मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १६ ते २०

पंचीकरण - अभंग १६ ते २०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१६॥
दिसे तें नासेल सर्वत्र जाणती ।
या बोला वित्पत्ति काय काज ॥१॥
कार्य कारण हा विवेक पाहिजे ।
तरीच पाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणें जाणेंचि न धडे ।
साकार हें मोडे दास म्हणे ॥३॥
॥१७॥
निर्गुणस्वरूपीं मूळमाया झाली ।
तिच्या पोटीं आली गुणमाया ॥१॥
गुणमायेपोटीं झाला सत्त्वगुण ।
सत्त्वी रजोगुण उद्भवला ॥२॥
उद्भवला रजोगुणीं तमोगुण ।
तमोगुणीं जाण व्योम झालें ॥३॥
व्योमापोटीं तेज वायुवायु पोटीं ।
तेजीं तें सहज आप झालें ॥४॥
आपापासूनियां भूमंडळ होणें ।
शास्त्रींचीं वचनें दास म्हणे ॥५॥
॥१८॥
मायेचें स्वरूप ब्रह्मीम उद्भवलें ।
तिच्या पोटा आलें महत्तत्त्व ॥१॥
महत्तत्त्वीं प्तत्त्व सत्त्वीं रजोगुण ।
तिजा तमोगुण रजापोटीं ॥२॥
पोटीं पंचभूतें तमाचिया आलीं ।
दास म्हणे झाली सृष्टि ऐसी ॥३॥
॥१९॥
शून्यापासूनियां जन्म आकाशामी ।
आकाश वायूसी प्रसवलें ॥१॥
प्रसवला वायु तया तेज झालें ।
तेजाचिया आलें पोटा आप ॥२॥
आपापासूनियां सृष्टि ते जन्मली ।
ऐसी विस्तारली मायादेवी ॥३॥
मायादेवी वेळे शून्याकडे पळे ।
ते काळीं खवळें पंचभूत ॥४॥
जें जें जया व्यालें तें तेणें भक्षिलें ।
अंतीम तें उरलें शून्य एक ॥५॥
शून्याचें स्वरूप पाहातां कांहीं नाहीं ।
तें शून्य सर्वही जेथे आटे ॥६॥
आहे हें आटलें त्यांचें शून्य झालें ।
शून्यहि विरालें जे स्वरूपीं ॥७॥
स्वरूप पाहातां काळ वेळ गेली ।
निज ठेवी लाधली प्राणीयासी ॥८॥
प्राणीयांचें हित आहे संतांपायीं ।
वेगीं शरण जाई आलियातें ॥९॥
आलिया रे संतसंगें मुक्त होसी ।
रामीं रामदासीं हेंचि वर्म ॥१०॥
॥२०॥
पृथ्वीतळीं व्याळ व्याळांतळीं जळ ।
त्यातळीं अनळ सत्य जाण ॥१॥
सत्य जाण तया तळीं तो अनिळ ।
त्यातळीं पोकळ व्योम आहे ॥२॥
व्योमातळीं अहंकार तो केवळ ।
तेणें ब्रह्मगोळ धरियेला ॥३॥
धरियेला पुढें महत्तत्त्व असे ।
सप्तावरण ऐसें निरो-पिले ॥४॥
दशगुणीं थोराहुनि थोर एक ।
हे सप्त कंचुक दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP