मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| निव्वळ भ्रांती मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी निव्वळ भ्रांती नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे. Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी निव्वळ भ्रांती Translation - भाषांतर - काय लिहून तरी करायचे आहे ? लिहिले, लागेल तितके लिहिले, काय त्याचा उपयोग ?- हं: उपयोग ? ते वाचून रडायचा !- काय तर ! आणि पुन: आहे काय त्याच्यात ? मला नाही वाटत कोणाला काही आवडत असेलसे. खंडीभर प्रश्नचिन्हे,उदगारचिन्हे आणि डॅशेस् ! फार झाले तर आग, भडका, हायहाय आणि हुईहुई !- खरेच ! मलासुध्दा असेच वाटते की, काय आहे त्याच्यात ?पण मी तरी काय करु ! वेड्यासारखा अतिशय गोंधळून जाऊन मीच जिथे तिथे डॅशेस् घेत बसलो आहे, तर उद्गारचिन्हाशिवाय आणि हाय हाय आणि हुईहुई शिवाय दुसरे माझ्या लिहिण्यात तरी काय असणार आहे ?- तू रडू नकोस ! पण मला आपले वाटते की, लिहून लिहून तरी काय मिळणार आहे ?- कीर्ती ? पण छे ! ती कुठली मला मिळायला !- कीर्ती ? हं: काय त्या कीर्तीत आहे, मला काही समजत नाही ! निव्वळ भ्रांती आहे झाले !- ती मिळायची नाही मला ठाऊक आहे. पण मला की नाही रहावतच नाही. धावतो आहे झाले !- अजून तरी तिचा नाद सोड. माझे ऐक.- नको माझे असे वरचेवर हातपाय मोडूस !- बाबारे, तिच्यापायी आपले जीवित आणि हा संसार दिवसेंदिवस उजाडच होत चालला आहे !- हरहर ! नको या यातना !- मरेपर्यंत ती तुला काही मिळायची नाही. आणि मेल्यावर तरी काय ? फार झाले तर एखाद्या मोठ्या वर्तमानपत्रात ती म्हणेल की, " कळविण्यास अत्यंत दु:ख वाटते की, मराठी वाचकांच्या पूर्ण परिचयात असलेले कविवर्य - "- हं: !- " दिवाकर यांस.... रोजी....ने देवाज्ञा झाली ! हे मोठे प्रतिभाशाली, स्वतंत्र आणि जोरदार विचारांचे कवी होते.यांचा पाश्चिमात्य काव्यनाटकांचा व्यासंग फार जबर होता."झाले संपले !- हं: हं: हं: ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP