मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
टाळी टाळी हा काळ काळें टा...

श्री कल्याणचे पद - टाळी टाळी हा काळ काळें टा...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


टाळी टाळी हा काळ काळें टाळी ।
टाळी टाळी हें जन्मदु:ख टाळी ॥धृ०॥
भागवतीं बोलिला वनमाळी । कथेमध्यें जो वाजवी टाळी ।
त्याची वंदितो चरणधुळी । माथा वोढवी श्री चंद्रमौळी ॥१॥
भक्तिभावा तुकला महाराजा । तुळसीदळ वंदी यदुराजा ।
वामनें सेविला बळिराजा । भीमातीरी नांदतो स्वामी माझा ॥२॥
कथेमध्यें मी तिष्टत आहे । ब्रह्मसुतेसी बोल बोलताहे ।
प्रेमटाळीसी नाम गर्जताहे । सर्व कल्याण त्यास चिंतिताहे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP