मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग नववा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग नववा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग नववा Translation - भाषांतर मराठी फौजेची कोट्यावर चाल - बिनी - लढाऊ हत्ती - जरीपटका - स्वार - तोफखाना - पायदळ - मराठे लोक कोटा - शहराच्या वाटा बंद करून भोंवतालचा प्रदेश उध्वस्त करितात - मल्हारराव होळकराकडून कोटाशहर आपले ताब्यांत देण्यासाठीं यशवंतरायास ताकीद - त्याचे उत्तर - मराठ्याचा शहरावर हल्ला - रजपूत लोक त्यांस मागें हटवितात - मल्हारराव कोटा - शहरास वेढा घालून बसतो. श्लोकसकाळीं पुरस्थां जनां वीर मोठे । दुरूनी दिसूं लागले ते मराठे ॥सडे स्वार ते पांचशें एक ठायां । अशा येति टोळ्या लढाई कराया ॥१॥बिनी चालली ही पुढें थोर वेगें । उन्हामाजि तेजें कशी शोभुं लागे ! ॥कसे दक्षणी उंच हे थोर घोडे । हजारों तयीं बैसुनी स्वार दौडे ॥२॥निळे जांभळे पांढरे लाल वेष । फुलोनी जणो टाकिती तो प्रदेश ॥उडे वायुनें लोळ जैसा धुळीचा । करी धुंद सार्या दिशा लोट त्यांचा ॥३॥उभारून डौलें वरी नीट कान । वरी तोंड खिंकाळती जे करून ॥जरी वीस चालोनिया कोस आले । तरी अश्व हे थोर वेगें निघाले ॥४॥तिरासारखे एक रेषेंत जाती । तसे नीट जातील वाटे दिगंतीं ॥जमीनीस लागेल पाऊल कैसें । हवेंतून नेती मनुष्यांस भासे ॥५॥वरी स्वार ही ठेवितो नीट मांड । स्वभावें सहों दाविता वेग गाढ ॥निमित्तास डाव्या करीं घे लगाम । दुजा हात कांहींच पाहे न काम ॥६॥तयांचीं दिसूं लागती नीट गात्रें । कशीं चालतां हालताती शिरस्त्रें ॥चकाकोनि नेत्रां दिपावीति शस्त्रें । सुसाटें उडूं पहाती रम्य वस्त्रें ॥७॥तयां मागुनी हत्ति येती प्रचंड । वरी त्यांचिया नौबती वाजतात ॥वरी सोंड दौलें पदें टाकितात । स्वशब्दें दिगंता जणो फोडितात ॥८॥जया वंदितां भूपती सर्व देशीं । निशाणें तयां मागुनी येति ऐशीं ॥जरी येइ धोका तयां प्राण द्याया । उभे भोंवती स्वार त्यांतें जपाया ॥९॥महावीर मागें मराठे कुलीन । त्वरें वाहनीं दिव्य येती बसून ॥पदें श्रेष्ठ ज्यांची जसे स्वाधिकार । तशी वाहनें त्यांस नाना प्रकार ॥१०॥महाडीक मानी इमानी पवार । किती भोंसले इंगळे बांड शूर ॥तसे मोहिते आणि शिंदे चवाण । तया सैन्य - भागांत शोभायमान ॥११॥मधें शोभला चंद्र मल्हारराव । दिसे थोर गंभीर शांत स्वभाव ॥हजारों प्रसंगीं परी उग्रवीर्य । जयानें जग अदाखवीलें अवार्य ॥१२॥तया मागुनी चालतो तोफखाना । दुजीं युद्ध - साहित्य - यंत्रेहि नाना ॥जयांची कृती ख्यात लोकीं अचाट । पदाती असे कंठिती धीट वाट ॥१३॥व्यवस्थेंत येतात मागून सादी । तयांची भिती बापुडा कोण बांधी? ॥धरोनी जिही ख्यात भाले विशाल । करीं कांपवीले अरी कांहिं काळ ॥१४॥असें सैन्य भासे समुद्रोपमेय । धुळीचे वरी लोळती लाट काय ! ॥निशाणें शिडें शोभती ती नभांत । मधें पोंहते नक्र हत्तीच होत ॥१५॥करी शब्द डंका दिगंतास गाजे । गदारोळ ही वीर वीरांत माजे ॥पहा अश्व खिंकाळती एक काळीं । समुद्रास त्या गर्जना योग्य झाली ॥१६॥तटापासुनी पाव कोसांत आली । बिनी येउनी थांबती तेथ झाली ॥यशस्वी करी तों सुरू तोफखाना । उडे तोफ पंनास नादें दणाणा ॥१७॥मराठ्यांत जो पूर्व संकेत होता । व्यवस्थेत त्या सैन्य - संभार येतां ॥तटाभोंवतें सैन्य गेलें अफाट । पुरांतून बाहेरची बंद वाट ॥१८॥उभ्या राहुट्या तंबु झाले क्षणांत । तिथे धान्य बाजार आले समस्त ॥जसे काय तेथें वसे थोर गांव । अशी गदि वाटे न मुंगीस वाघ ॥१९॥त्वरें जाति पेंढार ते भोंवताले । जसे लांडगे काय खाया मिळाले ॥लुटाया धराया जयां एक काम । न भाल्यांस ज्यांच्या मिळाला विराम ॥२०॥घरें वेशिबाहेरचीं दग्ध केलीं । लुटूनी गुरे धान्य - वित्तादि नेलीं ॥न कोणास कोट्यांत व्हावा प्रवेश । न बाहेर यायास ही संधि लेश ॥२१॥दिसे छावणी शत्रुची जों अपार । गमे काय कल्पांतिचा हा समुद्र ! ॥मधें बेट कोटा उरे एक बिंदू । क्षणें ग्रासिता यास होईल सिंधू ॥२२॥असे मुख्य कोट्यामधें कामदार । यशस्वी जनां शासिता जो उदार ॥तयालागिं मल्हार धाडी निरोप । पुरस्थां जनां दाविता उग्र कोप ॥२३॥“ तुम्हीं युद्ध साहित्य जें काय केलें । त्वरें पाहिजे आमुच्या हातिं आलें ” ॥जरी ठेवितां हातचें शास्त्र खालीं । क्षमा दिल्लिरा मागतां याच काळीं ॥२४॥दयेनें तरी जाउं देऊं तुम्हांला । अशा युक्तिनें भीति नाहीं जिवाला ॥तुम्हीं बायका लेंकरें आप्त घ्यावे । सवें शीघ्र बाहेर आतां निघावें ॥२५॥तुम्ही जातिचे हिंदु धर्माभिमानी । अशी ऐकितों कीर्ति मोथे इमानी ॥म्हणूनीच दावूं दया इच्छितों ही । क्षमा बंडवाल्यांस न्यायें न कांहीं ॥२६॥उदेली जरी दुर्मती पौर लोकां । स्वकृत्येंचि ते पात्र होतील शोका ॥नद्या शोणिताच्या इथे वाहतील । मिळूं चंबळेच्या जळा धांवतील ॥२७॥म्हणूनी मती आयकावी हिताची । न कोट्यास आशा दह्रा रक्षण्याची ॥सवें वित्त घेऊन बाहेर जावें । अमूल्या जिवा यत्नें जपावें ॥२८॥न जाती न धर्म अन कर्मा न शर्मा । अम्ही पाहतो आचरीतां स्वधर्मा ॥तुम्ही सर्व ही दंडनीय प्रभूतें । बळें येथ आलीं तयाचीं प्रभूतें ” ॥२९॥निरोप प्रकारें अशा दूत नेत । यशोधीस जो जाउनी सांगतात ॥तयाचे जळे चित्त कोपानळाने । स्वमित्रांस बोलाविलें शूर त्यानें ॥३०॥‘ कसें काय हो ? मित्र माझे उदार । करावा कसा संकटीं या विचार ? ॥अशी वेळ आली खरें धैर्य दावा । असे शक्ति ती या प्रसंगास लावा ॥३१॥कसा बेत तो होउं द्या एकदाच । नको तो पुन्हा तोर चित्तास जाच ॥जरी पाहिजे कीर्ति व्हावें पुढार । जिवाचीच आशा तरी जाल दूर ॥३२॥विचाराल माझा जरी बेत आतां । मला ये कधीं ही न मागें पहातां ॥असा एकटा शत्रु - सैन्यीं पडेन । खर्या मी मराठ्याप्रमाणें मरेन ” ॥३३॥असें ऐकतां वाक्य त्याचें विरक्त । तया सांगती ओरडोनी समस्त ॥‘ मरूं बाजुला बा ! तुझ्या देश भक्ता । दिली लात गेहा मुलां स्त्रीस वित्ता ’ ॥३४॥करी गर्जना ऐकुनी हें प्रमोदें । निरोपास दूतासवें काय तो दे ॥“ मराठे तुम्हीं मार्ग - दर्शी न आम्हां । अम्ही जाणतों आपुल्या पूर्ण कामा ॥३५॥असे एक ठावा अम्हां मार्ग नीट । न सोडूं कधीं जन्म - भीमीस धीट ॥जमीनीस कोट्यांतल्या रक्त वाहूं । मरूं जागच्या जागिं येथेंच राहूं ॥३६॥तुम्हां वाटलें दावितां भीति मात्र । पळूं टाकुनी हातचें काय शस्त्र ? ॥तुम्हीं रोहिल्यां मोगलांतें दटावा । न या देशिं कोणास ही धाक ठावा ॥३७॥तुम्हीं देशदेशीं फिरोनी मराठे । अरी जिंकिले हें न आश्चर्य वाटे ॥कसें काय तें युद्ध - कौशल्य पाहूं । उभे जेधवां झुंज द्यायास राहूं ” ॥३८॥असे ऐकतां शब्द मल्हार कानें । तयाच्या मनीं क्रोध अत्यंत बाणे ॥हिताची कथा सांगतां उत्तरातें । अशा देति तस्मात् घडो जें घडे तें ! ॥३९॥जाळिन पोळिन नाशिन नेइन सर्व लया ।दाविन कोप कस आसतो मम भू - वलया ॥नागर नाशुन नांगर या नगरीं फिरवी ।पाडिल दाहि दिशांस उजेड सुकीर्ति - रवी ” ॥४०॥बोलवि तो सरदार हुशार उदार - मती ।जे निज शौर्य - बले जित कीर्तुसवें रमती ॥येउन लीन पदें सुकुलीन शिरीं नमिती ।जाणवितां रिपु - भाषण कोप विषा वमती ॥४१॥होळकरे मग त्यांस हुकूम असा दिधला ।“ घेउनियां अपुलीं पथकें पुर घेउं चला ॥चोहिंकडे उठुनी करुं एक उठाव उठा ! ! ।तुंबळ संगर - संगत कीर्तिस घेउं झटा ! ” ॥४२॥एकसरें रण पंडित खंडित - शत्रु - मद ।गर्जति वाजति डिंडिम चंड रिपु श्रमद ॥जाय पुरें भरूनी नभ - मंडळ तूर्य - रवें ।घोष तसे उठती नर - केसरिंचे बरवे ॥४३॥चाळिस एकच काळिं धडाधड तोफ सुटे ।होति दिशा बहू धुंद कळे नच कोण कुठे ॥थोर जरीपटका कटकावरि उंच दिसे ।गर्जति धांवति वीर - समूह जसे ॥४४॥सुंदर उंच गृहें हि धडाधड कोसळती ।सांपडती किति लोक मधें मरती पडती ॥उंच असें स्थळ पाहुन पौर तिथें जमती ।भीति - भरे रण तुंबळ हें बघुनी भ्रमती ॥४५॥पाहुन हें यशवंत न लेश हि घाबरला ।घेउन नागर एक मनें तट रक्षि भला ॥बीज जसा हिकडे तिकडे फिरतो चपळ ।फार सहाय्य करी स्वजनां न बसेच पळ ॥४६॥तीन हि वेळ तटावर चालुन होळकर ।येइ परी परते झुजतां प्रहरोप्रहर ॥साहुं शके भडिमार तटावरला न भट ।येइ पुढें चवथ्या समयीं नच सोडि हठ ॥४७॥त्या दिवशीं जय त्या मिळतां अगदीं न दिसे ।अस्त रवीस घडे म्हणुनी मग शांत बसे ॥युद्ध सुरू करुनी दुसर्या दिवशीं उठला ।वेढुन नागर तीन असा महिने झटला ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP