मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
रक्षिल कोण ?

प्रकाशित कविता - रक्षिल कोण ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति लवङगलता]

जो तो सुत सोडुनि तुज जाऊ
रक्षिल कोण निदानीं आऊ ? ध्रु०

नऊ मास तू भार वाहिला यांचा अपुल्या पोटीं.
यांच्या पाथां लादूं बघशी भार म्हणुनि का बाऊ ? १

हृदयींच्या रक्तचें पाणी पाजुनि वाढविलें तू,
ठेविशि का मग ह्रदय अपाशी ? का ही माग न दाही ? २

वृक्षलत का व्यवहाराच्या साठी फुलती फळती ?
अपकाराचा व्यापारच करुं जातां काय भलाऊ ? ३

कोण्डूनी पञ्जरीं विहग का स्वस्थ सुखें राहिल तो ?
भुर्र ऊडुनि जायचीं पाखरें, मुलें तशींच पहा हीं. ४

पृथ्वीचा सुत चन्द्र कशाने फिरतो तिचिया भवती ?
स्वातन्त्र्यामधि का प्रेमाचें गूढाकर्षण नाही ? ५

केळफण्यांची वाढ यथास्थित खुल्या प्रकाशीं होवो.
म्हणुनिच गळती पारी काढुनि निज छत्रांची साऊ. ६

जलबिन्दूंना नभीं रविकरासवे जाऊं दे भूमी
कठिण समय येतांच धावुनी शान्तविती लवलाही. ७

मोकळीक दे आऊ, यांना आशीर्वादासङगें,
ठेवितील हे सुपर्ण अमृतकुम्भ तूझिया पायीं. ८

२ फेब्रूवारी १९३५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP