मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर पदे| भाग २ विविधविषयपर पदे नरदेह कलिवर्णन निंदक ब्राह्मण यत्न षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु षड्रिपु भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ वैराग्य भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ उपदेशपर पदे - भाग २ श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे Tags : gathasamarthaगाथासमर्थ भाग २ Translation - भाषांतर १४४१ ( राग-कामोद; ताल-दादरा; चाल-कारण पाहिजे० )मनासी लगली चट । वांयाचि खटपट । करी वटवट । रामेंविण रे ॥ध्रु०॥उणें हें येकाचें येक । पहाती सकळ लोक । राहिला विवेक । राघवाचा रे ॥१॥मत्सर आठवें पोटीं । पडिल्या दुःखाच्या गाठी । होतसे हिंपुटी । वांयाविण रे ॥२॥रामदास म्हणे राम । सोडितां होय विराम । राहिला विश्राम । तेणें गुणें रे ॥३॥१४४२( चाल-सामर्थ्याचा गामा० )जनक जननी माया । करिती नाना उपाया । पाळिती सकळ काया । कृपाळुपणें स्वाभावें ॥ध्रु०॥सांगावें नलगे कांहीं । मागावें नलगे कांहीं । बाळका चिंताचि नाहीं । रुदनबळ तें जाणें ॥१॥शृंगार करिती लोभें । हाणति मारति क्षोभें । आवडिच्या लोभें लोभें । जननी जनाक सर्वे ॥२॥जननी जनक जन । वाढताहे तन मन । दास म्हणे गुणसंपन्न । देवाधिदेवाचें देणें ॥३॥१४४३( राग-बिहाग; ताल-दादरा. )कांहीं एक रुचि तों बरें । अरुचिनें मन-मंग ॥ध्रु०॥दूध तूप साय साखर मांडे । आलें निंबें दहिं भात ॥१॥मक्ष ओदन परमान्न प्रकारें । लेह्य पेय चोष्य खाद्य ॥२॥मित्न सखे इहलोक परत्नीं । आवडीनें अलोलिक ॥३॥अंतर राखे तो सुख चाखे । दास म्हणे हें प्रमाण ॥४॥१४४४ ( राग-कल्याण; ताल-दीपचंदी ) कांमुललासी ॥ध्रु०॥कैचें घर कैचें दार । मिथ्या सकळहि व्यापार । अंतीं सोयरा रघुवीर । कां भुललासी ॥१॥कोणी नव्हेति रे कोणाचीं । सकळही सांगाती दैवाचीं । घरीं सोई त्या रामाची । कां भुल० ॥२॥बहु अवघड आहे घाट । कैसी न कळे उरकेल वाट । होईं रघुविरजीचा भाट । कां भुल० ॥३॥फिर माघार परतोन पाहें । एक धर्मचि होउनि राहें । धन जोडिलें न राहे । कां भुल० ॥४॥ऐसी करावी बा जोडी । राहे यथें तेथें गोडी । सोडी । सोडी मिथ्या प्रपंचओढी । कां भुल० ॥५॥केव्हां जाईल न कळे श्वास । राहे तें घर पडेल वोस । ये कुडिया उपजेल त्रासा ॥ कां भुल० ॥६॥सावध होईं रे वा ऐसाअ । ओढीं जळते घरिंचा वांसा । स्मर माझ्या रमाधीशा ॥ कां भुल० ॥७॥संसार पाण्याचा बुडबुडा । याचा नको करुं ओढा । तूं समजसीना मूढा । कां भुल० ॥८॥करीं सिताराम मैत्र । होईला देह तुझा पवित्न । वरकड मिंतीवरील चित्र । कां भुल० ॥९॥कां रे बैसालास निश्चळ करिशिल अनर्थास मूल । सांडुनी विश्रांतीचें स्थळ । कां भुल० ॥१०॥मुख्य असूं द्यावी दया । नाहीं तर सर्वही जाईल वाया । मिठी घाली रामराया । कां भुल० ॥११॥करिशील डोळ्याचा अंधार । पाहें जनासी निवैंरें । सांडीं धन संपत्तीचें वारें । कां भुल० ॥१२॥अंगीं धनसंपत्तीचें वारें । खाया मिळतील मुतें पोरें । कामा न येत रे निर्घारें । कां भुल० ॥१३॥रामदासाचें जीवन । तूं कां न करिसी साधन । राम तोडिल भवबंधन । कांज भुल० ॥१४॥१४४५ ( राग-जोगी; ताल-दीपचंदी )रे वेडिया तारुण्याचा कोण भर्वसा । व्यर्थ वेचूं नको वयसा ॥ध्रु०॥हात पाय वागतां बरें । कोणी कामा नये दुसरें । दुःख होईल येकसरें रे रे रे । बहु सावध असतां बरें ॥१॥कोण समयो येईल कैसा । याचा न कळे कीं भर्वसा । काळ मांडुनि बैसला फांसा रे येकायेकी होईल वळसा रे ॥२॥स्वप्र संसार बाजीगरी । नेणतयासी वाटे खरी । व्यर्थ काय भरसी भरीं रे । हे अवघीं वोडंबरी रे ॥३॥एक वाढती एक मोडती । एक जाती एक पाहती । हित जातें हातींचें हातीं रे । दास म्हणे घरीं सत्संगति रे० ॥४॥१४४६( राग-कामोद; ताल-धुमाळी )देवासि जाऊनि वेडे आठवी संसारकोडें । रडतें बापुडें दैन्यवाणें रे ॥ध्रु०॥मागील आठवण करितां होतसे सीण । दुःअख तें कठिण समागमें रें ॥१॥त्यागूनि निरूपण हरिकथाश्रवण । लगलें भांडण एकमेकां रे ॥२॥रामीरामदास म्हणे कपाळ जयाचें उणें । देवासि जाऊन दुःख दुणें रे ॥३।१४४७( राग-श्रीराग; ताल-धुमाळी ) तैसा हा संसार कैसा लोकाचार । जाणें सांडुनि जोजार सत्य उत्तर ॥१॥सत्य वाटतें मनीं दोनी दिवस जनीं । पुढें जाईल निदानीं प्राण निघोनि ॥२॥दास म्हणे नरहित अगोदर । मग खुंटेल उत्तर राहे शरीर ॥३॥१४४८( राग-कानडा ताल-दीपचंदी )पावनें पावन केलें । सूक्ष्म द्दष्टी करुनि सृष्टिअंतर काढुनि नेलें ॥ध्रु०॥देव कळेना पुण्य कळेना बुडत हो तपेलें ॥१॥किती मरावें किती फिरावें । आयुष्य व्यर्थचि गेलें ॥२॥विषयरसरंगें मन तरंगे । दास म्हणे वय गेलें ॥३॥१४४९( राग-गौडमल्हार; ताल-त्निताल )सुख नाहीं रे नाहीं रे । संसारीं सुख नाहीं ॥ध्रु०॥वैमव संपत्ति संपंत्ति । सवें होती विपत्ति ॥१॥सुख वाटतें वाटतें । सवें चि दुःख होतें ॥२॥घर सुंदर सुंदर । टाकुनि जावें सारें ॥३॥शेवटीं निरास निरास । सांगे रामदास ॥४॥१४५०( चाल-डफगाण्याची ) वितभर पोटासाठीं । येवढी होते आटाआटी । काय होईल शेवटीं । तें कळेना ॥१॥यावें जावें यावें जावें । किती हिंडाबें फिरावें । शागीर्दानीनें कष्टावें । पेरोसानी ॥२॥मनामध्यें आले वाज । परि या लोकिकाची लाज । मग होउनि निर्लज्ज । जाजावले ॥३॥कुबल्ल संसाराच्या वोढी । येवढी होती तडातोडी । नाना संकटें सांकडी । चिंता लागे ॥४॥दास म्हणे अनुभवलें । अवघें जाणोनि त्यागिलें । रुणानुबंधें विमागलें । ठाईं ठाईं ॥५॥ N/A References : N/A Last Updated : May 16, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP