मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग सोळावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग सोळावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग सोळावा Translation - भाषांतर चंद्रोदय - चंद्रप्रकाश - वणवर्णन - यशवंतराय रात्रभर जागत जातो - पहाटेस मार्ग चालू लागतो - त्याची व भिल्लांची गांठ - लढाई - भिल्ल यशवंतरायास कैद करितात.श्लोक ऐशा प्रसंगिं यशवंत वनीं भयान ।विश्रांतितें क्षण शिलेवरि घे बसून ॥घोड्यावरी बसुन वीसहि कोस आला ।या कारणें श्रम तया सुभटास झाला ॥१॥गेला झर्याजवळ सुंदर गार पाणी ।पीतां मनांत अमृताचिच गोडि आणी ॥संध्येस वंदुन फराळ करून कांहीं ।तो आसनावर बसून सभोंति पाही ॥२॥जाईल रात्र कशि हाच विचार पोटी ।आहे पुढें पडलि ती तरवार मोठी ॥व्याघ्रादि हिंस्र पशुंची मनिं भीति वाहे ।जाग्यावरी बसुन सावध जागताहे ॥३॥या वेळिं कुंकुमच चर्चुनि भाळ - देशीं ।राहे पतीस निरखूं युवतीच जैशी ॥तैशी दिशा सजलि उत्सुक काय पूर्व ।ती तांबडी धरुन कांति दिसे अपूर्व ॥४॥निर्वीर भूमि - तल पाहुन अंधकार ।चाले मदांध गज - हर्ष - भरें पुढार ॥पूर्वेस त्यास मृगराज मृगांक भेटे ।हें अंधकार - गज - रक्तच लाल वाटे ॥५॥लक्षावधी उगवती गगनांत तारे ।हे भालदार शशि - भूपतिचेच सारे ॥बुक्का गुलाल उधळीतच मानपानें ।ते आणितात निजनाथ महोत्सवानें ॥६॥अन्य स्थळीं दिवस घालवुनी विलासें ।येतो पुन्हा परत लाजत चंद्र भासे ॥डोकावुनी हळुच रात्रि - वधूस पाहे ।मर्जी असेल कशि काळजि हीच वाहे ! ॥७॥सारून दूर पडदे जलद - स्वरूप ।आला प्रगल्भ नटराज पुढें अमूप ॥जों लावितात टक एकच लोकमात्र ।तों रंग मंडपिं नभीं शशि रम्य - गात्र ॥८॥चंद्र - प्रभा गिरि - शिरावर फांकतात ।ज्यांच्या लपे तम भयार्त गुहोदरांत ॥राजाच तो मन उदार करून ठेवी ।डोक्यावरी कर - जणो अभयास दावी ॥९॥नानालतौषधिंस जीवन घालणारे ।एकाच काळिं जन - नेत्र सुखावणारे ॥पृथ्वी सुधा - धवल सर्व करून धाले ।हे शीत शीत - किरणें कर धाडियेले ॥१०॥आकाश - भूमि - गिरि - कंदरिं पूर्ण साचे ।ओघावरी पडति ओघच चंद्रिकांचे ॥क्षीराब्धिच्या उठति या लहरीच काय ! ।कीं सर्व चंदन - रसांत बुडून जाय ॥११॥या चांदण्यांत अमृतांत जणो बुडाल्या ।हर्षांत डोलति ही नाचति मत्त झाल्या ॥वेली कशा स्वतनुनी तरू वेढितात ।प्रेमें प्रिया धरून तन्मय काय होत ॥१२॥नाना लता मिळुन एकच गुंत होतां ।सर्वांस एक समयास फुलेंहि येतां ॥त्या काननीं घमघमाट सुंदर चाले ।हर्षांत गोंधळुन चंचल चित्त डोले ॥१३॥पानें जया असति गारच काळिं भोर । वृक्षावरी चढति वेलि अशा अपार ॥त्या वीस पंचविस हात तिथून खाली ।झोंकावती म्हणुन सांवलि गर्द झाली ॥१४॥या वेलि हालति इथे जंव ये झुळूक ।खालीं फुलें पडति भूमिवरी अनेक ॥रे मारूता ! शिवुं नको म्हणतात वेली ।हीं आसवेंच कुसुमें पडतात खालीं ॥१५॥हे ताल साग सरळे गगनांत जाती ।ईर्षाभरें वरचढीच करूं पहाती ॥जों जों वरी चढति बारिक वृक्ष होती ।उच्चत्व इच्छिति तयांत अशीच रीति ॥१६॥छायेंत कांहिं भरतात बिघे जमीन ।हे लक्ष - पक्षि - भरणांत सुदक्ष जाण ॥राजे वनांतिल अशा समयास शांत ।स्तब्धाकृती सुवट - वृक्ष वना पहात ॥१७॥पानें करी शिथिल हालवि कांहिं वात ।चाले सदा सळसळां ध्वनि पिंपळांत ॥हा दुष्ट वायु उमळूं बघतो स्ववंश ।हें ओरडोनि कळकी कळवीति खास ॥१८॥या चांदण्यांत यशवंत पहात राहे ।शोभाभरें खुलत सर्व अरण्य आहे ॥तों गर्जना जवळ आयकण्यांत येती ।कोठें तरी जवळ वाघ फिरे वनांतीं ॥१९॥घोडाहि खिंकळतसे यशवंत याचा ।सांगे पुढील भय धूर्त नसून वाचा ॥तों एक धांदल उडालि पशूंत सर्व ।व्याघ्राचिया पुढति दाविल कोण गर्व ? ॥२०॥उड्डाण घेति हरणे मग ताड ताड ।धांवून भीत वृक होति तरूंस आड ॥आवेश रानडुकरांस परंतु आला ।ते गर्जती उडविती वरती धुळीला ॥२१॥रोंरावले वन - करी थडकांस देती ।कोल्हे कुई करूनि दूर पळून जाती ॥भ्याला पळे तरस लंघडशाहि घाली ।गर्दी अशी उठुन एकच रानिं झाली ॥२२॥हा रात्रिचा समय, रान अफाट दाट ।स्वच्छंद हिंस्रपशु या स्थळिं हिंडतात ॥घेऊन खङ्ग करण्यास तयार घाव ।तो सावधान बसला यशवंतराव ॥२३॥चाले पुढें घडिघडी जंव रात्र वेगें ।त्या जागचें बदलुं रूप विचित्र लागे ॥जों जों उदास दिसलें वन तन्मनांत ।जोरें घुसूनच विचार उदास येत ॥२४॥जी वस्तु भोंवति भयें निरखून घ्यावी ।शंका क्षणामधिं तिच्या विषयीं भरावी ॥त्या चांदण्यांत बघतां तितुके पदार्थ ।भीती मनांत निरुपद्रव ही करीत ॥२५॥जाळींत चंद्र - किरणीं करुनी प्रवेश । जे पाडिले कवडसे महिच्या तळास ॥ते वाटले नयन कीं उघडून वाघ ।रोंखीत मारिल उडीच धरून राग ॥२६॥कोठें झुडूप बहु दाट फुटून पान ।जें चांदण्यांत दिसतें अति कृष्णवर्ण ॥विक्राळ तोंड पसरून सटा उभारी ।उड्डाण मारिल गमे मृगराज भारी ॥२७॥तेथें तयास दिसला अति शुभ्र - वेष ।कोणी पुढें सरळ धीट उभा पुरुष ॥तो कोण कोठिल म्हणून करून पृच्छा ।जाणावयास यशवंत धरील इच्छा ॥२८॥कांहीं न उत्तर करी स्थिर तो पुरूष ।तें पाहतां दह्रि मनीं यशवंत रोष ॥हातें धरून मग पिस्तुल नीट झाडी ।आवाज एकच उठे विपिनीं धडाडी ॥२९॥‘ चीं चीं ’ करीत घरट्यांतुन पक्षि आले ।बाहेर, तो परि पुरूष न लेश हाले ॥झाल अपुढेंच यशवंत जपून पाही ।तो वृक्ष - मूल दिसलें दुसरें न कांहीं ॥३०॥हांसे म्हणे “ किति तरी चुकलों भ्रमानें ।नेलें पहा कितिक दूर कसें क्रमानें ” ॥तो रात्र घालवि अशीच असून जागा ।सोडी न निग्रह कदापि धरून जागा ॥३१॥जेव्हां समीप अरुणोदय रम्य आला ।चंद्र - प्रकाश सुख - दायक मंद झाला ॥वारा झुळूझुळु सुटे करि गार गात्रें ।हाले पुन्हा विपिन सर्वहि जीव - मात्रें ॥३२॥झाली पहाट पुरती इथुनी निघावें ।लंघून घांट मग जोधपुरास जावें ॥ऐसा विचार जंव तो यशवंत आणी ।तों ऐकतो हृदयभेदक दीन वाणी ॥३३॥“ कोट्याहुनी भिउन शत्रुस मी निघालों ।देशातरा तरित वांचवुं जीव आलों ॥दुर्दैव सोडी न अजूनहि पाठ माझी ।या जीव कोणि तरि येउन वांचवा जी ! ॥३४॥या दांडग्यांप्रत निवारून लांडग्यांस ।वाटे न नेइन सुरक्षित मी जिवास ॥हाडें मरून मम याच वनीं पडावीं ।कोणास दैव - गति ही तरि होय ठावी ? ” ॥३५॥हे शब्द ऐकुन उभा यशवंत ठेला ।घेता कराल करवाल करांत झाला ॥गर्जे “ अरे भिउ नको ! धर धैर्य पोटीं ।राखीन आज तुज दावुन शक्ति मोठी ॥३६॥चाले पुढें चपल धीट विजेप्रमाणें ।जेथें असा परिसला रव दीन कानें ॥तों चालली सरळ ती दरडींत वाट ।डांगें जिथे उठति दाट नभीं अचाट ॥३७॥चंद्र - प्रकाश नवह्ता जरि त्या स्थळांत ।होता उजेड दिसण्यापुरता पदार्थ ॥संतापले बघति फाडुं नरास एक ।ते लांडगे सिअति जे जमले अनेक ॥३८॥एका क्षणांत थडके निधि साहसाचा ।चालून सावध पुढें बलशालि साचा ॥पाहे सशस्त्र वरती उचलून हात ।आरोळि ठोकित सवेग शिरून आंत ॥३९॥तों गोष्ट दृष्टिस पडे भलतीच कांहीं ।सुस्तब्ध जीस बघतां यशवंत राही ॥ते लांडगे - पुरूष तो - सगळे मिळून ।या भोंवते जमति शस्त्र करीं धरून ॥४०॥आली कळून मग गोष्ट खरी तयाला ।गेलों फसून पुरता परि घात झाला ॥घोडाहि दूर मजपासुन या प्रसंगे ।हे शत्रु फार नच कोणि सहाय संगे ॥४१॥नाहीं जिवंत तरि सांपडणार हातीं । कीं हातपाय जंव हे फिरते रहाती ॥माझ्या शरीरिं जंव एक हि नाडि वाहे ।संरक्षणीं झटुन यत्न करून पाहें ॥४२॥तों भिल्ल सर्व इकडे वृक - रूप - धारी ।होते तयार झगडा करणार भारी ॥संग्राम - धीर चतुरा यशवंतराया ।वेढून जों बगह्ति कैद बळें कराया ॥४३॥तों कोपर्यांत दगडावर एक वृद्ध ।होता पुरूष बसला यमराज शुद्ध ॥भिल्लां उगीच बसण्यास हुकूम देत ।ते चित्र - तुल्य अचल - स्थिति राहतात ॥४४॥बोले वळून मग तो यशवंतरावा ।“ आहेस कोण कुठला मजलागिं ठावा ॥झाला बळी बळि असून तुझ्या बळाचा ।त्याचा पिता समज मी मनिं बादलाचा ॥४५॥अन्याय नीति नच भिल्ल कधीं पहाती ।तूं आज येसि पुरता अमुच्याच हातीं ॥जो आसरा मजसिं वृद्ध पित्यास बाळ ।त्याला वधून मज पाहवितेस हाल ॥४६॥यासाठिं वास्तविक जीव तुझा हरावा ।घेऊन सूड निज हेतु पुरा करावा ॥आम्ही परंतु करितों असला विचार ।मारूनियां तुज न लाभ अम्हांस फार ॥४७॥कोणी धरील यशवंत जिवंत हातें ।देईल होळकर थोर इनाम त्यांतें ॥तें पारितोषिक अलभ्य तुला धरून ।घेईन - हेतु असला बसलों करून ॥४८॥रागें हरीन तव जीव परंतु काय ।आहे जिवंत करूं बादल हा उपाय ॥रक्तें तुझ्या नच निवेल मर्माधिवन्ही ।होईल जें मुहित घेइन तें करोनी ॥४९॥कोट्यांतुनी सुटसि जोधपुरास याया ।येणार या वन - पथें यशवंतराया ॥ही बातमी मजसिं लागलि हेर गुप्त ।मीं ठेविले सतत वाट तुझी पहात ॥५०॥ब्रम्हाहि रक्षण करूं न शकेल तूतें ।तूं सोडिशील न जिवंत कधीं वनातें ॥जे दैव देइल तयास शिरीं धरावें ।स्वाधीन शस्त्र हि शरीर तुवां करावें ” ॥५१॥भिल्लांस काय कमला - सुत बोलताहे ।“ हातांत आज तुमच्या पडलोंच आहें ॥पाहीन यत्न करूनी पुरत्या हटानें ।भिल्लांस लोळविन पांच दहा करानें ॥५२॥आहे हत्यार कळतो उपयोग त्याचा ।मी आसरा धरिन निर्भय कां भयाचा ! ॥मातें जिवंत धरण्यास न काम सोपें ।दावीन आज रण - कर्म तुम्हांस कोपें ॥५३॥वाटे खुशाल मज कैद कराल होतें ।ही प्राण - घातक मती सुचली तुह्मांतें ॥या दुष्ट हो ! करिन खंडविखंड गात्रें ।येईल जो पुढति हाणिन त्यास शस्त्रें ” ॥५४॥तों धांवले प्रबळ भिल्ल तया धराया ।हाणीति चोहिंकडुनी यशवंतराया ॥तो मंडलाकृति फिरून विजेसमान ।दे धाक चंचळ पदें करि मारहाण ॥५५॥ज्याच्याकडे सरळ रोंखित दृष्टि नीट ।तो कांपतो चळचळा करि मार्ग नीट ॥तों मागुनी करिति येउन एक वार ।चर्मावरी धरून तो परतूं तयार ॥५६॥अंगामधें कवच पूर्विंच त्यास होतें ।त्या आपटून करि शस्त्र महाध्वनीते ॥लाह्याच काय ठिणग्या पडतात खालीं ।कोलाहलें भरतसे वन एककाळीं ॥५७॥एकाकडे फिरवि दृष्टि दुजास वार ।गेला मरून तिसरा खल भूमि - भार ॥जाळींतुनीच बगह्तो जंव शूर जाया ।हल्ला करून धरिती यशवंतराया ॥५८॥तो वीर्यशालि हिसकाहिसकींत धाडी ।चौघांस दूरवर भूमि - तळास पाडी ॥लातेंत सांपडुन ही पडती कितीक ।ही शक्ति पाहुन अरी धरितात धाक ॥५९॥जें तेज केवळ मराठि महाप्रचंड ।कोट्यामधें झळकलें करि शत्रु - दंड ॥ओसाड या अरवली - विपिनीं सकाळीं ।भिल्लांस गांठुन भयंकर त्यांस जाळी ॥६०॥एकेक घाव करि जो बल - शौर्य - शाली ।तों एक एक भट हाणुन पाडि खालीं ॥भिल्लांतले प्रमुख नायक कांपतात ।कोणी पुढें न सरकूं धजला तशांत ॥६१॥ते एकदांच उठले सगळेहि भिल्ल ।चालून जाति धरिती यशवंत मल्ल ॥झिंजाडि देउन तयां ढकलून दूर ।बाहेर जाउं बघतां करि मार्ग शूर ॥६२॥खालीं पडे अडखळून चुकून पाय ।वेगें उठूं न शकला यशवंतराय ॥तों भिल्ल येउन वरी पडती धरीती ।बांधून कैद समयास तया करीती ॥६३॥विधि लिहित कपाळीं तें चुके कोण काळीं ? ।धरून मजसिं बांधा हो तुम्हांला खुशाली ॥खरतर निज तेजें जिंकिती जे जगाला ।पर-वशपण सोडी काय त्या ही नरांला ? ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP