मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| ॥सर्ग॥ ११७ दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत ॥सर्ग॥ ११७ एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी ॥सर्ग॥ ११७ Translation - भाषांतर श्रीरामसमर्थ ॥अभंग॥ वेडावली वाणी वेदाची बोलतां । देव पाहो जातां अनिर्वाच्य ॥१॥अनिर्वाच्य देव वाचा बोलूं गेली । जिव्हा हे चिरली भूधराची ॥२॥भूधराची जिव्हा जाहली कुंठित । दास ह्मणे अंत न कळे त्याचे ॥३॥॥वोवी॥ जया देवाचा करितां शोध । वेदवाणी ते जाली मंद । शेष शाहणा तो जाला स्तब्ध । जीभ चिरोन जाली द्विधा ॥१॥जया देवाचा न लागे आंत । अटक्य पडे थोरथोरांत । वार्तिकार ते चालीले भ्रमत । विदित इतरांत काय हें ॥२॥देव तो आद्य अगोचर । निर्विकल्पीं नित्य निराधार । अनिर्वाच्य अनाम्य अगोचर । निजनिर्गुण निरंजन ॥३॥॥अभंग॥ कां देव कळेना श्रोतेनो ह्मणाल । भिन्नत्वाच बळें न चाले ची ॥१॥मायामय सर्व सारुनिया माग । करुं जातां लाग परात्परी ॥२॥वृत्ति ना निवृत्ति नाही मीतूंपण । तदाकारी खूण न सांगवें ॥३॥जेथें यतो वाचोनिवर्तंते श्रुती । दुजी नेति नेति अनिर्वाच्य ॥४॥अप्राप्य मनसा सह दूजी खूण । बोलण चालणें तेथें कैच ॥५॥सीणले ज्यासाठीं आगम नीगम । स्वयें आत्माराम सर्वातीत ॥६॥॥वोवी॥ देव आहे हें सर्वां ठाऊक । प्रत्यक्ष पाहणें घडे कौतुक । तेथें चि जन्माचें होय सार्थक । न चोजे कां अटक भ्रमाचा ॥४॥तंव श्रोतयांनीं उभविला प्रश्न । देव तो अनंतु नामरुपविहिन । तरि सगुणाकार येवढा जाला कोठुन । जी ऐकाव वचन समर्थ ॥५॥॥अभंग॥ देव निराकार त्या नाहीं आकार । तरी हा विस्तार०॥च०॥६॥॥वोवी॥ निर्विकारी कांहीं च न घडे । विकारें विकार वाढे मोडे । देवद्वार उघडे कैवल्य जोडे । कर्त्यांची वळखी धरिल्यानें ॥६॥॥पद॥ धाट सद्गुरु सेवीतां० ॥चंचळ चपळ रे प्राणनाथ । जातां न लगे वेळ रे ॥धृ०॥ बोलवि चालवितो तो प्राणनाथ । नयेन हालवितो ॥१॥देखत चाखतसे तो प्राणनाथ । बोलत ऐकतसे ॥२॥हुंगत सांगतसे तो०॥ देतसे मागतसे ॥३॥सुखदु:खे भोगीतो तो०। आनंदतो सीणतो ॥४॥सकळ कळे तो चि तो तो० । निजतत्व तो चि तो ॥५॥पाहतां जवळी तो० । कल्पना विवळीतो ॥६॥बहु शरिरें चालवितो प्राणनाथ । श्रुष्टी सकळ हालवितो तो ॥७॥स्वर्गमृत्य पाताळी तो० । खेळतितो तीहीं ताळीं ॥८॥नर अमर पतंग तो० । खेळवि सकळ जग ॥९॥आखंड जवळी आसे तो० । त्यासी तो चि विलसे ॥१०॥स्वामी सेवक वर्तवितो प्राणनाथ दाखवीतसे कवी ॥११॥॥वोवी॥ प्राणनाथ जो सर्वाकारण । तो रमतां फिरोन आपणि आपण । जडमाया ते जाय निरसूण । देव तो सघन होय स्वयें ॥७॥ऐसियापरी करीत प्रबोध । स्वयें स्वरुपीं होउनि सित्ध । क्रिया जनीं या दावीत शूत्ध । पर्याटत चालिले कोण ऐका ॥८॥समर्थदासाचा सिष्य विख्यात । कल्याणस्वामी थोर सद्भक्त । याचे सिष्य जो मान्य संतात । शिवाजीबावा अपचंदकर ॥९॥पाहोन जयाची उदासस्थिती । गुरु वदती याला रक्षो रघुपती । गळा पडलीसे न सुटे विरक्ती । शूर सद्वंशी सुंदरु ॥१०॥अचूक जयाच पाठांतर । श्लोकादि चौर्याऐसी हजार । लवाभिधानी जो श्रीरामपुत्र । अंशावतार होय तयाचा ॥११॥सखा जालासे पवननंदन । निस्पृही मोठे ज्ञानसंपन्न । बहुत जनाला केलें पावन । ऐका चरित्र मुळींहुनी ॥१२॥लीळा वानाया न पुरे मुख । अभंग बोलिला जो समर्थदेशिक । रहणीं तयाच्या होतो सार्थक । ऐकोन आणा हो ध्यानासी ॥१३॥॥अभंग॥ धन्य त्याच कुळ धन्य त्याचा वंश । जे कुळीं हरिदास अवतरला ॥च०॥१०॥॥वोवी॥ चरणपदबंदीवत चरित्रें । जालीं पुढारीं कळेल विस्तार । प्रस्तुत ऐका होऊन सादर । लीळा गुरुची मुळींहुनीं ॥१४॥ग्रामनाम वदती वैराट वांई । देशपांडे तेथील गुणग्राही । शंकरपंत तो जाला तपस्वी । भार्या अक्काई पतिव्रता ॥१५॥॥अभंग॥ धन्य तो चि नर इछितु सार्थक । जाला पुण्यश्लोक बळें जगीं ॥१॥धन्य तो गृहस्थ संकल्पसंताप । टाकुनीया तप साधीतसे ॥२॥धन्य पतिव्रता नातळे अधर्मा । सदां मनीं प्रेमा परमार्थ ॥३॥धन्य ऐसियाच उंदरीं अवतार । केला योगेश्वर तारुं जगीं ॥४॥मुख्य आत्माराम जाला जेथ वस्य । घडावा सहवास ऐसियाचा ॥५॥॥वोवी॥ पंत तो लिंबाचा सेउनि रस । अन्य पदार्थी न धरितां ध्यास । त्रयचारमहिने वरिस षण्मासा । कष्टतां हरी आसे प्रसन्न ॥१६॥कळा न उतरे न वाळे काया । न ये चंचळता न झोंबे माया । परमार्थाचा ध्यास लागुनिया । उदास आसती सर्वकाळीं ॥१७॥सुज्ञ उदारी तपस्वी मोठा । सुकृतांशाचा होऊनि साठा । पुण्यवंत प्रतापी आले पोटा । जाले त्रय पुत्र येक कन्या ॥१८॥करुनी तयाच उपनैन लग्न । अति उदासी जाला सुज्ञ । गुरुरायाच करीत शोधन । डोंबगावासि पातले ॥१९॥कल्याणस्वामी आसे महंत । मुक्तिप्रदाता हा वळखोन सत्य । षडवर्ग ही जाले अनुग्रहित । सेवा संपादित राहिले ॥२०॥देखोन तयाच भक्तिभाव पूर्ण । संतोष पावले गुरु दयाघन । प्रपंचमिरासी आस्था टाकुन । वैराग्यपंथीं वेधलें ॥२१॥शिवाजीबावा वडील पुत्र । प्रपंच नावडे जया अणुमात्र । भार्या गंगाई सुंदरा पवित्र । जाली शाहणी कुळवंती ॥२२॥परि बावामानसी नसे वासना । न ठावा ज्याला कामना कल्पना । विवाहसमई न घालितां मना । अग्रहोन लग्न केलेति ॥२३॥शंकरराय तो पिता सर्वज्ञ । संतोष पावती वळखोन चिन्ह । मायबाईला न कळे खूण । ममता झोंबुन बुत्धि सांगे ॥२४॥न ऐकतां तेणेंचिंतेनें माता । गुरुरायासि कळवितां वार्ता । स्वामींनीं ही कसवटी लावितां । न डंडळे चि मन ज्याच ॥२५॥गुरुराज तेणें हौउनि प्रसन्न । झोळी काठी मेखळा निशान । वोपितां महंतीच बानीं धरुन गुरुरायात तोषविलें ॥२६॥पाहोन येकदां येकांत समय । कांतेस पूसती जासील काय । धाडितील माहेरा सण ही आहए । भावोन त्रिवारे हो ह्मणतिली ॥२७॥पाहोन कृपेनें आले बाहेरी । श्रीरामरुपीं मिळाली नारी । शोचिता मातेनें नानापरी । खुणोन पित्यानें समजाविलें ॥२८॥उदरा आलासे हा सद्वंशरत्न । ब्रह्मचारी व्रतस्छा निपुण । लीळा जयाची करील पावन । जत्तन करी वो मन राखी ॥२९॥तरी ही मायेला न सुटे ममता । पुन्हा उजळिजे हे धरुन आस्था । होऊं गुरुआज्ञा पुसायां जातां । हांसोन बोलिले ऐक बाई ॥३०॥जंव संभ्रमानें मांडिल लग्न । तंव घातल आसे यांनीं कौपीन । साह्य जालासे अंजनीसूत । करुं द्या महंती कां खटपट ॥३१॥हे गुरुवरदानें तुष्टली आई । कन्या ते राहिली श्वश्रूरग्रहीं । घेउनि समुदाया शिवगोसावी । तीर्थक्षेत्र पाहवीत चालिले ॥३२॥जिकडे तिकडे पावती मान । संतसाधु ते करिती प्राण । ऐकतां जयाच सयोग्य कीर्तन । शरणांगत होती जन बहु ॥३३॥शापानुग्रहसामर्थ्यवंत । तो शंकराजीबावा पीता समर्थ । येऊनि राहिले वढेहाळात । तुळजापुरापैलीकडे ॥३४॥तो पिता योग्याचे सिष्यामाजीं । संग्रहीं होता येक तो भानजी । गांवकरी ते होउन राजी । करुनि दीधले मठस्थळ ॥३५॥आसतां ते स्छळीं शिवरामदेशिक । केशवनामा कोणी भाविक । विनवितु पाई ठेउनि मस्तक । विद्यादान माते वोपिजे ॥३६॥काय विद्या ते म्हणतां तुष्टुन । करीन ह्मणे मी सर्वदा कीर्तन । तो वरदयुक्त येक सिकविलें वचन । कर्ता गुरुराज भाउनी ॥३७॥॥पद॥ धाटी । खेळे पुतनारी० ॥नित्य स्मर तुं कल्याण वाचे ॥धृ०॥ दोष दु:ख सर्व तापत्रयादिक ।शांत होती जीवाचे ॥१॥सांडुनिया सर्व माईक धंदा । तोडोनि पाश भवाचे ॥२॥सर्व मनोरथ सफळित जाले । ज्याचेनि पूर्ण शिवाचे ॥३॥॥वोवी॥ तेणें बुत्धि ते जाली विषाळ । लिहोन दीधले भरणा पुष्कळ । कीर्तन करुं लागला रसाळ । गुरुराज प्रसन्न याहेतु ॥३८॥धन्य पिता तो तपस्वी पुरुष । मिळे लिंबाचा प्रसाद ज्या रस । प्रबुत्ध तात्काळी होती सिष्य । वरवाक्य खालीं न पडे ची ॥३९॥भाळोन सर्वदा तप हृदयधामीं । वास्तव्य केलासे रामदासस्वामी । वसिष्ठमुनि जसा प्रपंचधर्मी । वर्तोन केला जन्म सफळ ॥४०॥राहिले त्या गांवी कांही दिवस । कळवोन सर्वत्रां गुज रहस्य । सस्वरुपीं जाले समरस । विधान सर्व ही सारिलें ॥४१॥समंधी भले आसे त्या ठाउक । ब्रह्मवेत्याला न कीजे दु:ख । भिक्षा साहित्य वरुनि हरिख । उत्साव केले यथास्थित ॥४२॥जगन्नाथबावा तडवळेकर । आणिखी सत्पुरुष थोर थोर । आले सुखविलें संतोषभरें । गाईले कीर्तनीं स्वल्प ऐका ॥४३॥॥पद॥ श्रीगुरुचरणीं चित्त लावी रे बापा ॥धृ०॥ माझें माझें बकतोसि वायांविण थिंकतोसी घडी घडी काळ टपलावी ॥१॥द्रव्यदारा गारा सारा सर्वासि पाहिजे थोरा । सेवट हे माया मोकलावी रे ॥२॥चक्रवती आले गेले नेणो जीव किती मेले । बुत्धि हे अंतरीं निवळावी रे ॥३॥येथुनीया तेथेंवरी शाश्वत कल्याण हरी । पांच ही पंचक नीवेदावि रे ॥४॥(॥धा०लावोनिया लो०॥) देवाधिदेव मुख्य प्राप्तीचा नरदेह ठाव तयासि नेणतां व्यर्थ जाय रे ॥१॥जन्मुनि साधिलें सार काय रे । मिथ्याभूतमाया सर्व पाहे रे ॥धृ०॥सर्व देवामध्यदेव तो हा श्रीगुरुपाव । कां रे आव्हेरिले त्या पाया रे ॥२॥पूर्णब्रह्म सदोदित नित्य शाश्वत संचल । खूण ठाकेना कल्याण पदठाया रे ॥३॥(धा० देहाभिमान वाहे)॥) लवण सिंधु जेव्हां । वेगळ नुरे तेव्हां ॥१॥शरण तसा जासी तैं ब्रह्म रुप होसी ॥धृ०॥ वोहळ मिळे गंगा । तैं नाव काय पैंगा ॥२॥शर्करा क्षिरीं गेली तैं भिन्न कोण केली ॥३॥जगजीवनप्रभूसंगीं । ते अळी होय भृंगी ॥४॥॥वोवी॥ व्याख्यान करकरुं केलें कीर्तन । स्वस्थळासि गेले पावोन मान । पिताचे शिवाजीबावाचे सद्गुण । वानोन कळविती बहुतासी ॥४४॥तिघे पुत्र ही प्रतापवान । कां काशांत सांगा पडेल नून्य । करुन समाधीवृंदावन । भानजीस नेमिले पूजावया ॥४५॥शिवरामस्वामी पितरभक्त । जाणोन चिंता लागली मातेतें । पुत्रीस भेटउं बांधवासहित । कानुडामुलकासी पातले ॥४६॥निष्ठा जयाची गुरुपादपद्मीं । तेणें प्रसन्नु रामदासस्वामी । बहुतांस वागउं सांप्रदायक्रमीं । बुद्धि देउन धाडिले ॥४७॥नरावणगावीं होते सोई रे । ते तरले भक्तीनें तोषले सारे । श्रीरामभक्तिचे लाउन फरारे । राहिले स्वामिनीं भक्तिस्तव ॥४८॥नरावण सलगरा चिंचमसूर । अर्णकल्लु रटकल्ल मडकी नागुर । कलबरगा मुडवळ चित्तापुर अवरंगाबाद तळघाट ॥४९॥सिष्यवर्ग जाले या पुण्यपात्रगांवी । आणिखी बहुदेशीं ठाई ठाई । सिष्यवर्ग जाले गृहस्थ निस्पृही । तपपुण्य जयाच अगाध ॥५०॥सातारामाजीं आसती सिष्य । कोल्हापुरप्रांती नांदती बहुवसें । समागमीं वागती पुण्यपुरुष । सेवा संपादित हित साधित ॥५१॥रामजीबावा रामकृष्णबावा । गंगाजीबावा दामोदरबावा । रामबा भीमबा शामबावा । अपाजीबावा सहदंपती ॥५२॥चिमा बहिणाई कासीबाई । आणिखि ही थोरसान निस्पृही । यासहित येकदां गुरुगोसावी । अपचंद शिंवारीं पातले ॥५३॥लाहन खेडा तो नाममात्र वोस । बाभळ बन दाटी भय ही आसे । नदितटीं उतराया मुसाफरास । धैर्य न होय जाती पुढें ॥५४॥तो कवण्याच्याही न पडतां दृष्टी । सन्मुखी पातला भीम जगजेठी । सांगे मम मूर्ती आसे भूपोटीं । काढुन स्थापी पूजा करी ॥५५॥उपासना वाढवी या गावांत । प्रीत वाटेल रामदासांत । पैलाडराणीं कंठींहणुमंत । आसे दर्शन घेई पां ॥५६॥वदोन यापरी होता गुप्त । सद्गुरुधण्याला वाटल विस्मित । मग चिंतन सुराहुन अंबलगेंत । येऊन राहिले भक्ताघरीं ॥५७॥सत्शिष्य तेथील रायाजी पंत । श्रीरामनौमीला देतां साहित्य । तें आणोनिया रटकल्लमठांत । उत्छाव केलें ससांग ॥५८॥भक्तजन मिळाले यात्रा फार । भिक्षा ही येतसे वरचेवर । गावींचा यजमान मराठा क्रूर । तो ही सर्वदा रुजु आसे ॥५९॥सकळास कळविलें क्रमादिरीती । अद्यापी तेथें चाले पत्धती । कीर्तन जयाच ऐकोन वृत्ती । पालटोन शरण बहु आले ॥६०॥श्रीरामजन्म अहिल्योत्धार । सैंवरादिसिंहासनविस्तारे । वानिले त्यांतील येक दोन सुंदर । वाक्य ऐका हो प्रीतीनें ॥६१॥॥पद॥ (धाट जाग जोगी०) शंभुमहादेवाचें देणें । जालें रावणाकारणें ॥धृ०॥ पूर्वी होतें करंटपण । दरिद्रि रावण ॥१॥तेणें धरुनि येक भाव । पूजिला महादेव ॥२॥सीराहात वाळविला । रावण हाता केला ॥३॥देवा पुढे नि:शंक नाचे । देव म्हणे वाचे ॥४॥बहू नीकट सेवा केली । सीर ते वाहिली ॥५॥देव भक्तीस भुलला । रावणा वोळला ॥६॥राज्य दीधले लंकेचे । चौदा चौकडयाचें ॥७॥दाहा सीरें वीस भूजा । त्रिकुटीचा राजा ॥८॥भाग्य चाललें अपार । नाहीं पारावार ॥९॥बहूत दीधली संपती । जाहली संतती ॥१०॥असंभाव्य घोडेस्वार । कुंजराचे भार ॥११॥रथ धांवती अपार । बळाचे निशाचर ॥१२॥उदंड छत्रसुखासनें । पताकानिशानें ॥१३॥मेघडंब्र सूर्यपानें । बहूविध याने ॥१४॥हुडे गड कोठ माहाल । अखंड खुसीयाल ॥१५॥लंका सोन्याचें नगर । रत्नाचे डोंगर ॥१६॥ऐसी हजार अंत:पुरें । सुंदरें सुंदर ॥१७॥केले शंभूनें न्याहाल । मुल्लुक माहाल ॥१८॥अखंड सुवर्णाच्या भिंती । रत्नें ढाळ देती ॥१९॥लंका पाहों जातां किती । इंद्राची संपती ॥२०॥महा दैत्य राजे जाले । लोक पीडावले ॥२१॥अवघें त्रैलोक्य जिंकिलें । दैत्याव मांडले ॥२२॥केलें देवासि बंधन । पीडावले जन ॥२३॥बहुत दानवाची थाटें । निघती कडकडाटें ॥२४॥जैसे पर्वत उठिलें । मेघ उचलले ॥२५॥आठरा क्षोणी वाजंतरें । दळें तीं अपारें ॥२६॥वारा घेती बाबरझोटा । मस्तकीच्या जठा ॥२७॥माथा सिंधुर वोतिली । शस्त्रें लखलखिलीं ॥२८॥माहाकुर्मांचे टवके । धरिलीं खटकें ॥२९॥सुरवर जेर जाले । राजे ही जिंकिलें ॥३०॥वोस जालें भूमंडळ । खंडळ मंडळ ॥३१॥मद्यप्राशन करिती । सागरीं पोहती ॥३२॥दंत दाढा विक्राळा । नेत्रामध्यें ज्वाळा ॥३३॥बळें मर्यादा सांडिली । निती वोलांडिली ॥३४॥देव घातले बांदोडीं । केलें देशधडी ॥३५॥ग्रह ग्रहानें भुतले । वाटेसी घातले ॥३६॥ वस्त्रें वन्ही तो पाखाली । इंद्र जाला माळी ॥३७॥ब्रह्मा पातडया वाचितो । चळचळां कांपतो ॥३८॥नाव्ही जाला मल्हारी । हज्यामती करी ॥३९॥गणेश अंतरीं धाकतो । गाढवें राखतो ॥४०॥राहे राणवसाभीतरी । सटवी कष्ट करी ॥४१॥छेत्रे धरीतो मयंक । देव जाले रंक ॥४२॥वायो झाडुनिया जातो । वरुण सींपीतो ॥४३॥देव बहु जाजावले । रघुनाथ पावले ॥४४॥सीता चोरुनिया नेली । विवशी उदेली ॥४५॥राज्य महादेवानें दिल्हें । पापानें बुडविलें ॥४६॥नाहीं अक्रावा पूजिला । मारुति क्षोभला ॥४७॥रीस वान्नर मिळाले । उदंड गोळा जाले ॥४८॥पहिलें दूत पाठविला । अक्षया मारिला ॥४९॥रामें सिंधु पालाणिला । त्रिकुटासि गेला ॥५०॥लंका सामर्थ्ये जिंकिली । सीताशुत्धि केली ॥५१॥युध्य मांडलें तुंबळ । राक्षसाचें दळ ॥५२॥दूत जाउनिया आला विरोध मांडला ॥५३॥भारेभार उठावले । मारीत सूटले ॥५४॥कपी देवाचे अवतार । सामर्थ्य आपार ॥५५॥काळ आला महाकाळ । थोर हलकल्लोळ ॥५६॥बळावरी बळ आलें । निर्वाण मांडलें ॥५७॥रजनीचर हाका देती । भार कलकलिती ॥५८॥लंका घेतली वान्नरीं । जाली मारामारी ॥५९॥सिळासिखरें टाकिती । बळें भुभु:कार देती ॥६०॥आवघे दैत्य सित्ध जाले । वान्नर भीडले ॥६१॥नाना शस्त्राचे खणाण । पडती दणाण ॥६२॥गदा मुसळें तोमरें । वाहती रुधिरें ॥६३॥निकट जाले वान्नर । चालीयले भार ॥६४॥कपी चपेटा मारिती । दैत्य लौदाडिती ॥६५॥लाता बुक्या परस्परें । हाणिती पापारे ॥६६॥थापा चपेटा मारिती । वीर चूर होती ॥६७॥येकी येक वेटळिले । पिळून पाडिलें ॥६८॥कपी तोंडास डसती । उदर फाडिती ॥६९॥वीर पालथे उताणें । पडिले दैन्यवाणें ॥७०॥पाईं धरुन आपटिलें । मस्तक फुटलें ॥७१॥हातापायाची टिकोरें । मोडिलीं अपारें ॥७२॥झोटधरणी जाली । प्रेत नदी आली ॥७३॥गळे पिळुन टाकियले । वीर झोंबी आले ॥७४॥झोंब्या लागल्या उदंड । रांडा घेती तोंडा ॥७५॥वीरेंवीर संहारले । भार मागें आले ॥७६॥कपी टाकिती डोंगर । कोट केला चुर ॥७७॥रथ उदंड निघाले । रणांगणा आले ॥७८॥मस्तहस्त घोडेस्वारे । धावती अपार ॥७९॥विरें वीर खवळला । मारित सूटला ॥८०॥येकमेका संव्हारती । मागुती धावती ॥८१॥हस्तें हस्त रथें रथ । मारिती समस्त ॥८२॥धुरा धुरेसी पाडिती । उदंड संव्हारती ॥८३॥बाणीं घातला मंडप । जाला भूकंप ॥८४॥तारा पडती जैशा गारा । उठिला धुळारा ॥८५॥रण दाटली उदंड । ढीग धंडमुंड ॥८६॥भुत औटकोटी आली । स्वापदें मिळालीं ॥८७॥गीदभार आले तेथें । केत भूतें प्रेतें ॥८८॥शस्त्राअस्त्रांचें भांडण । जाहालें निर्वाण ॥८९॥पुत्र मित्र रणा आले । समस्त निमाले ॥९०॥राम रावण समोर । बाणीं अंध:कार ॥९१॥कोप खवळला रावण । सोडिताहे बाण ॥९२॥अवघा धुंधकार जाला । प्रळय मांडला ॥९३॥येक येकासी भेदिती । सामर्थ्य छेदिती ॥९४॥रामें रावण मारिला । बंद् सोडविला ॥९५॥अवघे देव सुखी जाले । भुवनासी गेले ॥९६॥राज्य बिभीषणा दिधलें । दैत्याव मोडलें ॥९७॥सुख जालें विश्वजना । आनंद सज्जना ॥९८॥बंधु भरथा भेटी जाली । अयोध्या देखिली ॥९९॥रीस वान्नर जेविले । मार्गस्थ जाले ॥१००॥अवघें रामराज्य जालें । दासाचें मांडलें ॥१०१॥॥वोवी॥ गृहस्थ विप्र गाविचे नेणती चर्या । रम्य चाली नाना नीट क्रीया । वळोन तशाला भक्ति लाउनिया । जाणते केलें कृपेनें ॥६२॥जोतिबा कुलकरणी सिष्य जाला । सांप्रदायक्रमाचा आसरा केला । भिक्षान्न महिमा मुख्यादिकांला । दाऊन पुढारी चालिले ॥६३॥घेउनिया परिवारमंडळी । उतरले कंठी मारुती जवळी । भिक्षादि सामुग्री बहुत जाली । संतर्पण जाले यथाविध ॥६४॥मग सरकारामाजीं कळवोन मात । पातले सुमुहूर्ती आपचंदांत । भक्तजन ही मिळाले बहुत । ऐकोन वृतांत सौख्यकर ॥६५॥साहित्य अपसया होतसे सित्ध । वैराग्य जयाचें असोन अगाध । सहनता नसे क्रिया अबत्ध । सर्वासि वेध श्रीरामीं ॥६६॥वृद्ध जनाच्या अनुमतें स्थान । खणितां निघाला अंजनीसुत । बसावयाच करुनि ठिकाण । उचलितां मूर्ति न ढळे ची ॥६७॥भक्त येक होता गुप्तरुप वाणी । पाहोन तयाला सकृपें स्वामींनीं उचलीं गा ह्मणतां शक्ती प्रेरुनि । आणोन ठेविला ठायावरी ॥६८॥मग करविलें त्वरेनें गर्भ देउळ । भक्तजन विप्री मिळाले पुष्कळ । तेथें चि मठाच नेमुनि स्थळ । मारुतीराया प्रतिष्ठिलें ॥६९॥धनधान्यवस्त्र फराळ भोजन । पूजनसाहित्य प्रबोध कीर्तन । येणें जनाच आदरमान । न पडे चि नुन्य त्यांत कांहीं ॥७०॥हरिदास संताची उरकल्या कथा । कीजे स्वामींनीं हे सकळा आस्था । जाणोन उठिले शिवगुरुदाता । कथांतीं वानिलें हरिमहिमा ॥७१॥॥पद॥ धाट (रघुवीरवंश) ॥ पिंगाक्ष भव्यवदना । देवा निर्भयभक्तसदना ॥ध्रु०॥ चंचळरुप वितंड स्वरुप । दया रघुभूप उदंड करी ॥१॥पुछें लपेटुन दैत्य झपेटुन । काळ चपेटुन नेत असे जयवंत हरिवर ॥२॥भव्य भयानक तो कपिनायक । मज वरदायक दास ह्मणे महिमा न गणे हर ॥३॥॥श्लोक॥ भीमभयानक तो सिकलावी । भडकला सकळा भडकावी ॥श्लोक॥५॥॥पद॥ प्रतापरुद्रा भिमराया । अरिविरमर्दन विवराया । प्राणा तैं तुं रघुराया । वान्नरकुळभूषणराया ॥१॥मघवारिचा आरिला । आला आघात वारीला । तैं त्वां आणिलें गिरिवराला । रघुवीर वरला भववरला ॥२॥रामदासा पाळक तूं । विघ्ना वरिवर वारक तूं ॥३॥कल्यानमूर्ति कारक तूं । शिवादि अंतर चाळक तूं ॥४॥॥वोवी॥ संपल्यावरी करणें कीर्तन । सूर्यकवी तो थोर प्रवीण । गुरुरायाचें मांडिलें स्तवन । फारांत स्वल्प श्रवण करा ॥७२॥॥श्लोक॥ सारासारविचार अर्थ करिती नाना मतें शोधिती । भेदाभेद मुळीं नसे श्रुतिमतें ऐक्यत्व संस्थापिती । नित्यानंद पदारविंद नमुनी । विश्रांतिचे अंतुरीं । ऐसा श्रीशिवरामसद्गुरुभजा भक्तासि जो उद्धरी ॥१॥लीळा मानववेष भावसदृशही वर्त्ते जनासारिखा । कर्माकर्मि अलिप्त निश्चळ मनें जे दृश्य त्या पारिखा । स्वभावें सदयानिधी भवगजा लक्षोनिया संव्हरी । ऐसा श्री० ॥२॥जो विश्वीं विलसे बिजीं दृम जसे माया समंध तसा । नाहीं आदि न मध्य अंत भरला साकारतेचा ठसा । सर्वी व्याप्त अलिप्त देशिकपणें हस्ताब्ज ठेवी शिरीं ऐसा श्री०॥३॥मिथ्या हा जगभास आत्म विलसे सत्यत्व दावीतसें । आदर्शी दुसरे दिसे मुखपरी तेथें दुजें पैं नसे । मायोपाधि विकार अद्वय मुळीं सत्ता गमें ईश्वरी । ऐसा श्री० ॥४॥राहे जो अपचंदवास करुनी बेणी तोरेच्या तिरीं । स्थापी वायुकुमारमूर्ति बरवी देवालया भीतरीं । त्यातें सूर्यकवी स्मरोनि हृदईं घे पादुकातें शिरीं । ऐसा श्रीशिवराम सद्गुरु भजा भक्तासि जो उत्धरी ॥५॥हे श्लोकपंचक मुखीं पठती स्वभावें । त्यांलागि तेचि समईअ शिवराम पावे । येथें विकल्प धरि रौरव त्यासि होती । हें सूर्य गर्जुनि वदे शिवराममूर्ति ॥६॥॥वोवी॥ हें आसो होतसे सदा संतर्पण । दोनशत गाईचें होतसे दूभण । ताकपीठाचें वाढल महिमान । अटकाव कारण नसेचि ॥७३॥सदा हि वागती हरिदस सज्जन । हे सहकारीं कळतां वर्तमान । तो गांव दीधला जाहागिरी नेमुन । नूतन कौलानें वस्ती जाली ॥७४॥पाटील रायाजीपंत सत्सिष्य । कुटुंबसह सेवा करी हरुष । जंव प्रतिष्ठोन चालिले महारुद्रास । आडविला जाऊं न देतां ॥७५॥तुजकरितां मी आलो बाहेरी । न जाई बा मजला करुन दुरी । महंती आणिके देशांतरीं । करसील कां येथ करुं नये ॥७६॥तेणें ते स्थळीं समुदाव सहित । राहिले जनाला दावीत सुपथ । पावोन भक्तीला रामदाससमर्थ । भेटोन स्थान विलोकिलें ॥७७॥दासबोधीं जो विरक्त प्रमय । तारक मार्गाचा जो जो उपाय । वर्तोन जनाला दाविती सोये । विन्हा प्रत्यय न बोलती ॥७८॥नसे कवण हि देणें उश्रमा । न प्रार्थिती किमपी मध्यमा अधमा । सित्धि साध्याची नाहीं दमगमा । भजती श्रीरामा निर्मळ मनें ॥७९॥निष्कामबुत्धिचें जेथें राहष्टण । विभव सौख्याला काय उण । जाहगीर जाली प्रयत्नेंविण । चित्तापूर प्रांतीं मुडबळ ॥८०॥द्वयग्राम मुंबळी दिसे जनाला । ऐवज न पुरे ते येक धर्माला । पुण्यतिथ्यादि उत्छाव सोहळा । भिक्षावरुन होतसे ॥८१॥चौथाया वोपिल्या पुण्यवंतांनीं । इनाम दिधलें वंदवंदोनी । कांहींच पुरेना हें असो स्वामिनी । करविलें मंडपा हरिदेउळा ॥८२॥मंडळी राहिली आपचंद मठांत । पांचजण सिष्यसह गुरुनाथ । असतां नागाईयल्लुंबाचेथ । उत्धवमाहाराज पातला ॥८३॥तो चिद्धनस्वामीचा सिष्य योग्यवंत । कवन जयाचें रसाळ बहुत । जयास मानिती साधुसंत । धारुरग्रामीं मठ ज्याचा ॥८४॥रामनौमीचा उत्छाहामधें । बेदरचे पीडो पाहतां अविंद्ध । पावोन हरीनें केला निर्वेध । काजखांब खचला साक्षी असे ॥८५॥मुक्तेश्वरकृत जे भारथग्रंथ । लिहिवाऊन आणिले येक्या रात्रींत । चरित्र संताची वानिली बहुत । कीर्ति विख्यात जयाची ॥८६॥जाऊं वेंकोबा पातला तेथ । ऐकोन जाणती कळतां वृतांत । भेटोन गुरुदेवा सांगुन हितमित । बोलत उल्लासें बैसले ॥८७॥जाणोन तयाचें आयुष्य सरल । यथार्थ चि कळवितां दयाळ । तया ज्ञान्याचा निश्चय अढळ । परतावें हें न वाटे ॥८८॥ह्मणे संताच होतां दर्शन । सकळ ही सौख्या होय कारण । काय करील तें बापुडें विघ्न । पडो कीं राहो देह हा ॥८९॥मग सांभाळून आणूं तयालागी । संगीक जाले स्वयें शिवयोगी । संकट देवाला पडोन वेगीं । भेटोन केले समजाविसी ॥९०॥॥अभंग॥ धन्य वेंकटेश कृपावंत होये । होत आहे साह्य भक्तालागीं ॥१॥कलयुगांमाजी व्यकंटनायक । भजका क्षणयेक विसंबेना ॥२॥साजीर गोजीर रुप तें सुंदर । रमा मनोहर शोभीवंत ॥३॥भूषणमंडीत सुहास्य श्रीमूख । लीळेच कौतुक न वानवे ॥४॥स्वात्मानंदसुख वोपूं भक्तालागी । शेषनामनगीं धाम केले ॥५॥॥वोवी॥ व्यं पातक कट ते छेदकर्ता । न सरे भक्ताला पदवी देता । दीन तिम्मपा ह्मणती वृथा । रड्डी नव्हे तो श्रीनिवास ॥९१॥तो भक्तरायाचा जाणोन आग्रह । तेथें चि दाविलें गीरी ऐश्वर्य । सफळ जाला हो यात्राकार्य । रामदासस्वामिच्या कटाक्षें ॥९२॥तुष्टोन तेव्हां श्रीरमावर । वरदान माग बा म्हणतां त्रिवार । गुरुपुत्र सज्ञानीं तो धुरंधर । मागीतलें ऐका कवण्यापरी ॥९३॥॥पद॥ ज्याचे वंशीं कुळधर्म रामसेवा । त्याचे वंशी मज जन्म देगा देवा ॥धृ०॥ ज्याचि वाणी रंगली रामनामीं । त्यासि मजसी संवाद घडो स्वामी ॥१॥वारंवार विनंती ऐकावी । माझे स्वामिनीं सर्व सित्धि न्यावी ॥२॥ह्मणे उद्धवचिद्धन महाराज । रामदासाचा संग घडो मज ॥३॥॥वोवी॥ हें ऐकोन तुष्टला गुप्तला देव । स्वस्थळासि गेला बावाउत्धव । आपचंदाप्रती येउन गुरुराव । तारीत भक्ताला राहिले ॥९४॥सिकविले बहुतां कीर्तन करुं । बहुतां बहुपरी दीधले वरु । धन्य शांतमूर्ति होइय सद्गुरु । जाला अवतारु तारक ॥९५॥स्वामीराजयाची कृपा ऐसी । उल्हास येकदां वाटोन मानसीं । करित करित भिक्षा अनयासी । सवाल घातले भक्ताघरीं ॥९६॥रायाजीपंताची भार्या सिष्यिणी । भागुबाई शुभदायवदनी । साता दिवसाची होती गर्भिणी । भिक्षा घेऊनी पातली ॥९७॥हांसोन बोलिले ते भीक घाली । घाबिरोन भोवती पाहे माउली । सर्वानंदमुनी गर्भमंडळी । पातला बाईग वोपी त्या ॥९८॥वदोन तथास्तु घालितां भीक । स्वस्थळाप्रती पातले देशिक । आठमास भरले तो कळविली वाक्य । गर्भरत्न जालेंसे गुरुअर्पण ॥९९॥प्रपंचीक ते घातला किंत । माये ही जाली मायाभ्रमित । उदर थोर जालें न होय प्रसूत । द्वादश मास लोटले ॥१००॥पति आला तो पुसे सतीत । काय नवस चुकला सांग काय हेत । येरु कळवितां दत्तवृत्तांत । धिग ह्मणे सटवे भुललीस ॥१॥तनुमनधनाच जालें अर्पण । कांहींच न करी तूं कृपणपण । मन रुजू जालें प्रबोधवचनें । प्रसवली जन्मला सलक्षणी ॥२॥स्वामीस कळवितां वर्तमान । जाऊन सकृपें पाहिलें वदन । लागो दे ह्मणता अब्द येक तब रिण । प्रतिपाळुन । अर्पिलें तैसें ची ॥३॥वळखोन रक्षिता आपुलें ठेवणें । वागविता हा जाणोन निशान । लाऊनि वृयांत झोळिच धन । नामकर्णादि विधान सारिती ॥४॥नित्य तीनदां गुरुदर्शन । करुन बाळा माय देत स्तन । रामचंद्र हें साजे अभिधान । बाळ संतयोगी वरदपुत्र ॥५॥॥अभंग॥ काय गुरुलीळा होत आहे काय । दाविती जे सोय न कळे ची ॥१॥काय देवराय होतो सानकूळ । खेळवितो खेळ परमार्थ ॥२॥जयाच चरित्र वानितां अखंड । थोतांड पाखांड न बाधे ची ॥३॥न येऊन येती जन्मकासयाचा । ठेवा सुकृताचा उघडला ॥४॥धन्य ते भक्ताचा उजळल दैव । आत्मारामदेव साहकांरी ॥५॥॥वोवी॥ रामचंद्रप्रभु तो सुकृतखाणी । पांचा वरुषांचा वाढला सद्गुणी । कोठें न टिकती सद्गुरुवांचुनी । नेणती खेळादी मूलपण ॥६॥उल्हास वाटला गुरुरायांत । करवोन सर्व ही सांग साहित्य । आरंभिलें मौंजीबंधनात । मीनले जाणते द्विजगण ॥७॥आपण पाहिजे जे जे ग्रंथ । सत्य मानावी तेवढी च मात । शोध न घेतां अनुभवपंथ । धरुन सेवटा न गेले ॥८॥दत्तहोमाच उकलून पुस्तक । नरकोत्तारण हें काढिता वाक्य । आण्णाभट्ट तो शाहणा भाविक । स्वामिरायाचा प्रिय सिष्य ॥९॥तो स्वामिरायाचा पुरोहित । संकल्प करणें हा न मनें त्यांत । गलबला करिती विप्रीं समस्त । हटनिग्रहानें वाचाळी ॥११०॥तत्समईं पातला कासीकर । ऐकतां तयाच निर्धारउत्तर । खेडेगांविचे ते झाकिलें वक्र । दानार्थ संकल्प करविला ॥११॥गवसतां वोपिता परदेशियाला । विक्रिय किं नवसाचा शरण आला । विरक्त किं मठाचा सिष्य नेमिला । तरि मुक्तसंकल्प वरावा ॥१२॥धर्ममुंजिला पाहण कायस । गोत्रास मीळवितां कासाविस । हें असो गुरुशिष्या येक चि असे । भारद्वाजगोत्र प्रवरसह ॥१३॥ससांग जालें मौंजीबंधन । संतर्पणादि उरकल विधान । रामचंद्र स्वामीगुणनिधान । ब्रह्मविद चि उपजला ॥१४॥॥अभंग॥ धन्य साधुजन मुक्त होउनिया । करुनि सत्क्रिया दाविताती ॥१॥वेदांत पाहुनि वेदाज्ञा मानिती । न पालटे स्थिती निश्चयाची ॥२॥सर्वत्रासि वाटे आह्मावरी प्रीती । सगट करिती समाधान ॥३॥स्वात्मानंदरस सेवविती बळें । वारुनिया खेळ माया मृष ॥४॥॥वोवी॥ हें चरित्र उरलें तें ऐकाल पुढारी । एक्या बाईला बोधितां भवारी । ठसेना जपमाळ होती जे करी । स्मरुन श्रीरामा सरागें ॥१५॥कोप नव्हे हो करूणावृष्टी । सुदिता माळ ते भाविकी कंठीं । बोधसार बिंबलें तेणें हृत्पुटीं । तरुन ताराया योग्य जाली ॥१६॥नमोन विनवि ते वोपिजे माळ । कां होईना ह्मणतिलें हांसोन दयाळ । परि उपास्यबळाच जाणिजे हें फळ । सप्रेम सेवेनें फळलेसें ॥१७॥॥अभंग॥ भाविकाचि चिंता वाहती ते संत । फळ अघटित वोपीताती ॥१॥विश्वासबळानें तरले अनेक । हरीहरादिक वश्य होती ॥२॥वसिष्ठकृपेनें हरिश्चंद्रराजा । येशाचिया ध्वजा उभारिल्या ॥३॥ऐशापरी बहु तरले तयाची । संख्या करुं कैची शक्ति सांगा ॥४॥गुरु देती त्याला कैचीं उतराई । स्वात्मानंदपाई भावठेवा ॥५॥॥वोवी॥ धन्य दयाळु सद्गुरुदाता । अपाजीस कथिलें सह आर्थ गीता । येकदां सिष्यांनीं धरुन अहंता । हा मम आर्थ सत्य ह्मणतिला ॥१८॥येरु समजाविलें हा पंडितार्थ । तरि ही रुजेना तयाच चित्त । कोपोन वदले ऊठ जा त्वरित । येरी कापत पळाला ॥१९॥गीता गुरुगीता मनश्लोक । पाठांतर जे होती अनेक । कांहीं च तयाला नसे स्मारक । शापानुग्रह या नांव ॥१२०॥धीर न धरवें व्याकुळ जाला । तैं सुकृतांश सेवेचा फळासि आला । सद्गुरु जनकापासी पातला करुणा भाकित दीनरुप ॥२१॥धीर देऊन येक्या दिवसीं पातले सुसमई पुत्रापासी । नमोन अज्ञापिजे ह्मणतां मुलासी । सनाथ करी बा ह्मणतिलें ॥२२॥वदसील तुह्मीच करावी दया । तरि क्षमा प्रेम ते गुरु तुष्टलिया । अवस्य हो वदतां ऐकुनिया । तो दंडप्राय पडला सन्मुखी ॥२३॥उठविलें होउनि कृपावंत । सर्वही स्फुरल जाला कृतार्थ । आणिखी ही होऊं सुसौख्य प्राप्त । उच्छिष्ट प्रसाद वोपिले ॥२४॥॥अभंग॥ गुरुत्व वाहोन राखों नेणे क्रम । स्तोमामाजी भ्रम पैसावेल ॥१॥बेबंद जालिया न घडे सार्थक । होय ठाऊक अपमान ॥२॥यालागीं सीक्षेच बळ संपादीजे । नांव न घेईजे नाहींतरी ॥३॥कानकोंड होतां न मानिती कोणी । यालागीं करणी व्हावी चांग ॥४॥सर्वा वळुं जाणे ठावा सर्व वर्म । ज्याला आत्माराम साह्य सदा ॥५॥॥वोवी॥ ऐका मतिमंदु येक ग्रहस्थ । आर्जितु गुरुसेवा बोधानिमित्य । शेष विडेचा देतां तयात । योग्यवंत योगी जाला तो ॥२५॥॥अभंग॥ सर्व रुचिकर साखरचे फळ । अमृत रसाळ सदा मिष्ट ॥१॥तैसे पुण्यपुरुष लीळा सर्वगोड । भक्तासी सुघड फळदाये ॥२॥कर्तृत्व तयाचे सर्व ही योग ची । धन्य सत्ता त्याची उत्धारक ॥३॥वांया तीळ मात्र न जाय सन्नुता । आत्मारामदाता वश्यगुणें ॥४॥॥वोवी॥ आणिक ऐका भक्तिचरित्र । मारुतीरायांनीं केलें विचित्र । लिंगंमा लिंगप्पा चितापुरकर । आसस्तां नाघोरीं सणार्था ॥२६॥भाउबंदांनीं निंदिती पतिला । निगुरी पशु हा भवी आंधळा । ऐकोन सतीतें अनुताप आला । गेले वधुवर स्वस्थळासी ॥२७॥न गवसती शोधितां योग्य संताला । माहेर गुरुजागा नावडे तिजला । नेमुनिया शिवरामस्वामिला । यावें तरि गांवीं नाहींत ॥२८॥करित अध्यासु राहिले ठिकाणीं । प्राणोदार हो पाहतां येक्यांदिनीं । उपदेश दीधला पावोन स्वप्नीं । खुणाविती येरुयेरा ॥२९॥ते स्मरत आसतां अंतर्यामीं । पुढें बहु दिवसां पातले स्वामी । कर्तृत्व जे आसे सिष्यधर्मी । वर्तो लागले तैशा ची ॥१३०॥कळऊन स्वामीला वर्तमान । साहित्य केलें करुं पूजन । जाले उपदेशी प्रत्यक्षविधान । असती परमार्थी सादरें ॥३१॥सद्गुरुकृपेच लेऊन भूषण । पतिसहा माहेरा आली मानें । ऐकोन तीयेच प्रत्ययज्ञान । ग्रहस्थ सर्व पायां लागले ॥३२॥आणवोन तेथें गुरुरायात । पूजा करविली पितियाहातें । राहिले आराधना होय परियंत । संतमहंतीं नवाजिलें ॥३३॥परि मागें पुढें बरळती निंदक । होती गुरुमार्गी निपुत्रीक रंक । तेणें बाईच उतरल मुख । वळखोन देशिक वर वोपिलें ॥३४॥येक पुत्र कां चौघे होती । सेवटवरी भोगिसी संपती । ऐकोन तयाची तोषली वृत्ती । तैस चि संसारी जाले सुखी ॥३५॥॥अभंग॥ धन्य गुरुभक्ती धन्य गुरुकृपा । मार्ग होय सोपा दोही लोकी ॥१॥देती जयालागीं मान ब्रह्मादिक । काय उणें सौख्य सांगा त्यासी ॥२॥परी नैराशता आवडे तयासी । सर्वदा मानसीं संतुष्टता ॥३॥प्रसन्न तयासी । आत्मारामदेव । मनोरथ पुरवाया ॥४॥॥वोवी॥ धन्य धन्य स्वामीची शांति ऐसी । मुडबळाची करुं कमाविसी । सिष्य येक नेमिला तयापासीं । गावगुंडयानीं सांगीतलें ॥३६॥काढुन तुह्माला दुसरा येणार । राजी रुजु तुह्मा आह्मी सर्वत्र । भीड तयाची न धरितां अणुमात्र । करोन निकुर पलवाव ॥३७॥सहवासाचा लागुनि दुर्गुण । सत्य चि वाटलें त्याचें बोलणें । तों अवचट स्वामीचें जाले येणें । पडले फिरोन गांवकरी ॥३८॥वळख न धरिलें प्यादडयानीं । विमृष न केले कारभार्यानी । भरभरुन बदुखा कोळियांनीं । बत्या द्यावया सिद्ध जाले ॥३९॥रंजक न लागे घाबिरे जाले । कांहीं सुचेना कापूं लागले । महंताचे हातपाय गळाले । निरखितां आलेति गुरुराज ॥१४०॥मारुताजवळी गुरुदयाघन । उतरले सिष्य तो पातला शरण । हात बांधलासे वाळल वदन । घाम सुटोन कांपतसे ॥४१॥पडला सन्मुखी दीर्घदंडवत । कंठ दाटलासे न निघे मात । द्रवले कृपेने सद्गुरुनाथ । अवस्था त्याची देखुनी ॥४२॥ऊठ जा ह्मणतिलें करी सयपाक । तो भावी तरलों मी गेला हरिखें । कांहीं न सीक्षितां जेऊनि देशिक । जाउनि उतरले चित्तापुरीं ॥४३॥मीनले तोषले भक्त सिष्यवर्य । साधुसंत तें केलें आश्चिर्य । धन्य शांत्यागरु सद्गुरुराय । दाविती उपाय तारक ॥४४॥॥पद॥ धन्य शांतिच । भूषण । लेइल तो सज्जन ॥धृ०॥ त्यागात्छांति हें हरिवाक्य । सर्वां दे बहुसौख्य ॥१॥सकळ ही साधनीं हें मुख्य । जग चि होय सख्ये ॥२॥हें ची निजधाम । विश्राम । भाळे आत्माराम ॥३॥॥वोवी॥ सर्वज्ञराजा होय गुरुराव । दाव ऐसा कीं यमांनीं भ्याव । राजे ही जी जी ह्मणावें भ्याव । अगुणी दडावें सांदितें ॥४५॥जयावरी भाळेल दयाळ । नांव तयाच न घे चि काळ । ऐकतां जयाच वाक्यरसाळ । संशयविटाळ न होये ॥४६॥अवरंगबादीं मराठा येक । सिष्य स्वामिचा परिस्त्रीलुब्धक । न दावी कवणा दारेच मुख । रखवालीमाजी रक्षितु ॥४७॥म्लान जरि जाल वनितातोंड । हृदय तयाच होय दुखंड । स्मरणास आलिया अन्नउदक गोड । न लागे पळतु अंत:पुरीं ॥४८॥बाप हो भाउ हो कां सखा होईना । कीर्तन कीं यात्रा पुजा सुवाष्ण्या । येवोत साधु कीं योगिराणा । ललना दृष्टीस न पडावी ॥४९॥घरद्वार आळिला करुनि गोषा । नरनारीस येवों नेदी सहसा । तीर बंदुख घेऊनि हमेशा । आर्डतु येत्या मारीन ॥१५०॥अवचट स्वामीच होतां आगमन । पातला पाणी जोडुन शरण । गुरुवर्या विदित तें वर्तमान । बाहतां प्रसन्न न होती ॥५१॥वदले उतराया न मिळे स्थळ । पराधेन सर्वाच होय देउळ । दुकानीं राणीं देतील सळ । चावडींत होईल उपद्रव ॥५२॥पराव्या घरीं येईल निमित्य । कचेरींत राहण नीच कृत्य । बंकात उतरण कारण फजीत । यास्तव पुढारी जाऊं दे ॥५३॥यापरी खोंचितां शब्दभाला । अनुताप आला क्रॄरशूराला । मानितु मम जन्मु वाया गेला । गुरुकृपासोहळा न भोगित ॥५४॥मग न बोलवें बोलिला सद्गदीत । अटकाव कायसा स्वामिरायात । हवेलींत उतरावें मंडळीसहित । संशयो किंचित न धरी मी ॥५५॥आरे संगीक ते नेणती मर्यादा । भीड कोणाची न धरिती कदा । जरि होता तयाला अपशब्दबाधा । मारुतीराय कोपेल । आत्मगोपाळ तो तुला ठाऊक । मोगलासि लाविल नाकखूणधाक । तेवि तूं क्रमि कांहीं येक । चुकतां पडसील संकटीं ॥५७॥लोक बहु येती आह्मासाठीं । अंत:पुरसदनीं होईल दाटी । किती लपोन राहव गोरटी । हद्दबद्द गोषाच राहीना कीं ॥५८॥गंहिवरुन येरु लागतां पाई । जावोन सकृपें उतरले गृहीं । बाहेरी राहिले सिष्यसांप्रदाई । आज्ञाप्रमाणें वर्तती ॥५९॥खर्चितां सिष्यांनीं तूप गूळ तीळ । न मनीच खेदू मराटा प्रेमळ । पदार्थनाशाची नसे तळमळ । येकदां बारसी दिनीं ऐका ॥१६०॥प्राणाहुती घेतल्यानंतर । आणिली भृत्यांनीं घृताची घागर । टाकीरे वदता उकरडयावर । तैसा चि केला भाविकांनीं ॥६१॥येकदां स्वामीच जाल स्नान । धोतरछयाटीच राहिले धुणें । तो मराठा येतां नेऊं नये तें आह्माकारण । तुम्हीं न धोवे मानस्थ पूर्ण । राहूं दे सिष्य येईजे तों ॥६३॥नमोन येरु कांतेस धाडुन । आणविला गांवाबाहेरी धुउन । स्वामिराज जाले प्रसन्न तेणें । स्थितिसंपन्न होठेला ॥६४॥प्रबोध ठसला जाला सर्वज्ञ । समजाउनिया वोपुनि वरदान । तारुन दंपत्या गुरुदयाघन । पुसोन सर्वत्रां चालिले ॥६५॥॥अभंग॥ धन्य गुरुराय स्नेहाळु कृपाळ । प्राकृतासि बळ तारिताती ॥१॥नानापरी श्रम भोगुनि आपण । लाविती साधन मान्य होउं ॥२॥अन्याय क्षमुनी वोपिती सौख्यासी । मानिती सिष्यासी जीवप्राण ॥३॥स्वात्मानंदभोग भोगविती सदा । जाणा त्याचा धंदा परमार्थ ॥४॥॥वोवी। सिष्यजनाच्या ईक्षतां वृत्ती । येकमेकी न माती न भीती । लपोन ठेविती चोरुन खाती । खबर न ठेविती सेवेची ॥६६॥आलस्यभेदाला करिती पाळण । निद्राक्षुधेच आवडे लालन । ऐस व्हावया ह्मणाल कारण । सर्दाराचेथें जंव पातले ॥६७॥उतरले बाहेरीं नावडे साधन । मिष्टान्नमेवेच होतसे सेवन । पाठांतर कीजे हें नसें चि भान । दावावें कोण भल्याला ॥६८॥मुख्य सद्गुरु सन्मुखी नसती । यास्तव भक्तीची विचळली वृत्ती । जाणोन गुरुराजा उतरले पर्वतीं । सेवा अनुदिनीं घडतसे ॥६९॥पात्र साहित्य तें कैंची सर्व । तुवां चंबुनें उदक आणाव । दूरदूर गांवाला भिक्षेसी जाव । सर्वदां तिष्ठावें दृष्टीपुढें ॥१७०॥तेणें तयाच उतरल मद । सर्वापरीनें जाले सावध । मग घेऊन तयाला करीत प्रबोध । येऊन स्वस्थळीं राहिले ॥७१॥॥पद॥ नाहीं वाढविला परमार्थ । तो गुरु काचा । स्वरुपीं न राहे निवांत ॥१॥धृ०॥ न लवी सिष्यासि साधन । क्रीया न दावी चालून । तो०॥२॥भलत्या भलतें चि वोपितो । भलतें भकोन शापीतो ॥तो०३॥सोय कळोन बोधीना । स्वहित होयाच साधीना ॥तो०॥४॥आत्मारामीं जो मीळेना । अहंता जयाची गळेना तो गुरु काचा ॥५॥॥वोवी॥ ऐसे निंद्य जे गुणाविरहित । शिवरामस्वामी दाता समर्थ । जयाचे सिरीं ठेविती हात । प्रबुत्ध होठाती तात्काळी ॥७२॥नागुरगांवीचा नारोपंत । नदीतटीं आसतां जपनेम साधित । प्रयोग आला तो स्मरतां गुरुत । न बाधितां उदकीं पडियला ॥७३॥येक सद्भक्तां घेरितां तस्करी । गुरुनाम स्मरिल तेणें वैखरी । भयानक दीसतां पळाले दुरी । घरासि पातला सुखरुप ॥७४॥उग्र जीवजंतू पिशाच्च व्याघ्र । रोगसंकटादि विघ्न अनिवार । न बाधिती जयाच नामस्मरणमात्रें । मोक्षादि संपदा लाभे कृपें ॥७५॥धन्य धन्य स्वामीच साधकपण । सर्वदां करिती दासकाव्यलेखन । दासबोधप्रती अकरा लिहून । भक्तसंतासी वोपिले ॥७६॥याही वेगळे नित्यशा लिहिण । नानापरीचे प्रबंदकवन । आस्थावंताला वोपिती कृपेनें । शाहणपण सिकविती बहुतांपरी ॥७७॥येकदां उत्सावीं मांडल संकट । परसैन्य पातल करीत लूट । यात्रा होपाहे भयानें फूट । जातां न जातां निर्व्हा नसे ॥७८॥संकट तयाच होऊं निरशन । येशास सर्वदां घडो निर्विघ्न । रामदूताच करुनि स्तवन । गाऊन सर्वत्रा ऐकविलें ॥७९॥॥पद॥ सत्यत्व भीम आमुचा साहकारी ॥धृ०॥ आम्ही आनाथ अपराधी । हीनदीन सर्वाबत्धी । आम्हा सांभाळी त्रीशुत्धी । कपीराज निर्धारी ॥१॥नाना संकटीं रक्षित । पूर्ण करी मनोरथ । निजभक्तासी तारीत । पवनात्मज वनारी ॥२॥सेवकाचें साभिमान । समर्थाच हें लक्षणें । उणें पडताची जाण । शब्द येईल त्यावरी ॥३॥राम वैकुंठासी गेले । दास मारुती निरविलें । माझें स्मरणीं रातले । त्यासी भवाब्धी उतरी ॥४॥राम भीम नाहीं भिन्न । तेचि कल्याण संपूर्ण । शीव तत्पदीं आपण । आत्मरुपीं विचारी ॥५॥॥वोवी॥ हे खालीं न पाडितां सद्भक्तवाणी । कटकासि फिरविल कपिवीरांनीं । धन्य स्वामीची अद्भुत करणी । न वानवे ची पवाडे ॥१८०॥बंधू स्वामीचा बावा भैरव । आंगीं आसोन महंतीशाहणीव । विघड न होववे करितां मनाव । हांसोन बोलिले तव इछा ॥८१॥इनाम दिधलें होऊं पोषण । चिंचनसूरगांवीं करविलें स्थान । पावत ते स्छळीं गौरव मान । राहिले कुटुंबवछळ ॥८२॥दुजा धाकटा कृष्ण बावा भाउ । आग्रह बहु करितां संग्रहीं राहु । विरक्तीच बिंबवोन गौरउ । वरयुक्त धाडिलें गंगाकडे ॥८३॥महंती करुन बहु तामशांत । मग मैसागांवजवळी सिराळ्यांत । समाधिस्त जाले पुण्यवंत । कीर्ति अपार वानिती ॥८४॥हें आसो येक शिष्याच सरल आयु । घटांमाजील निघाला वायु । गुरुतीर्थ वदनीं घालितां उपायु । जाला जीवला बहुकाळ ॥८५॥दाविती लीळा बहुत कांहीं । प्राकृत लोकांतें नुमजे सर्व ही । रामचंद्र वरपुत्रा सर्वदा ही । प्रतिपाळ केले प्रीतीनें ॥८६॥जेंवि यात्रेला जाऊनि समर्थ । खानदेशीं येक्या सदनांत । बैसले श्रीराम भजन करित । मूल तयाच निमाल ॥८७॥अन्याय जाला ह्मणती सर्व ही । रामनाम स्मरावें मरणसमई । जादुखोर हा दिसे गोसावी । प्राण बहुताचे खाईल ॥८८॥तेणें अनर्थ करुं पाहती । तंव छेडी सत्तेची जे होती हातीं । फिरवितां शवाला पावला मारुती । उठिल बाळ ते संतोषले ॥८९॥जे ते छडीची धरिती आस । ह्मणोन दहनीं केले अदृश्य । ते राख ही तारिले बहुतेकास । रामनाममहिमा वानिती ॥१९०॥समर्थसत्ता ते जनीं विशेष । तैसें चि क्रिडती सिष्य दाससिष्य । धन्य जे तयाची धरितील कास । तेही बहुतांस उत्धारिती ॥९१॥॥अभंग॥ दासपरब्रह्म देशी ब्रह्मदेव । जालों मी स्वमेव कीर्तिवानु ॥१॥चतुर्विधा भक्ती चतुर्विधा मुक्ती । तोंड न पुरती वानावया ॥२॥लीळा अनुक्रम हा ची सृष्टीक्रम । सार सर्व ब्रह्म साजे येथ ॥३॥नियंता उपाव वेद ते जाणीव । त्यांत अनुभव गुरुकृपा ॥४॥आत्माराम कृपें दाउनि सत्क्रिया ॥ जग तारावया योग केला ॥५॥॥वोवी॥ दासविश्रामधाम महिमा । न वानवे जेथील जाणता गरिमा । भक्तसखा जो आत्मयारामा । प्रियपात्र थोर होयील ॥९२॥इति श्री श्रीरामकृपा । तारकपरमार्थ सोपा । शिवाजीस्वामीचरित्र । सर्ग येकसे सतरा ॥ जयजयराम ॥११७॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP