मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
श्रीगुरुचरणीं चित्त लावी ...

श्री गुरूचे पद - श्रीगुरुचरणीं चित्त लावी ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


श्रीगुरुचरणीं चित्त लावी रे बापा ॥ध्रु.॥
माझें माझें बकतोसी । वाया वीण थींकतोसी८ ।
घडी घडी काळ टप लावी रे ॥१॥
द्रव्य दारा गारा सारा । सर्वासी पाहिजे थारा ।
शेवट हे माया मोकलावी रे ॥२॥
चक्रवती आले गेले । नेणो जीव किती मेले ।
बुद्धी हे अंतरीं निवळावी रे ॥३॥
येथुनिया तेथवरी । शाश्वत कल्याण हरी ।
पांच हि पंचकें निवेदावीं रें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP