मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन| स्त्रीपुनर्विवाह ऐतिहासिक पर्यालोचन सावर्ण्यचर्चा विराट पुरुष चातुर्वर्ण्याची स्थापना आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? संस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय संस्कारपध्दतीवर परिणाम गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर दोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्या पध्दतीतील गोष्टी भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध विवाहसंबंधची मनुषजातीपर्यंत व्यापकता स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत स्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे स्त्रीपुनर्विवाह पुनर्विवाहास वेदाधार आहेत पराशरस्मृतीचे महत्त्व धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती ‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे कित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ? गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे पोटविभागांचा क्रमश: विचार दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच स्त्रीधन इत्यादी विषय स्त्रीपुनर्विवाह प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर पुनर्विवाहाच्या प्रश्नाचा इतिहास Translation - भाषांतर स्त्रीवर्गाची स्थिती सुधारण्यासंबंधाने ज्या कित्येक गोष्टी आवश्यक असल्याचे प्रस्तुत कालच्या सुधारणावादी लोकांचे म्हणणे आहे, त्यामध्ये शिरोलेखात लिहिलेल्या विषयाचा समावेश होतो. या सुधारणा प्रश्नांचा मूळ आरंभ सुमारे ४० वर्षांपूर्वी बंगाल प्रांतात पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांजकडून झाल; व त्यानंतर काही काळाने कै. विष्णु परशुरामशास्त्री पंडित यांच्या प्रयत्नामुळे त्या प्रश्नाची भवति न भवति मुंबई इलाख्यात सुरू झाली. प्रारंभी प्रारंभी या कामी बरीच मोठ्या जोराची चळवळ होऊन विधवाविवाहोत्तेजक मंडळीची स्थापना झाली. यासंबंधाने भाषान्तररूपाने अग्र वादविवादाच्या रूपाने मराठी भाषेत व संस्कृत भाषेत कित्येक पुस्तकेही लिहिण्यात येऊन सन १८६० साली मुंबई मुक्कामी दाक्षिणात्य मंडळातील उच्च प्रतीच्या जतीत पहिला पुनर्विवाह लागला.पुनर्विवाह हे कृत्य सशास्त्र अगर अशास्त्र कसेही असले, तरी रूढीच्या दृष्टीने पाहू जाणारास असंमतच असणार हे उघड आहे; तथापि या मंडळीने बाह्यत: शास्त्राचे कातडे अंगावर ओढून घेऊन, पुणे मुक्कामी श्रीमंत् शंकराचार्यांसमोर उभय पक्षांचे ५ - ५ पंच व वर एक सरपंच इत्यादी व्यवस्थेनुसार पुनर्विवाह सशास्त्र की अशास्त्र ठरविण्यासाठी वादाचा प्रसंग जुळवून आणिला. वादाच्या आरंभी कित्येक अटी ठरल्या होत्या, त्यांस अनुसरून या प्रश्नाचा निर्णय व्हावयाचा परंतु आयते वेळी काय गडबड झाली असेल ती असो, - मूळच्या अटीप्रमाने नुसत्या पंचांच्या बहुमतावरून निकाल होणे योग्य असता, व तशा प्रकारे पंचांचे लेखी स्वदस्तुरचे अभिप्राय तयारही असता, सरपंचांकडून निष्कारण निराळे निर्णयपत्र निघाले, व त्यास श्रींची संमती मिळाली.कसेही असो; या निर्णयास अनुसरून लोकसमाजाने पुनर्विवाह अशास्त्र ठरल्याचे मानिले, तरी विधिपक्षाच्या लोकांकडून त्याची सशात्रता सिद्ध झाली असे प्रतिपादन पुढेही कित्येक वर्षेपर्यंत होत राहिले होते. एकंदरीत त्या वेळी झालेल्या निर्णयाच्या परिस्थितीकडे लक्ष देता खरा प्रकार म्हटला म्हणजे पुनर्विवाह सशास्त्र की अशास्त्र हा प्रश्न संदिग्धच राहून गेला असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP