मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १०७

क्रीडा खंड - अध्याय १०७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

होता चवदा वर्षे, गणपतिला पूर्ण तेधवां व्यास ।

मुनि गौतमादि आले, शिवदर्शन योजुनी पुढें परिसा ॥१॥

पार्वति वदली त्यांना, राक्षसविघ्नास नाहिंसें व्हावें ।

ऐसा उपाय सांगा, ऐकुन कथि इंद्रयाग या नांवें ॥२॥

पार्वति शिवआज्ञेनें, मुनिंकरवीं इंद्रयाग आरंभी ।

गणपति बघण्या आला, मंडपिं गेला सु-याग प्रारंभीं ॥३॥

इतक्यामध्यें तेथें, राक्षस कल नी द्वितीय मुर विकल ।

म्हैसेरुपीं आले, गणपति धरि त्यांस कीं जसा काल ॥४॥

गर गर फिरवुन फेकी, मृत झाले तेधवांच तत्काल ।

नंतर कुंडासंनिध, येउन निरखी गणेश शिवबाळ ॥५॥

बस्तास पूजितां कीं, फल देइल कामधेनु परि काय ।

ऐसें वदून सारें, याज्ञिक-पायस त्वरीत तो खाय ॥६॥

विध्वंसी यज्ञासी, यास्तव कोपे प्रचूरसा इंद्र ।

जिरवा गणेश मस्ती, देवांना ज्ञापितो स्वयें इंद्र ॥७॥

मयुरेशपूर सोडुन, अग्नी गेला म्हणून लोकांची ।

झाली दैना पाहुन, गणपति वन्ही नटून हरि त्यांची ॥८॥

नंतर इंद्रें केली, वायूला निरविसीच कीं आज्ञा ।

व्हावें गुप्त तुम्हीं कीं, पाहूं त्यांची कशी असे प्रज्ञा ॥९॥

इंद्रें उपाय केले, ते झाले सर्वथैवसे व्यर्थ ।

तेव्हां इंद्र गणेशा, आला कर जोडुनीच शरणार्थ ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP