मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|श्रीहरिगीता|महाभूतविवेक प्रकरणम्| श्लोक ५८ ते ५९ महाभूतविवेक प्रकरणम् प्रारंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १६ श्लोक १७ ते १९ श्लोक २० ते २४ श्लोक २५ ते २७ श्लोक २८ ते २९ श्लोक ३० ते ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ श्लोक ४५ ते ४७ श्लोक ४८ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ ते ५९ श्लोक ६० ते ६२ श्लोक ६३ ते ६५ श्लोक ६६ श्लोक ६७ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९७ श्लोक ९८ ते १०० श्लोक १०१ ते १०६ श्लोक १०७ ते १०९ महाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ५८ ते ५९ वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते Tags : poempoetvaman panditwamanकविताकवीपुस्तकवामनवामन पंडित श्लोक ५८ ते ५९ Translation - भाषांतर निरंशेऽप्यंशमारोप्य कृत्स्नेंशे वेति पृच्छत: ॥तद्भाषयोत्तरं ब्रूते श्रुति: श्रोतृहितैषिणी ॥५८॥इहीं सकल ही आरोप केला ॥ किंवा सत्यांश असे सद्वस्तुला ॥मायादेवीच्या सकल हया लीला ॥ कोठे राहव्या ॥२५७॥स० - तूं बोलिलासी जीं प्रमाणें ॥ ती आम्हास ही भाग मानणें ॥परि श्रुति ह्रद्रत न जाणणें ॥ हें काई ॥२५८॥बाला लागलसे छंद ॥ तो एकाकीं न करवे बंद ॥बागुल आला गेला हा मिथ्या वाद ॥ बोलावा लागे ॥२५९॥तैशीच अथ्यारोप अपवाद श्रुति ॥ बोलून गेली सृष्टी उत्पत्ती ॥शेवटीं सकळ ही माया निश्चिती ॥ होंचि प्रतिपादिलें ॥२६०॥माया म्हणजे कांहीं नाहीं ॥ तें झालें आहे हयाचा वाद काई ॥परि मूर्ख तये ठांई ॥ वादा प्रवर्तले ॥२६१॥तयांचा वाद तुटावा ॥ सद्बोध चित्तीं आरूढावा ॥ म्हणोनी श्रुति स्मृति धांवा ॥ मारूं लागल्या ॥२६२॥तुम्हासी सांगू गेले स्वप्न ॥ तेथें कैचें अनुसंधान ॥कोठेंशंका समाधान ॥ करावें लागे ॥२६३॥कानाशी गोड वाटावें ॥ संषय सकळही फिटावे ॥ऐसे गुप्त धरुनि अंतरीं ठेवे ॥ श्रुति स्मृती बोलल्या ॥२६४॥माया मुळीच नाहीं म्हणतां ॥ उद्वेग वाटेल तुमचे चित्ता ॥म्हणोनी एकदेशीय सत्ता ॥ प्रतिपादिली ॥२६५॥परमात्मा याच रीती ॥ अर्जुनाप्रति बोधिती ॥“एकांशेन” जगत स्थिती ॥ म्हणजे मुळींच नाहीं ॥२६६॥“नासतो विद्यते भाव” इत्यादि ॥ बोलिले सिद्धांत आदी ॥परि तेथ अर्जुनाची बुद्धी ॥ कोती पाहिली ॥२६७॥म्हणोनी घेतला वळसा ॥ सप्तशत श्लोकमात्रीय रसा ॥तेव्हां “नष्टो मोह:स्मृतिर्लब्धा” या सरसा ॥ वाक्या अर्जुन बोलिला ॥२६८॥मुळींच कांहीं नाहीं म्हणावें ॥ तें कोणें कैसें प्रतिपादावें ॥म्हणोनी मायामय हें अघवे ॥ श्रुति कल्पित्या झाल्या ॥२६९॥त्याही कल्पना निराधार ॥ होती हयणोनी सदंश आधार ॥ घेउनी बोलियल्या सार ॥ सदैव इत्यादिना ॥२७०॥सत्तत्त्वमाश्रिता शक्ति: कल्पयेतसति विक्रिया: ॥वर्णा भित्तिगता भित्तौ चित्रं नानाविथं तधा ॥५९॥जैसें कां भिंती वरती ॥ रंगें नाना चित्रें उमटती ॥तैशीच ही चिच्छक्ति ॥ विकारली जगती ॥२७१॥पर्वत नदी डोंगर ॥ वर्णचि दिसती नानाकार ॥तैसीच ही मायादेवी साकार ॥ एकलीच विलसे ॥२७२॥तियैचा अभासभासु ॥ सद्वस्तु वरती विलासु ॥ कैसा झाला सावकाशु ॥ तोही सांगू ॥२७३॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP