पंचक - उपासनापंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
ज्ञातेपण आधीं सांडी ।
जाणत्या नावडे पाषांडी ॥१॥
देव पतितपावन ।
त्यासि करी अभिमान ॥२॥
ध्रुव प्रल्हाद आपुले ।
भक्त जेणें उद्धरिले ॥३॥
बहुसाल भूमंडळीं ।
तारी भक्तांची मंडळी ॥४॥
जड मूढ सांगों किती ।
ज्यांचि नामें असंख्याती ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
अंतकाळीं सोडवणें ॥६॥
॥२॥
पूजा देवाची प्रतिमा ।
त्याचा न कळे महिमा ॥१॥
देव भक्तांचा विश्राम ।
त्यासि नेणे तो अधम ॥२॥
नाना स्थानें भूमंडळीं ।
कोणीं सांगावीं आगळीं ॥३॥
ज्याचे चरणींचे उदकें  ।
धन्य होती विश्वलोकें ॥४॥
ज्याचीं चरित्रें ऐकतां ।
जनीं होय सार्थकता ॥५॥
रामीं रामदास म्हणे ।
धन्य होईल स्मरणें ॥६॥
॥३॥
देव भक्तांचा कैवारी ।
रक्षितसे नानापरी ॥१॥
काय स्तंभीं प्रगटला ।
तेणें प्रर्‍हाद रक्षिला ॥२॥
तये द्रौपदीकारणें ।
वस्र दिल्हीं नारायणें ॥३॥
महासंकटीं रक्षिलें ।
गजेंद्रासी सोडवीलें ॥४॥
कूर्मरूपे धरिली धरा ।
झाला वराह दुसरा ॥५॥
जाणे दासाचें अंतर ।
लाखा जोहरी वीवर ॥६॥


Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP