मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग चोविसावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग चोविसावा Translation - भाषांतर कोटा - शहर रजपूत लोकांस परत द्यावें व यशवंतवायास तेथील राजपदावर स्थापावें अशा अर्थांचा पेशव्याकडून मल्हारराव होळकरास हुकूम येतो - कोटा शहरांत जिकडे तिकडे आनंद - नागरिक लोक यशवंतरावास तेथील राजपद स्वीकारण्याविषयीं प्रार्थना करितात - यशवंतराव ती अमान्य करितो - भूषणसिंगाचा मुलगा अभयसिंग यास कोटा देशाच्या गादीवर बसवावें अशी यशवंतरा्व सूचना करितो - ती सर्वांस मान्य होते - यशवंतराव अभयसिंगास जोधपुराहून आणून राज्यावर बसवितो - यशवंतरावाचा भूषणसिंगाचीकन्या लीलावती हिजशी विवाह - यशवंतराव अभयसिंगाच्या बालदशेंत राज्य कारभार सुरळीत चालेल अशी व्यवस्था करून कोटा शहर सोडितो - उपसंहार. श्लोक सकाळिं सूर्योदय जों न जाहला । पुण्याहुनी येउन दूत पावला ॥पुढें तदा ठेवुन राज - शासन । करीत तो होळकरास वंदन ॥१॥असेल पत्रार्थ समग्र कायसा । कळे तया पूर्वि विचित्र - साहसा ॥परंतु तें वंदुन पत्र वाचतो । पुराधिकारी यशवंत ऐकतो ॥२॥“ प्रधान पंत स्थित पुण्य - पत्तनीं । स्व - शौर्य - संपादित - वैभवाग्रणी ॥हुकूम हा होळकरास धाडिती । समग्र कोट्यांतिल जाणुनी स्थिती ॥३॥महाभुजा ! शौर्य तुझ्या भुजीं वसे । स्वराज्य - भाराश्रय तेंच कीं असे ॥तयावरी ठेवुन भार सर्व ही । सुखें वसो पाळित हिंदुची मही ॥४॥पराक्रमाचे तव दुंदुभि - ध्वनी । दुरून ऐकों बसुनी पुण्यांतुनी ॥विनम्र होऊन तुझ्याच दंडनीं । पुण्याकडे धाडिति भूप खंडणी ॥५॥शिवाजि शौर्याद्भुत - कृत्य - मंडित । स्वराज्य जें स्थापि युद्ध पंडित ॥तयास तूं स्तंभच होइजे सदा । कृती तुझी हिंदुस होउन सौख्यद ॥६॥प्रसंगि जे स्नेह अम्हांस दाविती । परंतु शत्रुत्व रनांत ठेविती ॥तयांसवें वैरच आपुलें बरें । घडे न मित्रत्व तयांसवें खरें ॥७॥कसा असावा पर - धर्म शर्मद । न मित्र दिल्ली - पति योग्य दुर्मद ॥विपक्ष जे नांदति उत्तरेकडे । निशाण चालो भगवें तयांपुढें ॥८॥मदांध तो मोंगल हिंदुंचा अरी । अनाथ लोकां छळणा किती करी ॥अशा प्रसंगीं स्वजनास मोकळें । करील सद्वीरच तो अम्हां कळे ॥९॥खरे इमानी रजपूत सद्भट । स्वधर्म - संरक्षण - दक्ष उद्धट ॥करूं पहातां निज देश मोकळा । तुवां तयां त्रास कशास तो दिला ? ॥१०॥अपार संपत्ति मिळेल आपणा । नकोच मैत्री सह मोंगलां जनां ॥विनाश झाला तरि हिंदुला तुवां । सहाय व्हावें चिर शौर्य - वैभवा ! ॥११॥महामनें भूषित शौर्य - संचय । स्व - धर्म - चारी रजपूत दुर्जय ॥सुखामधें राहुत वीर संतत । मराठि भाला न शिवो तयांप्रत ॥१२॥परस्परीं स्नेहच उत्तरोत्तर । असून वृद्धिंगत होउ तो स्थिर ॥करोत अस्मच्छिव - चिंतनास ते । अमाल्य पावोत सुखें स्वतंत्रते ॥१३॥सहाय आम्हां रजपूत होतिल । तरीच जातील लयास मोंगल ॥मराठि झेंडा अटकेस जाइल । भयार्त पंजाब तयास पाहिल ॥१४॥लढाइ कोटा - शहरासभोंवती । असेल जी आजवरी हि चालती ॥मनुष्य - हानी घडली तियेमधें । मनास ती आमुचिया विषाद दे ॥१५॥प्रहार शस्त्रें अमुचींच संगरीं । करून जे पाडिति हिंदु भूवरी ॥मही तयांच्या बहु लाल शोणितें । कलंक काळा अमुच्या सुकीर्तितें ॥१६॥आतां घडो जे घडलें पुन्हा नये । केला महाघोर अनर्थ हा स्वयें ॥झाडें वनीं आपटुनी दवाग्निला । तीं जन्म देती कुल - नाश हेतुला ॥१७॥करी तुझ्या लेख पडेल ज्या स्थळीं । तदा तिथे सोडुन देइजे कळी ॥स्वसैन्य मोर्चे उठवून आंवरीं । स्वहेतु विज्ञात तया पुरीं करीं ॥१८॥जनास आश्वासन पूर्ण देउन । निरालस प्रीतिस दाविं आपण ॥सुखांत नांदो घरदार वैभव । घडो न पीडा जप फार यास्तव ॥१९॥असो स्वतंत्र प्रिय आजपासुन । प्रसिद्ध कोटापुर विश्व - भूषण ॥न मोंगल श्वान शिवोत तें स्थळ । सदैव चालो रजपूत अंमल ॥२०॥महाबल ख्यात यशःप्रकाशित । गुणी रणाग्रीं यशवंत पंडित ॥स्ववर्तनें प्रीति अम्हांस फार दे । खुशाल त्यातें करूं थोरशा पदें ॥२१॥मराठि सैन्यीं सरदार उद्भट । बलाढ्य जे जे रण - कीर्ति - मंडित ॥तयांमधें हा विलसो, सुनायक । म्हणोत या आठ हजार राउत ॥२२॥जया जनां मानुन पुत्र संतत । करीं तयांचें निरपेक्ष तो हित ॥तयाच कोटा - शहरांतल्या जनीं । करूं तया भूपती आजपासुनी ॥२३॥महाजन श्रेष्ठ तया पुरामधीं । धनाढ्य जे जे गुण - नीतिचे निधी ॥समक्ष त्यांच्या बसवीं नृपासनीं । सुमित्र हातें यशवंत सद्गुणी ॥२४॥अनंतर श्रीयुत शौर्य - वैभवा ! । समागमें घेउन सैन्य तें तुवां ॥निजस्थळीं मालव - देशिं चालणें । न अन्य राजे रजपूत पीडणें ” ॥२५॥हुकूम जो धाडित पंतपेशवा । धरून मल्हार मनांत तेधवां ॥म्हणे मला हर्ष असा कसा दिला । सदाशिवें साधुन डाव आपला ! ॥२६॥अनिष्ट माझें दिनरात्र चिंतिता । नसून इच्छाहि करी महा हिता ॥समुद्र झुंजे गिरिशीं कधीं कधीं । अनर्घ्य रत्नें विखरी शिळांमधीं ॥२७॥मला जरी वागवितो अरीसम । सदाशिव प्रीतिस पात्र हा मम ॥सुतास माझ्या यशवंतराजया । समृद्ध केलें करितां मदप्रिया ॥२८॥स्वतंत्रता पौरजनांस लाधली । अशी सुवार्ता नगरांत फांकली ॥न पेशवे घेतिल देश आपणा । न मोंगला स्थान मिळेल हें पुन्हा ॥२९॥स्वराज्य येतें स्वकरामधें स्वयें । पळून जातात अनंत तीं भयें ॥जिथे मराठे करणार रक्षण । कुठून दुःखी असती तिथे जन ? ॥३०॥महामना दिल्लिर - भिल्ल - मर्दन । लहान थोरां सम - सौख्य - वर्धन ॥पुरस्थ - नारी - नर - नेत्र - नंदन । पुरास रक्षी यशवंत आपण ॥३१॥अनंत धीमंत बुधाभिनंदित । पुण्याहुनी येउन तेथ पावत ॥तयास पाहूं जन ते उतावळे । त्यजूनिया स्व - व्यवहार धांवले ॥३२॥सुविद्य वाचस्पतिपुत्र ज्यापरी । प्रवेश देवेंद्र - पुरामधें करी ॥तसा अनंत प्रिय - दर्शन स्वयें । महोत्सवें साजत आज आंत ये ॥३३॥कृतज्ञ तेव्हां यशवंत तो कृती । गुरूस साष्टांग करी नमस्कृती ॥तयास हातें उठवून सत्वर । उरीं स्व - शिष्या धरि धीमतांवर ॥३४॥कुलीन मानी रजपूत सज्जन । करीति ते होळकरास वंदन ॥सुखावले पावुन आदराप्रत । मनीं वसे द्वेष न लेश सांप्रत ॥३५॥कोट्यांत गोष्टी असल्या घडून । येतां तिथे होति जन प्रसन्न ॥त्या उत्सवीं तों यशवंतराया । उद्देशुनी लागति भाट गाया ॥३६॥“ त्वद्वाण दंडि बल - गर्वित शत्रु भारी ।तूं कालिदास असुनी भव - भूति - धारी ॥श्री - हर्ष - दायक अम्हां सकलां सुबंधो ! ।साष्टांग पात करूनी तुज लोक वंदो ॥३७॥अग्न्यत्रिपुत्र - विधि - शंकर - शंभुजांहीं ।जीं दोन तीन अणि चार हि पांच साही ॥वाटे मुखें धरिलिं जाणुन याच भावा ।एक्या मुखें तवगुण - स्तव केंवि व्हावा ? ” ॥३८॥अनंत ते दोहन मान सागर ।जमून हर्षें दुसरे हि नागर ॥नय - प्रवीणा यशवंतराजया ।समादरें लागति ते वदावया ॥३९॥“ समुचित - गुण ऐसा कांत विक्रांत पावे ।वरुन तुजसिं वाटे राज्यलक्ष्मी सुखावे ॥पितृसम परिपोषीं सुप्रजा स्वप्रजांतें ।चिर धरिं यशवंता राज्य - सूत्रांस हातें ॥४०॥तुजसम जन जे जे घेति या लोकिं जन्म ।करून मिळविती ते श्रेष्ठता थोर कर्म ॥म्हणुनि भरंवसा जो ठेविला याच पायीं ।व्यसन - शतिं हि राया रक्षिला त्वां उपायीं ॥४१॥स्तविति तव गुणांतें लोक हे लक्ष कोटी ।तुजविषयिं तयांच्या अंतरीं भक्ति मोठी ॥इतर नृप - पदातें योग्य नाहें मनुष्य ।नमुनि विनवितों हें आयकावें अवश्य ” ॥४२॥उदार यशवंत तो परिसुनी वचा यापरी ।सदुत्तर पित्याकडे बघुन पौरलोकां करीं ॥“ विनंति बहु नम्र मी करितसें तिला आयका ।विचार सगळे तुम्हीं मिळुनियां करावा निका ॥४३॥अहो सुजन थोर हो ! स्तवितसां मला पामरा ।उदारतर भाव हा तुमचिया मनींचा खरा ॥अशी न तरि काय मीं करणि केलि लोकोत्तरा ।तुम्हीं करितसां धनी मजसिं आपुल्या किंकरा ॥४४॥निरालसपणें पुरा झगडलों करूं रक्षण ।न दे जरि अरी बसूं सुखित शांत चित्तें क्षण ॥प्रभाव तुमचाच तो सकल जाणतों हें मनीं ।सहाय असतां तुम्ही भिइन काय काळा रणीं ? ॥४५॥लहानपण जेथ मीं दवडिलें सुखें खेळतां ।जिथील जन जाणते शिकविती सुविद्या स्वतां ॥अनंत उपकार तो किसनदास मातें करी ।अकारण - सुद्दत्तम प्रथम राहिला या पुरीं ॥४६॥जमीनिंत जया रूजे वट - फळांतलें बीज तें ।दिनीं दिनिं हि आर्द्रता जिथिल शोषुनी वाढतें ॥जमीनिस तया अशा तरू विशाल तो होउन ।स्वविस्तर भरें उन्हा धरि शिरीं करी रक्षण ॥४७॥स्व - धर्म - पर ज्या स्थळीं सदय लोक सौख्यें वसे ।अशी जननभूमि ही प्रिय नरा न कोणा असे ? ॥पदांत परतंत्रता पडलि थोर तीच्या बिडी ।अधन्य नर कोणता व्यसनिं या धरी आवडी ॥४८॥म्हणून झटलों जरी इथुन घालवूं मोंगलां ।निरिच्छ मम जीव हा क्षण न वैभवीं लोभला ॥नको मजसिं राज्य मी सविनय स्वयें प्रार्थितों ।न मंदमतिला गमे मजसिं मान हा शोभतो ॥४९॥अफाट विधिनें असे जग विचित्र हें निर्मित ।फिरेन मिळवीन मी सुयश वैभवें मंडित ॥पिता मम जसा स्वये मिळवि संपदा सन्मत ।तसें करिन संमत प्रिय तुम्हां असो मन्मत ॥५०॥स्वराज्याचे इथे असो जरि असे अशी कामना ।सुयुक्ति कथितों तुम्हां क्षण शिवो न शंका मना ॥वसे महित भूषण प्रिय पुरीं गुणालंकृत ।पुरातन - नृपान्वयीं जनन त्या घडे संमत ॥५१॥तयास अदयें जया समयिं दिल्लिरें मारिलें ।स्वकीय गृहिं रक्षिलीं जपुन मीं तयाचीं मुलें ॥कसे विसरतां ? अरी करिल घात हें वाढलें ।न जोधपुरिं काय मीं त्वरित त्यांजला धाडिलें ? ॥५२॥गुणी अभय भूषणात्मज सुरूप लीलावती ।खुशाल नृप मंदिरीं प्रथित त्या पुरी राहती ॥म्हणून ह्मणती तुम्ही अभयसिम्ग रामाप्रत ।निमंत्रण समादरें समुचितें करा सांप्रत ॥५३॥करील नृप राज्य तो सुगुण भूषणाचा सुत ।प्रजांस सतत श्रमें करिल शांत आनंदित ॥करीत असतां असा नृपति भूमिचें रक्षण ।तुम्हांसह हि साहसी कवण वैर बांधी क्षण ? ॥५४॥पुसाल जरि काय मी करिन तें तुम्हां सांगतों ।स्वहेतु पुरवावया जगदधीश्वरा प्रार्थितों ॥मला न करणें असे किमपि या पुरीं राहिलें ।शरीर मन आज मीं सदय पेशव्या वाहिलें ॥५५॥निशाण भगवें करीं धरुन रामदासार्पित ।स्वराज्य पसरीन मी करिन पूर्वजां तर्पित ॥बलाढ्य यवनांसवे झगडतां जिथे अर्पिला ।स्वदेह मम पूर्वजीं मजसिं तोच जागा भला ॥५६॥वयस्क पुरुषीं हठें समरिं देह देतां बळी ।स्वधर्म परिवर्धनीं प्रबळ आस जी ठेविली ॥तिला तरूण हे अम्ही न करूं काय हो पूरित ? ।निशाण भगवें हिमालय - शिरीं करूं रोपित ॥५७॥परंतु गत गोष्टिचें स्मरण होय जेव्हां मला ।स्मरेन सकळां तुम्हां सुखभरें तदा वत्सलां ॥शकेन जरि साह्य मी करूं तुम्हां असें वाटलें ।हुकूम मजसी करा गरिब मूल हें धाकुलें ॥५८॥प्रजेवरिच वर्षती अमित नित्य जे फायदे ।असे नर - पती करो स्वजन - शासनीं कायदे ॥गृह - स्थितिमधें असो भरभराट दुःखक्षय ।अनेकविध संपदांसहित येथ नांदो नय ॥५९॥असोत तुमचीं घरीं सुखित बायका लेंकरें ।स्वराज्य - सुख ही तुम्हां सतत थोर लाभो खरें ॥सदैव तुमचा असो सदय पाठिराखा हरी ।अशी नमुत मागणी प्रभु - वरा तया मी करीं ” ॥६०॥ऐसा सुनिश्चय करी यशवंतराय ।ते देति संमति नसे दुसरा उपाय ॥निर्लोभ आणिक उदार असें तयाचें, ।तें वाक्य मोहित जना करि रम्य साचें ॥६१॥जोधपुरास महाजन नंतर पाठविती ।नागर तेथुन भूषण - पुत्रक आणविती ॥नेमुन एक मुहूर्त सुमंगल - लग्न - युत ।स्थापिति राज - पदीं अभया यशवंतनुत ॥६२॥तें दिन तेथिल लोक अजूनहि आठविती ।गोष्टि जुन्या स्मरणीं सुखदायक सांठविती ॥क्रीडन गायन वादन नर्तन गान पुरीं ।चालति उत्सव त्या दुसरी न वसेच सरी ॥६३॥जे लोक प्रिय निज देश - रक्षणार्थ ।शौर्यानें लढुनच होति देह - मुक्त ॥त्यां त्यांच्या गरिब मुलांस ही स्त्रियांतें ।वात्सल्यें धन यशवंत देत हातें ॥६४॥जे जे होते कणत समरीं वार लागून भारी ।शुश्रूषेची तजविज करी त्यांचिया योग्य सारी ॥जे जे कष्टी रडति मरतां आप्त तत्सांत्वनानें ।यत्नें यत्नें सुखवि कमला - पुत्र तो दानमानें ॥६५॥राजा होय लहान यास्तव तया दे दोहनाच्या करीं ।कोशाधीश्वर मान सागर हि तो सेनापतित्वा धरी ॥मुख्यामात्यपदीं अनंत वसला ज्याची कुशाग्रा मती ।योजी त्या यशवंत युक्ति घडते जेणेंचि राज्योन्नती ॥६६॥अभयाप्रत मुख्य मुख्य त्याचे ।अधिकारी सुकृतज्ञ सुज्ञ साचे ॥उपदेशिति मागणी नृपाळा ।यशवंता करणें अशी दयाळा ॥६७॥“ केले अनंत उपकार तुवां तराया ।कोठून शक्ति मज त्यां यशवंतराया ॥आहें कृतज्ञ बहु लीन विचार - शीला ।विज्ञापना करिन सांप्रत ऐक तीला ॥६८॥तातानें भगिनीस आणिक मला हातीं तुझ्या दीधलें ।मातें राज - पदीं तुवां बसवुनी मद्भद्र संपादिलें ॥हातें घेउन पल्लव - प्रभ सख्या लीलावतीचा कर ।ने श्लाघ्या गृहिणी - पदास तिजला तूं हृष्ट तीतें कर ” ॥६९॥जावोनी यशवंत संनिध गळां प्रेमें मिठी घालुनी ।मंत्र्यानीं उपदिष्ट बाल - नृपती त्या आर्जवी भाषणीं ॥बोले तों यशवंत “ काय अभया याहून मातें प्रिय ? ।धिक्कारीन तुझें मनोगत असें मानूं नको तूं भय ॥७०॥होता तुझा जनक वांछित हेंच राया ।लीलावतीस मज उत्सुकता वराया ॥प्रेमा तिचा मजवरी बहु होय वाटे ।आज्ञापिसी सदय तूं हि असेंच मातें ॥७१॥सुरासुरच काय हे मिळति पौर ही दक्षणी ।बलाढ्य झटती हटें रण - पयोब्धिच्या मंथनीं ॥तुझा उदय जाहला म्हणुन जाण चंद्रासम ।शिवीं स्थिति तुला मिळे प्रिय असें घडे हें मम ॥७२॥लक्ष्मीस जेंवि हरि त्यापरि मी वरीन ।स्त्रीरत्न दुर्लभ तुझी अभया ! बहीण ॥संग्राम - सिंधु - मथनीं थकलों विसावा ।लीलावतीस वरूनी मजला मिळावा ” ॥७३॥भुवन - सुखद शोभे चंद्रिका जेंवि चंद्रा ।मिळुन विमल किंवा जन्हु - कन्या समुद्रा ॥वरून विलसली ती भूषणाची सुकन्या ।गुण निधि यशवंता होय या लोकि मान्या ॥७४॥आल्या गोष्टि अशा घडून पुरल्या इच्छा समस्तांचिया ।सैन्यें घेउन शूर होळकर तो संगें निघे जावया ॥तद्भार्या कमला गुणाढ्य सुतही लीलावती - संगत ।जाती - यास्तव होति लोक सगळे कोटापुरीं दुःखित ॥७५॥कन्या जामात नातू विनविति न असे शक्त देह श्रमाया ।राहें आम्हांस द्याया चिर सुख जवळी नित्य आनंदराया ॥योगी आनंद गेला पुनरपि परि तो दूर तीर्थाटनातें ।सार्थक्या देह लावी प्रभु - वर - चरणां चिंतुनी मंगलातें ॥७६॥या कालानंतर श्री - गुण - युत कमला - पुत्र देशाभिमानी ।दंडोनी पेशव्यांचे समरिं अरि तयां नम्र वृत्तीस आणी ॥मेघच्छन्ना रवीचा अवचित पडतां सृष्टि हर्षे प्रकाश ।तैसा विश्राम त्याचा अतिसुखद असा होय लीलावतीस ॥७७॥सुतभ्युदय पाहतां सुखित होय मल्हार तो ।वदे ‘ कवण धन्यता मजविणें जगीं पावतो ’ ॥सुतासह तया अरी समरिं गांठितां जर्जर ।ह्मणे मनिं ‘ अवार्य हा प्रबळ कीं जसा निर्जर ! ’ ॥७८॥फोडी सह्य - शिला दरींतुन निघे रानीं वनीं चालते ।वेगानें खडकाळ भूमिवरि जी ठेंचाळुनी भागते ॥कृष्णा तीच सपाट देशिं शिरतां शोभे प्रशांताकृती ।पाणी प्राशुन गोड निर्मळ तिचें सृष्टी सुखावे किती ! ॥७९॥तैसी पुत्रपराक्रमा परिसते पाहे स्नुषा - सद्गुण ।कांत - प्रेम - समादरें भरुनियां शांती धरी तन्मन ॥दुःखें पूर्ववयामधील कमला स्वप्नापरी मानिते ।नेते काल परोपकारिं तिजला होती कवी वानिते ॥८०॥समाप्त. N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP