्थानीं तेवीं दिसे ॥६३॥जरी वरी शत्रु लोटले समप्त ॥ त्या समयीं जैसा वैवस्वत ॥ कीं दुसरा कल शोद्भव सत्य ॥ शत्रु सागर प्राशावया ॥६४॥ह्र्दय निर्मळ कापटयरहित ॥ भोळा जैसा उमाकांत ॥ श्रेष्ठत्वें सभेंत मिरवत ॥ शचीनाथ जयापरी ॥६५॥वारण चक्रांत रिघोन ॥ आपुलें कार्य साधी पंचानन ॥ कीं एकलाचि जाऊनि सुपर्ण ॥ अमृत घेऊन जेवीं आला ॥६६॥कीं एकला जाऊनि गुरु पुत्र ॥ साधूनि ये संजीवनी मंत्र ॥ कीं सागर उतरूनि रुद्रावतार ॥ शुद्धि करूनि परतला ॥६७॥तैसेंचि कार्य साधून ॥ सत्वर येई जो परतोन ॥ ऐसा पाठवावा निवडून ॥ शीघ्रकाळेंचि तत्त्वतां ॥६८॥आम्ही आलों येथें लग्ना ॥ जातों आपुलिया स्वस्थाना ॥ बोलावूं पाठवा मही रत्नां ॥ आम्हां सहित ॥६९॥मग बैसोनि आपुल्या रथीं ॥ द्वारकेसी गेले रुक्मिणीपती ॥ इकडे सर्व रायांसी धर्मनृपती ॥ पाठवी बोलावूं तेधवां ॥७०॥धर्माचीं पत्रें घेऊनी ॥ अपार हेर धांवती ते क्षणीं ॥ देशोदेशीं जाऊनी ॥ निघा म्हणती सत्वर ॥७१॥दुर्योधनें पत्रें पाठवूनि सत्वर ॥ राजे आणिले छत्रधर ॥ दळें मिळालीं अपार ॥ कुंजरपुरा भोंवतीं ॥७२॥पांडव प्रिय जे कां नृपती ॥ ते विराट नगरा प्रति जाती ॥ त्यांसी सामोरा जाऊनि प्रीतीं ॥ धर्म आणी अत्यादरें ॥७३॥द्नुपद म्हणे उपाध्याया लागून ॥ चवर्यायशीं योनींत दिव्य रत्न ॥ नरदेह परम पावन ॥ श्रेष्ठ ब्राह्मण त्यांत तूंचि ॥७४॥त्याहीवरी तूं ब्रह्मवेत्ता वेदज्ञ बुद्धीनें कविगुरूं समान ॥ तुज साह्य तेथें पूर्ण ॥ विदुर असे धर्मात्मा ॥७५॥तोंवरी आम्ही दळें ॥ येथें मेळवितों सकळें ॥ मग शिष्यां सहित ते वेळे ॥ विप्र गेला गजपुरा ॥७६॥द्वारकेसी सुभद्रापती ॥ पाठवी सत्वर धर्मनृपती ॥ दुर्योधन समीरगतीं ॥ त्याही पुढें धांवत ॥७७॥कापटयनिधि सुयोधन ॥ त्वरें प्रवेशला कृष्ण सदन ॥ तें जाणोनि शतपत्र नयन ॥ निद्रा करीत निजशेजे ॥७८॥तों तेथें आला दुर्योधन ॥ म्हणे हा गोवळा छत्रहीन ॥ याचे पायथां बैसेन ॥ हें कालत्रयीं घडेना ॥७९॥उशाकडे जाऊनि सत्वर ॥ बैसला तो दुष्ट गांधार ॥ तों सवेंचि पातला सुभद्रावर ॥ तंव तो पायथां बैसला ॥८०॥ध्वज वज्र ऊर्ध्वरेखा समवेत ॥ जे तळवे सुंदर अति आरक्त ॥ सनका दिक जे ह्रदयीं ध्यात ॥ विलोकीत पार्थ प्रीतीनें ॥८१॥कोण वर्णी चरणरजांची थोरी ॥ उद्धरीली कमलोद्भव कुमारी ॥ केली कुञा दिव्य नारी ॥ स्पशोंनियां चरणरजें ॥८२॥वृंदावनींचे तृण पाषाण ॥ उद्धरिले चरणीं चालोन ॥ बळिराज नेऊन ॥ रसातळीं स्थापिला ॥८३॥तेचि तळवे आरक्त ॥ पार्थ स्वहस्तें तळहातित ॥ तों सत्वर उठोनि भगवंत ॥ विजया कडे पाहूं लागला ॥८४॥म्हणे का आलासी सखया पार्था ॥ येरू म्हणे विश्वव्यापका समर्था ॥ तूं गुरु देव माता पिता ॥ पाठिराखा आमुचा ॥८५॥सेना मिळाली संपूर्ण ॥ परी दीपाविण जैसें सदन ॥ जळाविण जेवीं अन्न ॥ तैसें तुजविण दिसतसे ॥८६॥मग बोले दुर्योधन ॥ मी आधीं बैसलों येऊन ॥ म्हणे वृष्णि कुल भूषण ॥ म्यां अर्जुन देखिला आधीं ॥८७॥मज नाहीं युद्ध करणें ॥ अथवा समरीं शस्त्र धरणें ॥ फुकट नेऊनि काय पाळणें ॥ अर्जुनेंही आम्हांसी ॥८८॥माझे नारायणगण बहुत ॥ सेना आहे अपरिमित ॥ पार्था दुर्योधना ॥ सांग यथार्थ ॥ दोहींत काय आवडे तें ॥८९॥पार्थ म्हणे तूं शस्त्र न धरीं ॥ अथवा समरीं युद्ध न करीं ॥ तूं कृपाद्दष्टीनें मुरारी ॥ विलोकूनि पाहें आम्हांतें ॥९०॥दुरूनि पाहे कूर्मीण ॥ तेणें पिलियां होत अमृतपान ॥ तूं नुसताचि येऊन ॥ उभा राहें श्रीरंग ॥९१॥दुर्योधन म्हणे जगज्जीवना ॥ देईं आम्हांसी अवघी सेना ॥ तुज निःशस्त्रिया येऊनि जाणा ॥ काय कारण सांग पां ॥९२॥जाहलें जें वर्तमान ॥ बलरा मासी सांगे दुर्योधन ॥ तूं श्रीगुरु माझा येऊन ॥ करीं साह्य सर्वही ॥९३॥बलराम म्हणे ऐक निवाडें ॥ कृष्ण परब्रह्म जाण तिकडे ॥ त्यासी टाकूनि मज तुम्हां कडे ॥ येतां न ये निश्चियेंशीं ॥९४॥तरी मी इकडे ना तिकडे पाहें ॥ न होईं कदा मी कोणासी साह्य ॥ तरी दुर्योधना तूं जाईं लवलाहें ॥ क्षात्रधर्में युद्ध करीं ॥९५॥एक अक्षौहिणी दळा सहित ॥ कृतवर्मा यादव विख्यात ॥ तो नेईं तूं साह्यार्थ ॥ युद्ध अद्भुत करावें ॥९६॥असो कृतवर्म्या सहित दळ घेऊन ॥ गजपुरा गेला दुर्योधन ॥ इकडे धनंजयासी बोले मन मोहन ॥ तूं कां मज घेतलें ॥९७॥पार्थ म्हणे जगत्पती ॥ तूं बैसें माझे मनोरथीं ॥ तुज ऐसा असतां सारथी ॥ शिक्षा लावीन कृतांता ॥९८॥रथीं बैसोनि पार्थ रुक्मिणीकांत ॥ गेले धर्मासी भेटा वया त्वरित ॥ इकडे शल्यासी बोलावूं निश्चित ॥ धर्मरायें पाठविलें ॥९९॥अर्धयोजन रुंद पृतना ॥ मार्गें जातां होय गर्जना ॥ तों माद्रीचा बंधु पंडुनंदनां ॥ साह्य चालिला वेगेंशीं ॥१००॥तिकडे शल्य जातो जाणोन ॥ गुप्तरूपें दुर्योधन ॥ चतुर सेवक पाठवून ॥ उपचार मार्गीं समर्पी ॥१०१॥वस्तीस अगणित सुंदरें ॥ मार्गीं निर्मिलीं चंदनागारें ॥ सुगंध उदकें मनोहरें ॥ अष्ट भोग ठायीं ठायीं ॥१०२॥ते अष्ट भोग कोण कोण ॥ ऐका तयांची नाम खूण ॥ सुगंध वनिता वस्त्र गायन ॥ तांबूल भोजन अनुक्रमें ॥१०३॥शय्या आणि दीपक ॥ अष्ट भोग हेचि सम्यक ॥ षड्रस अन्नें सुरेख ॥ अनुक्रमें समर्पिलीं ॥१०४॥सुयोधनाचे प्रधान ॥ शल्या पुढें राबती प्रीती करूण ॥ समयो चित समर्पिती आणून ॥ जाहला प्रसन्न शल्य तेव्हां ॥१०५॥म्हणे मागाल तें देईन ॥ तों गुप्तरूपें प्रकटे दुर्योधन ॥ म्हणे हे माझी सेवा संपूर्ण ॥ होईं तूं प्रसन्न मजलागीं ॥१०६॥मज सहाय होऊनि देईं यश ॥ मग तो शल्य म्हणे अवश्य ॥ दुर्योधना तूं जाईं नगरास ॥ मी धर्मास भेटोनि येतों पैं ॥१०७॥दुर्योधन बोले नम्र वचन ॥ सांभाळीं आपुलें वरदान ॥ शल्यें अवश्य म्हणोन ॥ उपलव्या प्रति आला ॥१०८॥तेथें उतरूनि सावकाश ॥ शिबिरें उभविलीं आसमास ॥ तेथें स्नान संध्या कर्म सुरस ॥ सारूनियां ते वेळे ॥१०९॥पांडवां प्रति भेटोन ॥ दिधलें परम समाधान ॥ म्हणे तुम्ही वनवास भोगून ॥ परम कष्ट पावलां ॥११०॥धर्मा तूं परम पावन ॥ नलहरिश्चंद्रां समान ॥ असो तुझिया पत्रा वरून ॥ सेने सहित येत होतों ॥१११॥मज दुर्योधनें ठकवून ॥ गोवूनि केलें आपणा धीन ॥ मग अजात शत्रु बोले वचन ॥ अवश्य जाईं मातुला ॥११२॥परी इतुकें देईं मज लागून ॥ तूं अश्व ह्रदय जाणसी संपूर्ण ॥ तरी तूं कर्णाचें सारथ्य करून ॥ तेजो भंग करीं त्याचा ॥११३॥आमुचा प्रताप वर्णीं ॥ करीं तयाची तेजोहानी ॥ हें अयोग्य परी ये क्षणीं ॥ अंगीकारीं आम्हां करितां ॥११४॥अवश्य म्हणे शल्य वीर ॥ रणीं त्याचा मोडीन धीर ॥ बलक्षीण करूनि समग्र ॥ यश येईल तुम्हांतें ॥११५॥सर्वोपचारीं तोषविला ॥ शल्य गजपुरा प्रति गेला ॥ इकडे पांडवांकडे आला ॥ सात्यकी निजदळेंशीं ॥११६॥धर्मा भोंवतें ते क्षणीं ॥ दळ मिळालें सात अक्षौहिणी ॥ तिकडे एकादशाक्षौहिणी वाहिनी ॥ दुर्योधनें मेळविली ॥११७॥सकळ यादवां सहित ॥ कृतवर्मा आला तेथ ॥ सौबल कांबोज जयद्रथ ॥ यवन मंडळी पातली ॥११८॥पर्वतीय राजे अपार ॥ सेने सहित आले सत्वर ॥ असो द्रुपदाचा पुरोहित विप्र ॥ सत्वर भेटला दुर्योधना ॥११९॥त्याचा करूनि सन्मान ॥ दुर्योधन पुसे वर्त मान ॥ विप्र म्हणे मज लागून ॥ द्नुपदरायें धाडिलें ॥१२०॥तुम्ही राज्य करितां विशेष ॥ पांडवांसी कां वनवास ॥ अनर्थ करूनि बहुवस ॥ त्यांसी बाहेर घातलें ॥१२१॥तरी तुम्हीं मैत्री करून ॥ कलह टाकावा वारून ॥ परम महाबळी अर्जुन ॥ साह्य भगवान तयांसी ॥१२२॥अकरा अक्षौहिणी दळ संपूर्ण ॥ न होय एका अर्जुना समान ॥ बलाधिक्य तो भीम सेन ॥ रणीं कृतान्त सबळ जो ॥१२३॥ऐसे पांडव बलवंत होती ॥ तुम्हांशीं मैत्रीं करूं इच्छिती ॥ धन्य धन्य तेचि जगतीं ॥ बंधु तुमचे निर्धारें ॥१२४॥यावरी बोले सूर्य नंदन ॥ पांडव गेले प्रतिज्ञा बोलून ॥ मूर्ख हो तें खरें करून ॥ दाखवा आधीं म्हणावें ॥१२५॥एक पाऊल मात्र मेदिनी ॥ नेदूं तयांसी ये क्षणीं ॥ त्यांसी सांगा जाऊनी ॥ भय सांडूनि युद्धासी या ॥१२६॥विराट नगरीं गुप्त राहिले ॥ परी आम्हीं तेव्हांचि ओळखिले ॥ पुनः वनवास करा वहिले ॥ मग या बळें युद्धासी ॥१२७॥अथवा याच कवृत्ति धरून ॥ या आधीं आम्हांसी शरण ॥ मग एकादा ग्राम देऊन ॥ करूं रक्षण तुमचें पैं ॥१२८॥गंगात्मज बोले वचना ॥ गोग्रहणीं एकल्या अर्जुना ॥ कां रे जिंकिलें नाहीं कर्णा ॥ आतां वल्गना क्रितोसी ॥१२९॥शस्त्रें अस्त्रें सांडून ॥ आलासी गजपुरीं पळोन ॥ भीमें कीचक टाकिले मारून ॥ तूंचि मनीं आठवीं कीं ॥१३०॥अनिवार अर्जुनाचे बाण ॥ घेतील जेव्हां तुमचा प्राण ॥ तेव्हां आठवाल आमुचें वचन ॥ कलेवर त्याग करितां पैं ॥१३१॥कौरवांची आज्ञा घेऊन ॥ गेला द्रुपदाचा ब्राह्मण ॥ पांचाल रायासी वर्तमान ॥ जाहलें तेंचि सांगितलें ॥१३२॥इकडे धृत राष्ट्र बोले ते अवसरीं ॥ संजया तूं जाईं तेथवरी ॥ माझा आशीर्वाद सांगोनि लवकरी ॥ अंतर त्यांचें शोधीं कां ॥१३३॥मैत्री करावया इच्छिती ॥ किंवा समर भूमीसी भिडती ॥ ते आहेत पुण्यवंत सुमती ॥ स्नेह वाढविती सर्वांशीं ॥१३४॥ते पांचही प्रलयाग्न ॥ क्षणांत जाळिती शत्रुकानन ॥ यादव कुल पंचानन ॥ त्यांसी साह्य सर्वस्वें ॥१३५॥बहु तपें पुण्य थोर ॥ प्रति शंकर युधिष्ठिर ॥ क्रोधद्दष्टीनेंचि समग्र ॥ भस्म करील शत्रूंतें ॥१३६॥तरी संजया तूं जाऊन ॥ बोलें धर्मासी नम्रवचन ॥ मग चालिला तो रथीं बैसोन ॥ उपल व्यासी पावला ॥१३७॥पांचही कौंतेय अनुक्रमें करून ॥ संजयासी देती आलिंगन ॥ म्हणती वृद्ध सुखी कीं अवघे जण ॥ पुत्र पौत्रां समवेत ॥१३८॥संजय म्हणे सुखी अवघे जण ॥ रायें तुम्हांसी सांगितलें आशी र्वचन ॥ पांडव म्हणती रात्रं दिन ॥ त्यांचे चरण स्मरतों आम्ही ॥१३९॥हस्तिनापुरींचे विप्र ॥ सुखी कीं पुसे युधिष्ठिर ॥ ब्राह्मणांचे मान समग्र ॥ दुर्योधन रक्षितो कीं ॥१४०॥वृद्ध आणि गुरु यांचें सेवन ॥ सदा करितो कीं मनांतून ॥ दान याग मित्ररक्षण ॥ प्रजापालन करितो कीं ॥१४१॥पांडवांपासूनि पापाचरण ॥ घडलें म्हणती कीं नाहीं जन ॥ भीमार्जुनांचा पराक्रम पूर्ण ॥ दुर्योधन स्मरतो कीं ॥१४२॥गंधर्वांहातींचा सोडवून ॥ चुक विला मरणा पासून ॥ तें आठ वितो कीं सुयोधन ॥ उपकार मनीं मानितो कीं ॥१४३॥संजय म्हणे धर्मात्मजा ॥ सोमवंश विजय ध्वजा ॥ नागपुरिंच्या सर्व प्रजा ॥ तुज कल्याण चिंतिती ॥१४४॥प्रज्ञाचक्षु आदि करूनी ॥ द्रोण भीष्मा दिकांचे मनीं ॥ द्दढ मैत्री साधूनी ॥ अर्ध राज्य द्यावें तुम्हां ॥१४५॥युयुधान विराट द्रुपद ॥ समस्तही ऐका नृपवृंद ॥ उभय पक्षीं कल्याण आनंद ॥ तेंचि सर्व करा तुम्ही ॥१४६॥स्वर्धुनीतनय भारद्वाज शारद्वत ॥ साम करावें सर्वांचें मनोगत ॥ यावरी युधिष्ठिर बोलत ॥ हेंचि मनीं माझिया ॥१४७॥परी प्रज्ञाचक्षु राजेश्वर ॥ पुत्र लोभें भ्रमला थोर ॥ सद्वुद्धी पासूनि भ्रष्टला ज्येष्ठ पुत्र ॥ तयासी विचार न सांगे ॥१४८॥दुर्योधनाचे मनीं ॥ आपण भोगावी सर्व कुंभिनी ॥ त्या चिया गर्वाहूनि ठेंगणी ॥ वाढी झाली मेरूची ॥१४९॥परी हरिध्वज नयनीं ॥ देखिला नाहीं जों रणमेदिनीं ॥ खगवर ध्वज स्यंदनीं ॥ पुढें आरूढला नाहीं जों ॥१५०॥तोंवरीच हे वल्गना ॥ बोलतां गोड वाटे सुयोधना ॥ गदे सहित जों भीमसेना ॥ रणांगणीं न देखिलें ॥१५१॥संजया जाऊनि त्वरित ॥ सांग हें पाकशासन प्रस्थ ॥ पंडुरायाचें राज्य समस्त ॥ परी आम्हीं गजपुर दिलें तूतें ॥१५२॥त्यावरी वैकुंठींचा वेल्हाळ ॥ रुक्मिणी मान ससरोवर मराळ ॥ भक्त काम कल्पद्रुम तमालनीळ ॥ मेघ गंभीर गिरा बोले ॥१५३॥क्षत्रिय धर्म आचरून ॥ राज्य घ्यावें पराक्रमें करून ॥ तरी इह परत्र कीर्ति पूर्ण ॥ दुकदुमेल धर्म राजा ॥१५४॥क्षत्रिय धर्म आचरतां जाण ॥ जरी पावलां समरीं मरण ॥ तरी उत्तम लोक पावोन ॥ कीर्ति होय त्रिभुवनीं ॥१५५॥संजया जाऊनि सांग सत्वर ॥ दे पांडवांसी राज्य समग्र ॥ मग ते तुज देतील गजपुर ॥ बंधु म्हणोनि प्रीतीनें ॥१५६॥मरण त्याचें जवळी आलें ॥ तरीच तेणें दळ मेळविलें ॥ नायके वृद्धांचें शिकविलें ॥ अवश्य काळ चुकेना ॥१५७॥कपटद्यूत खेळले जे वेळीं ॥ दुःशा सनें धांवूनि पांचाळी ॥ केशीं धरूनि सभेसी नेली ॥ दीन अनाथ जैसी कां ॥१५८॥कोरव जन परम दुर्जन ॥ कर्णा दिकीं सोडिले शब्द बाण ॥ ते घाय अजूनि जाण ॥ नाहीं मिळाले संजया ॥१५९॥दुर्यो धन शकुनि दुःशासन ॥ यांच्या रक्तें भूलिंगासी होईल स्नपन ॥ कर्णाचें शिर जाईल उडोन ॥ घाय मिळतील तेव्हां तें ॥१६०॥पांच पांडव प्रलयानळ ॥ त्यांसी नांव ठेविलें षढतीळ ॥ पांचाळीचीं वस्त्रें हिरूनि सकळ ॥ सभेंत वल्कलें नेसविलीं ॥१६१॥असो सर्वांसी विचारून ॥ संजय चालिला तेथून ॥ धर्मराज बोले वचन ॥ वृद्धासी नमन सांग माझें ॥१६२॥भीष्म द्रोण शारद्वत ॥ गजपुरींचे विप्र प्रति आदित्य ॥ प्रज्ञा चक्षु विदुरादि समस्त ॥ सांग नमन माझें सर्वां ॥१६३॥कुंती गांधारी माता ॥ यांचिया चरणांवरी माझा माथा ॥ आम्ही सुखी आहों सांग समस्तां ॥ श्री कृष्ण दयेंकरूनियां ॥१६४॥धृतराष्ट्राचे चरण ॥ वंदूनि सांगें इतुकें वचन ॥ पंचग्राम देईं आम्हां लागून ॥ नामा भिधानें ऐक पां ॥१६५॥अविस्थळ वृकस्थळ जयंत ॥ वारूणावत आणि शक्रप्रस्थ ॥ इतुके देऊनि समस्त ॥ कलहमूळ खंडीं कां ॥१६६॥मग वस्त्राभारणीं ते वेळां ॥ संजय धर्में गौरविला ॥ निजरथीं बैसोनि पावला ॥ गजपुरा तत्काळ ॥१६७॥धृतराष्ट्रासी भेटोन ॥ झालें तें सांगें वर्त मान ॥ यावरी समस्त द्विज गृहांसी जाऊन ॥ धर्मवचनें निरोपी ॥१६८॥मागुती धृतराष्ट्रा जवळी येऊन ॥ संजय बोले हितवचन ॥ म्हणे आप्त दूरी दवडून ॥ अनाप्त जवळी केले तुवां ॥१६९॥चिंतामणि भिरकावून ॥ घेतले खांदां जड पाषाण ॥ अमृत घट उल्लंघून ॥ पिइजे धूण जैसें पां ॥१७०॥पूज्य मूर्ति ओसंडून ॥ गुरवाचे जैसे धरिले चरण ॥ राज कुमार वर टाकून ॥ नवरी वरी मृदंगिया ॥१७१॥पाडूनि देवळाचें शिखर ॥ भोंवतें घातलें आवार ॥ नागवूनि यात्रा समग्र ॥ अन्न सत्र घातलें ॥१७२॥फणस टाकूनि रसाळ ॥ प्रीतीनें घेतलें कनकफळ ॥ मुक्ताफळ टाकूनि तेजाळ ॥ गुंज जैसी घेतली ॥१७३॥गार घेऊनि टाकिला हिरा ॥ तम घेउनि दवडिलें दिनकरा ॥ पाच भिरकावूनि सत्वरा ॥ कांच जवळी रक्षिली ॥१७४॥परीस टाकूनि घेतला खडा ॥ पंडित देऊनि आणिला वेडा ॥ कल्पवृक्ष देऊनि रोकडा ॥ पलांडु घेतला जैसा कां ॥१७५॥निजसुख देऊनि घेतलें दुःख ॥ मृगमद टाकूनि घेतली राख ॥ चंदन टाकूइ सुरेख ॥ गोमय जैसें घेतलें ॥१७६॥तैसें राया केलें साचार ॥ वना धाडूनि पंडुकुमार ॥ कैंचे मेळवूनि नृपवर ॥ आप्त परम मानिले ॥१७७॥ऐकें धृतराष्ट्रा नृपती ॥ सर्वही लोक तुज निंदिती ॥ यावरी संजयाच्या वचनोक्ती ॥ उपेक्षीत वृद्ध तो ॥१७८॥मग दूत पाठवुनि सत्वर ॥ अंधें बोला विला विदुर ॥ म्हणे संजय वचन निष्ठुर ॥ बोलतो पहा मजलागीं ॥१७९॥त्याचीं वचनें ऐक साचार ॥ त्यासी द्यावें प्रत्युत्तर ॥ मग करावा विचार ॥ सामभेदें करोनी ॥१८०॥विदुरा हित सांगें मज प्रती ॥ आहे कैसी उत्तम नीती ॥ मज न गमे निश्चितीं ॥ चिंतानलीं पडियेलों ॥१८१॥यावरी तो विदुर ॥ वर्षेल ज्ञानाचा सागर ॥ तें ब्रह्मानंद श्रीधर ॥ वर्णील सार अभंग ॥१८२॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ उद्योगपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ छत्तिसाव्यांत कथियेला ॥१८३॥इति श्रीध्रकृते उद्योगपर्वणि षट्र्त्रिंशत्तमाध्ययः ॥३६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥॥ श्रीपांडवप्रताप उद्योगपर्व षटत्रिंशत्तमाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP