पंचक - निष्ठापंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
ब्रीद आपुलें राखावें ।
आम्हां भक्तां सांभाळावें ॥१॥
बहु नाहीं वाडाचार ।
आतां एकचि निर्धार ॥२॥
एथें कांहीं नाहीं व्यस्त ।
आतां बोलतों नेमस्त ॥३॥
रामदास म्हणे एक ।
आतां धरावा नेमक ॥४॥
॥२॥
नेणों भक्ति नेणों भाव ।
आम्ही नेणों दुजा देव ॥१॥
राघवाचे शरणागत ।
आहों रामनामांकित ॥२॥
मुखीं रामनामावळी ।
काळ घालूं पायांतळीं ॥३॥
रामदासीं रामनाम ।
बाधूं नेणे काळ काम ॥४॥
॥३॥
राम अनाथांचा नाथ ।
आम्हां कैवारी समर्थ ॥१॥
वनीं शिला मुक्त केली ।
गणिका विभानीं वाहिली ॥२॥
राम दीनांचा दयाळ ।
देव सोडिले सकळ ॥३॥
रामीं रामदास म्हणे ।
आतां आम्हां काय उणें ॥४॥
॥४॥
भूत भविष्याचें ज्ञान ।
जयां अमृतभोजन ॥१॥
रे या देवांचा कैवारी ।
तोचि आमुचा सहाकारी ॥२॥
कल्पतरु चिंतामणि ।
कामधेनूचीं दुभणीं ॥३॥
नाना रत्नांचे डोंगर ।
दिव्य भोग निरंतर ॥४॥
रामदासाची आवडी ।
अवघे देव तेहतिस कोडी ॥५॥

॥ अभंगसंख्या ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP