मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन| या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे ऐतिहासिक पर्यालोचन सावर्ण्यचर्चा विराट पुरुष चातुर्वर्ण्याची स्थापना आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? संस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय संस्कारपध्दतीवर परिणाम गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर दोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्या पध्दतीतील गोष्टी भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध विवाहसंबंधची मनुषजातीपर्यंत व्यापकता स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत स्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे स्त्रीपुनर्विवाह पुनर्विवाहास वेदाधार आहेत पराशरस्मृतीचे महत्त्व धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती ‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे कित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ? गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे पोटविभागांचा क्रमश: विचार दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच स्त्रीधन इत्यादी विषय या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे Translation - भाषांतर वरील कलमावरून अगदी साध्या व सरळ वचनाच्या अर्थाची पुणे मुक्कामी कशी ओढाताण झाली हे स्पष्ट दिसून येते. या ठिकाणी ‘ पुणे ’ शब्दाचे म्हणून काही विशेष महत्त्व नाही. धर्मशास्त्रासंबंधाने कोठेही चर्चा झाली, तरी तेथे यासारखीच ओढाओढी, ताणाताण व झुंज चालते. ‘ नष्टे मृते ’ या वचनावरून झुंज झाली ती केवळ शास्त्राचा सरळ अर्थ सोडून देऊन स्वत:चा रूढिपक्ष कायम ठेविण्याकरिता ! हा पक्ष म्हणजे ( १ ) स्त्रियांना स्वातंत्र्य द्यावयाचे नाही, ( २ ) त्यांजवर कशीही आपत्ती कोसळली तरी त्यांना पुनर्विवाहाची परवानगी द्यावयाची नाही, व ( ३ ) फ़ारफ़ार झाले तर सप्तपदीच्या पूर्वी या आपत्ती आल्या असतील तरच स्त्रीचे लग्न पुन्हा केल्यास चाले, या तीन गोष्टी जुलमाने शाबीत करावयाच्या.तिसर्या गोष्टीत दिसणार्या परवानगीबद्दल शास्त्रीमंडळाचे आभार मानण्याची कल्पना कोणी मनात आणील, तर तितकी खटपट करावयास नको. कारण ही भासणारी मेहेरबानी पाच आपत्तीपुरतीच आहे, पण शास्त्राच्या दृष्टीने या पाचांहून आणखीही निराळ्या आपत्तींमुळे लग्न मोडण्याचा प्रसंग आला, तरी स्त्रीला राजरोसपणे दुसर्या पुरुषाशी लग्न लाविता येते, व मेहेरबानीची जरूरच पडत नाही ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP