मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ६९

उपासना खंड - अध्याय ६९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कृतवीर्य जवळ तेव्हां, विधिला बोले महात्म्य दूर्वांचें ।

संकष्टीचें व्रतही, कळलें मजला यथाविधी साचें ॥१॥

यायोगें मन झालें, मुदीत माझें खरोखरी देवां ।

पण माझ्या सूताला, संतति कैसी मिळेल कथिं देवा ॥२॥

ब्रह्मा म्हणे तयाला, संकष्टीच्या व्रतास सांगावें ।

ऐकुन उपाय मग तो, जाई स्वप्नांत तेधवां भावें ॥३॥

अपुली विधिची भाषा, झालेली सर्व त्यास सांगितली ।

संकष्टीचें व्रत ही, सांगुन पोथी तयास ती दिधली ॥४॥

आशीर्वाद तयाला, देउन मग गुप्त जाहला तात ।

कृतवीर्य स्वप्न पाहुन, जागा झाला दिसे अकस्मात ॥५॥

पाहुन पोथी तेव्हां, चिंतन करि संपली असे रजनी ।

नंतर तपसा केली, पूर्ण तिथें देवभाव जाणोनी ॥६॥

परतुन नगरीं आला, बैसे अपुल्या सभेंत कृतवीर्य ।

पंडित समुदायाला, दाखवि पोथी त्वरीत कृतवीर्य ॥७॥

पोथीमध्यें लिहिला, अंगारकि नी प्रमूख संकष्टी ।

व्रतमहिमा विस्तारें, आहे तो पाहती चतुर दृष्टी ॥८॥

पोथीमधील विधि तो, पाहे नृपती करावया भाव ।

चित्तीं धरुन व्रत हें, अणवी अत्री मुनीस तो एव ॥९॥

पाहे मुहूर्त बरवा, घेई उपदेश त्या मुनीकरवीं ।

एकाक्षरमंत्राचा, जपण्यासाठीं अधींच मुनि शिकवी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP