मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग पंधरावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग पंधरावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग पंधरावा Translation - भाषांतर यशवंतराय जोधपूरच्या मार्गानें प्रवास करितो - कोटा शहराविषयीं त्याचे विचार - लहानपणाच्या गोंडपणाविषयीं त्याच्या मनांत आलेल्या कल्पना - आईची आठवण - सायंकाळीं दिसणार्या अकृत्रिम सृष्टीचें वर्णन.श्लोक दीडशें हि वरुषें मही - तळीं । नाचुनी तुडवि जे अरी बळी ॥रामदास करि ज्यास अर्पण । तें निशाण झळके पुरांतुन ॥१॥जाहला जंव मराठि अंमल । भीति पावति अनाथ दुर्बळ ॥मानवत बलशालि नागर । क्षोभ त्यांस चढला अनावर ॥२॥स्वार पायदळ फार शीणले । तीन मास बहु दुःख पावले ॥सूड घेउं म्हणतात दक्षणी । दग्ध हें पुर करूं पुरें क्षणीं ॥३॥शूर होळकर बेत ऐकतो । नागरांवर दयेस पावतो ॥शांत कोप पहिलाहि होतसे । सैनिकां मग हुकूम देतसे ॥४॥“ हो लुटालुट न या नगरांत । सर्व लोक हि सुखांत असोत ॥वरि जे करिती बादशहासीं । आणणें धरून मात्र तयांसीं ॥५॥नाश फार घडला असें रणें । त्यास दुष्ट जन तेच कारणें ॥यास्तव प्रथम त्यांजला धरा । शोध फार मम मित्र हो करा ॥६॥दिल्लि - नायक - पदांस रक्षिता । मी असून रिपु - कीर्ति भक्षिता ॥त्याविरुद्ध उठल्या जनाप्रत । दंडणें मजसिं योग्य भासत ॥७॥अग्रणी हि यशवंतराय तो । दिल्लिला धरून आज धाडितो ॥हत्तिच्या चरणिं मृत्यु येइल । तेंच शासन सुयोग होइल ॥८॥जो धरील यशवंतराय हा । पारितोषिक वरील तो महा ॥शोधुनी सकल भूमि - मंडल । जा धरा त्वरि आणिजे खल ” ॥९॥राव होळकर बोलतो असें । तों मनांत यशवंत येतसे ॥मूर्ति राहिलि उभीच ती पुढें । प्रीति - लोट सुटला तियेकडे ॥१०॥मग्न होय मग वीर चिंतनीं । काय चालति विचार त्या क्षणीं ॥कां म्हणून मन राहिना स्थिर ? । होय कोण यशवंत हा नर ? ॥११॥या विचित्र पुरूषास एकदा । पाहिलें न विसरेन त्या कदा ॥कां प्रसन्न मन पाहुनीच या । होय ? काय गुण साधला तया ॥१२॥त्या अपाय घडला जरि कांहीं । वाटतें न मम जीवित राही ॥शांत - वृत्ति मग सैनिक बाहे । त्यांस होळकर बोलत आहे ॥१३॥“ सांपडेल यशवंत तो जरी । सौम्य त्याजवळ वर्तणें तरी ॥दूर जाइल म्हणून सावध । राहणें परि करूं नका वध ” ॥१४॥मानसिंग आणि वीर सागर । जाति घालवित शौर्य - सागर ॥घे निरोप यशवंत शेवट । त्यांस दे परत धाडुनी झट ॥१५॥तो हयावर बसून एकटा । कंठि वाट यशवंत तत्वतां ॥वेष शुभ्र बहु - मौल्य संयुत । याशिवाय नवह्ता अलंकृत ॥१६॥आंतुनी चिलखतास तो धरी । मंदिलें वरिलि सुप्रभा शिरीं ॥घे कट्यार तरवार बांधुन । ढाल पाठिवर शस्त्र - वारण ॥१७॥भल्ल बाजुवर ठेवि निस्तुल । ठेवि संनिध तयार पिस्तुल ॥हा मुशाफर असा सजोनि घे । जोधपूर शहराकडे निघे ॥१८॥तो पुरा फिरून पाहि मागुती । अश्रु फार नयनांत चालती ॥सौख्य बाळपणचें हि आठवे । दुःख तों न हृदयांत सांठवे ! ॥१९॥सावली किसनदास - सत्कृपा । भोगिलें सुख अलभ्य जें नृपा ॥हौस फार गमली प्रतिक्षणीं । तें लहानपण आठवे मनीं ॥२०॥शेवटीं फिरून दृष्टि पाठवी । तो हयास यशवंत थांबवी ॥तें प्रसिद्ध पुर एकदा बघे । सौख्य मानुन तयांत पूर्ण घे ॥२१॥पाहतां स्थितिस त्या पुराचिया । कोणत्या न उपजे नरा दया ? ॥नासधूस धुलधाण तेथिल । अश्रु पाहुन न कोण टाकिल ? ॥२२॥जेथ नांदलि समस्त संपदा । ठाउकी नच कुणास आपदा ॥ते उदास बहु दीनसे दिसे । भीति दे मसण भासलें जसें ॥२३॥सुंदरें धनिक - लोक - मंदिरें । जाहलीं जळुन खाक हें खरें ॥आग लागति कितींस नूतन । लोळ चालति नभांत पेटुन ॥२४॥कांहिं उंच मजले सुखावह । तोफ - मार न सहून दुस्सह ॥कोसळून पडतात भूमिला । शत्रुच्या नमिति काय पावलां ! ॥२५॥तोफ होतिच सुरू पुरामधें । शब्द थोर करूनी भयास दे ॥नाद तो त्वरित दूर डोंगरीं । जाउनी प्रतिरवा पुन्हा करी ॥२६॥शेंकडों स्थळिं पडून मोडला । आरपार किति जागिं भंगला ॥राखण्यास पुर होय साधन । पावला तट म्हणून शासन ! ॥२७॥आपटून दिनरात्र गोलक । जाहल्या तटिं खुणा भयानक ॥तो जनास निज दुःख दावितो । डागला महिष काय भासतो ॥२८॥भोंवती उपवनें मनोहर । प्रीति ज्यांवर करीति नागर ॥ध्वस्त होउन उदास दीसती । कोण पाहिल सुखांत ती स्थिती ? ॥२९॥प्रेम सद्गद गळा भरून ये । एक पाउल गमे हलूं नये ॥हात जोडुन अनन्य - मानसें । काय भाषण सुधी करीतसे ॥३०॥“ हे पुरा ! प्रियकरा ! जिवाहुन । वाटतें तुजसिं दुःख पाहुन ॥कांपवीत भुवनास नांदले । या स्थळीं नृपति शूर ते भले ॥३१॥तेथली स्थिति अशी घडे अहा ! । दैव होय उलटें कसें पहा ! ॥शत्रुनें तुजसिं फार घेरिलें । दुःख - बीज हृदयांत पेरिलें ॥३२॥बादशाह करि बा ! तुझा छळ । रक्षणें तव सुतांसि दुर्बळ ॥हें अवश्य मज कृत्य वाटलें । हांकिले मुसलमान येथले ॥३३॥भांडलों मग मराठियांसवें । ख्यात जे भुवनिं वीर्य - गौरवें ॥मीं धरून तरवारिला करीं । पाहिलें लटुन थांबवूं अरी ॥३४॥शत्रुला नगरिं येउं मीं दिलें । तत्करांत तव पुत्र सोडिले ॥थोर जाण अपराध हा मम । कोण तुल्य मजसीं नराधम ? ॥३५॥नाश जे करिति येउनी पुरा । वैरि जे तुजसिं भेटती पुरा ॥वाहवीति जन - रक्त - वाहिनी । मीच त्यांत पहिला म्हणें मनीं ॥३६॥दुष्ट होळकर आंत येउन । वाटतें तुजसिं टाकिं जाळुन ॥काय होय न दशा तुझी कळे ! । सोडुनी तुजसिं दूर मी पळें ॥३७॥आपदभ्र तव टाळण्याप्रत । मी जरी न शकलों तुझा सुत ॥तूं सुखांत परि नित्य राहणें । ईश्वराजवळ हेंच मागणें ॥३८॥चाललों दुर तुला त्यजूनियां । दे निरोप कर एवढी दया ॥शेवटील मज भेट वाटतें । दुःख यास्तव मनांत दाटतें ! ॥३९॥रम्य राज - सदनें जलाशय । देवळें अमित हर्ग्य सुप्रिय ॥आपण प्रथित राज - मार्ग जे । वंदितों नगर - देवते तुझे ” ॥४०॥यापरी वदुन आपुला पथ । तो धरीत यशवंत सांप्रत ॥ चालतां मनिं विचार चालले । चित्त फारचि उदास जाहलें ॥४१॥हेतु एक धरितां मनामधीं । दावितो उलट वर्तना विधी ॥चांगले अणिक बेत वाइट । मोडितो विधि धरूनियां हट ॥४२॥जों तरूणपण अंगिं संचरे । हौस तों नवनवी मनीं भरे ॥अल्पशा अनुभवें जगाचिया । शेवटीं उलट भासतें तया ॥४३॥आसनीं शयनिं भोजनीं मनीं । ज्यांचिया दिवस जाति चिंतनीं ॥स्वप्नसे विहळ सर्व हेतु ते । होति दुःख मग फार वाटतें ॥४४॥जी तरूणपणची मती नवी । ती अपक्क म्हणतात हें कवी ॥सोसण्यास तिज घाव पाहिजे । त्याविणें न उपयुक्त जाणिजे ॥४५॥आज तीन महिने लढाइचें । जें चढे स्फुरण फार वेळचें ॥लागलेंच उतरूं हळूहळू । त्या विचार मग शांत ये कळूं ॥४६॥काय मी लढुन मेळवीयलें ? । लोक मात्र अति दुःख पावले ॥नाहिं लाभलिच कीं स्वतंत्रता । मात्र दिल्लि - पति कोपला अतां ॥४७॥या अशाच दुसर्याहि कल्पना । दुःख - दायक विशेष ज्या म्हणा ॥येउनी हृदय खिन्नता धरी । त्यास शांतवि सुवीर यापरी ॥४८॥“ वीर - पुत्र म्हणवून सत्कुल । कोण मूर्ख परतंत्र राहिल ? ॥कार्य साधुन न धन्य जाहलों । दोष हा न मम हें जगा कळो ! ॥४९॥काय रात्रदिन जागलों नसें ? । काय पौर - हित पाहिलें नसे ? ॥कीं जिवावर उदार होउनी । नाहिं काय लढलों पुरांतुनी ? ॥५०॥यत्न निष्फळ समस्त जाहले । त्यास कारण न दोष आपुले ॥निश्चयेंच भवितव्यता अशी । ती चुकेल कवण्या गुणें कशी ! ॥५१॥सिद्ध शूर रजपूत भूपती । साह्य देउं उठते जरी किती ॥कां असा प्रळय सोसितें पुर ? । भांडतों मिळुन दोनही जर ॥५२॥कां न होळकर पावला दया ? । कां उदारमति नाठवे तया ? ॥कां स्वधर्म - परिपालनास्तव । तो न लावित सुवीर्य - गौरव ? ॥५३॥हें कळे मज खुशाल पोंचला । जो पुण्याप्रत वकील धाडिला ॥कां न आलि मग पेशव्या दया ? । तो न कां सरळ आचरे नया ? ॥५४॥हें परंतु घडतें कसें जरी । ईश - हेतु असला असे तरी ॥दुःख - सागरिं बुडोच सर्वदा । जन्म - भू मम सुखी नसो कदा ॥५५॥आसरा न मजला कुठे वसे । काय दीन हत - भाग्य मी असें ॥बोध येउन करील चांगला । कोण योग्य पथ दावितो मला ? ॥५६॥अंधकार पसरे जगावरी । त्यांत चांचपत वाट मी करीं ॥ठेंच लागुन पडें घडोघडी । इच्छितों मदत दीन केवढी ! ॥५७॥धांवतात लहरी चहूंकडे । भूमि दृष्टिस न ती कुठे पडे ॥मी बुडेन भय वाटतें तरी । पोहतों धरून धीर अंतरीं ॥५८॥तात - पाद जरि भेटते मला । धन्य धन्य असतों सुखी भला ॥या कपाळिं लिहिलीं न अक्षरें । तीं असें मजसिं वाटतें खरें ” ॥५९॥आइलाहि यशवंत आठवी । चित्त तच्चरणिं नम्र पाठवी ॥जों मनांत भरली न ती स्मृती । लेंकरासम रडे महामती ॥६०॥“ शेवटील हि न भेट जाहली । खंत यास्तव मनास लागली ॥नाहिं लोळण तिच्या पदांपुढें । घेतली म्हणुन जीव आंखडे ॥६१॥शील - पुण्य - सरिता गुणी महा । ईश्वरेंच जननी दिली अहा ! ॥काय म्यां सुख दिलें तिच्या सुतें । आठवून्मन फार कापतें ॥६२॥भोगिलें अमित संकटांप्रत । दुःख केंवि विसरेल सांप्रत ? ॥बैसुनी जवळ गोड भाषण । कोण तीजसिं करील सांत्वन ? ” ॥६३॥चालतां मनिं विचार या परी । जोधपूर - पथ वीर तो धरी ॥टेंकड्या चढ उतार भूमिला । अश्व लंघित पळे जवें भला ॥६४॥सूचना न करितां गुणी हय । चालला पळत नीट निर्भय ॥किर्र झाडिंतुन कंडरांतुन । धांवला तरून तो नद्यांतुन ॥६५॥नावमात्रच लगाम घेउन । शांत - चित्त यशवंट बैसुन ॥भोंवती अरवली - गिरी - दरी । कर्मणूक बघतां वनें कई ॥६६॥तों उदास दिसुं लागलें वन । अंधकार पसरे हळू घन ॥सूर्य अस्त - गिरि - मार्ग साधतो । पक्षि - संघ घरट्यांस धांवतो ॥६७॥गार फार सुटला समीरण । शब्द होय तरू - पल्लवांतुन ॥गौर गोंडस कळे विकासते । लाजवीएति युवती - कपोल ते ॥६८॥ताड साग बकुली शमी वट । उंच पिंपळ तमाल उद्धट ॥आम्र चंपकहि शाल्मलि - द्रुम । भोंवते मिळुन रक्षिती तम ॥६९॥इंद्रनील - सम - नीर सुंदर । धांवतात खडकांत निर्झर ॥आपटूण दगडांत पाझरे । वारि, हे पसरले जणो हिरे ! ॥७०॥ग्राम्य - वन - फल - पुष्प - शोभित । वृक्ष भूमिस लवून पावत ॥पाहुणाच यशवंत ये घरा । देति त्यास मुजराच हा खरा ! ॥७१॥श्वापदें फिरति भीति - दायक । सिंह व्याघ्र वृक त्यांत नायक ॥वास घेत निज भक्ष शोधिती । त्यांस दुर्बळ बघून कांपत ॥७२॥या परि पाहत पाहत चालतसे सुमती ।कानन - भूमि सुखावह फार तया गमती ॥मावळला भगवान्दिननायक तो मिहिर ।पूर्ण तमें भरूनी जग भासतसे विहिर ॥७३॥देउन कान दुरून जल - ध्वनि आयकतो ।जाउन निर्मल पाहि झरा सुख - दायक तो ॥खालति एक शिला - तल पाहुनियां उतरे ।बांधित आणुन अश्व समीप तरूस करें ॥७४॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP