मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन| आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ऐतिहासिक पर्यालोचन सावर्ण्यचर्चा विराट पुरुष चातुर्वर्ण्याची स्थापना आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? संस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय संस्कारपध्दतीवर परिणाम गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर दोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्या पध्दतीतील गोष्टी भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध विवाहसंबंधची मनुषजातीपर्यंत व्यापकता स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत स्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे स्त्रीपुनर्विवाह पुनर्विवाहास वेदाधार आहेत पराशरस्मृतीचे महत्त्व धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती ‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे कित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ? गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे पोटविभागांचा क्रमश: विचार दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच स्त्रीधन इत्यादी विषय आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली Translation - भाषांतर विश्वमित्र राजा मूळचा क्षत्रिय असता प्रसंगविशेषाने त्याला ब्राह्मणवर्णात येण्याची इच्छा झाली, व त्याच्या दीर्घ प्रयत्नांने ती अखेर सिध्दीसही गेली. ब्राह्मण होण्यासाठी त्याने भगीरथ प्रयत्न केले; परंतु दीर्घकाल चालत आलेल्या आनुवंशिक पध्दतीमुळे ब्राह्मणांना जातीमत्सर वाटून त्यांनी त्यास आपल्या वर्णांत येऊ दिले नसेल; किंवा कदाचित ब्राह्मणांचे गुण त्याच्या अंगी पूर्णपणे आले नव्हते, म्हणून वसिष्ठासारख्या शान्तिधन, ब्राह्मणाने त्याचे ब्राह्मणत्व कबूल करण्याचे नाकरलेही असेल. कसेही असो, विश्वामित्राचे ब्राह्मणत्व स्थापित होईपर्यंत त्याला दीर्घ प्रयास पत्करावे लागले, व अखेर त्याची निष्ठा, त्याचे आचरण, इत्यादि कारणांनी त्याच्या प्रयत्नास यश येऊन तो ब्राह्मण बनला हे निर्विवाद आहे.या उदाहरणावरुन इतके खचित सिध्द होते की, विश्वामित्राच्या वेळी आनुवंशिक वर्णपध्दती प्रचारात होती असे जरी मानले, तरी ज्या ठिकाणी खरे गुण व खरी कर्मे दृष्टीस पडली, त्या ठिकाणी प्रत्यक्ष वसिष्ठासारख्या परमपूज्य समाजनेत्यानेसुध्दा आनुवंशिक वर्णपध्दती एकीकडे ठेवून गुणकर्मानुसार वर्णपध्दतीचा अंगीकार केला. अर्थात अज्ञानी जन वर्णपध्दतीस आनुवंशिक किंवा कशीही मानोत; परुंतु जे खरे ज्ञाते, त्याच्या दृष्टीने मूळची खरी वर्णपध्दती म्हटली म्हणजे गुणकर्मानुसार व्यक्तिनिष्ठ अशीच होती हे नि:संशय आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP