मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन| गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे ऐतिहासिक पर्यालोचन सावर्ण्यचर्चा विराट पुरुष चातुर्वर्ण्याची स्थापना आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? संस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय संस्कारपध्दतीवर परिणाम गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर दोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्या पध्दतीतील गोष्टी भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध विवाहसंबंधची मनुषजातीपर्यंत व्यापकता स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत स्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे स्त्रीपुनर्विवाह पुनर्विवाहास वेदाधार आहेत पराशरस्मृतीचे महत्त्व धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती ‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे कित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ? गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे पोटविभागांचा क्रमश: विचार दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच स्त्रीधन इत्यादी विषय गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून, अगर नवीन ठरविला पाहिजे Translation - भाषांतर सदरील प्रश्नात दोन पोटप्रश्न आहेत. त्यांत पहिला प्रश्न गोत्रासंबंधाचा आहे, व त्याचे उत्तर म्हटले म्हणजे हे गोत्र अर्थात माहेरचे घ्यावयाचे की सारचे घ्यावयाचे, का दोन्ही गोत्रांपैकी पाहिजे ते घेणे हे ऐच्छिक समजावयचे, याचा निकाल लागला पाहिजे. पराशरस्मृती स्त्रीपुनर्विवाहास अनुकूल खरी, परंतु तिजमध्ये गोत्रव्यवस्थेबद्दल काही सांगितले नसल्यामुळे तिच्या आधारे प्रत्यक्ष विवाहकृत्य घडवून आणिता येत नाही, असा रूढिभक्तांचा या ठिकाणी एक कोटिक्रम होत असतो; परंतु त्या कोटिक्रमाकडे तादृश लक्ष देण्याचे कारण नाही. का की, प्रत्यक्ष वेदकाळी, व त्यानंतर पांडवांच्या काळी जर विधवांचे पुनर्विवाह धडधडीत होतच होते, तर त्या वेळी गोत्रासंबंधाची व्यवस्था कोन्ती तरी ठरलेली असलीच पाहिजे.तसेच पराशराने सांगितलेल्या आपत्तींच्या संख्येपेक्षा निराळ्या संख्या ज्या स्मृतिकारांनी सांगितल्या आहेत, त्यांच्या वेळीही या बाबतीत काही तरी ठरीव धोरन लोकप्रचारात चालत असेलच, व यावरून गोत्रसंबंधाचा निर्णय पराशराने सांगितलाच पाहिजे होता असे म्हणण्याचे कारन रहात नाही. ही व्यवस्था अगर धोरण यांचा शोध ग्रंथान्तरी लाविणे हे आपले कर्तव्य आहे, व तो न लागू शकेल तर याबद्दलचा निर्णय पुनरपि नवीन करून घेतला पाहिजे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP