मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन| विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार ऐतिहासिक पर्यालोचन सावर्ण्यचर्चा विराट पुरुष चातुर्वर्ण्याची स्थापना आनुवंशिकतेची इच्छा साहजिक व क्षम्य आनुवंशिक की गुणधर्मानुसारी पध्दती श्रेष्ठ ? संस्कार पध्दती व तिची निकृष्ट स्थिती आनुवंशिक पध्दती अस्वाभाविक ग्रहाची होय संस्कारपध्दतीवर परिणाम गुणकर्मव्यवस्था अस्वाभाविक नव्हे कारणास्तव वर्णव्यवस्थेत फेरबदल आनुवंशिक वर्णपध्दती मागाहूनच झाली ’ जन्मना जायते० ’ वचनाचा सरळ अर्थ गुणकर्मपध्दतीवर अनवस्था प्रसंग व त्यास उत्तर दोन्ही पध्दतींचा विरोध, दुसर्या पध्दतीतील गोष्टी भिन्नदेशीयांशी अगर भिन्नराशीयांशी विवाहसंबंध विवाहसंबंधची मनुषजातीपर्यंत व्यापकता स्त्रीपुरुषांचे विवाहस्वातंत्र्य विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग या योगाचा फायदा बहुतेक अशक्यच कन्यास्वयंवर व कुटुंबाच्या धनावर कन्येचा हक्क कन्याशुल्काबाबत कायद्याची मदत स्त्रीपुरुषांचे विवाहोत्तर स्वातंत्र्य घटस्फ़ोट, काडीमोड टाळण्यास कायद्याची मदत स्त्रीसमाज सुधारणेस तयार नाही सुधारणा अपरिहार्य वाटण्याची चिन्हे स्त्रीपुनर्विवाह पुनर्विवाहास वेदाधार आहेत पराशरस्मृतीचे महत्त्व धर्मशास्त्राच्या वादांतील लपंडावाची ठरीव पद्धती ‘ नष्टे मृते० ’ वचनात झालेला लपंडाव या लटपटीत रूढिपक्षाचे मुद्दे कित्येक कोटिक्रम, व त्यांची उत्तरे पुनर्विवाहेच्छू स्त्रीचे गोत्र कोणते व दानाधिकारी कोण ? गोत्राचा निर्णय ग्रंथांवरून पाहिजे पोटविभागांचा क्रमश: विचार दानाधिकारी पूर्वीप्रमाणेच स्त्रीधन इत्यादी विषय विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर विवाहस्वातंत्र्यास अडचणी व प्रतिकार Translation - भाषांतर वरील कलमात लिहिलेल्या दोन्ही गोष्टींची इष्टता सिद्ध होण्यास उभयता वधूवरांची वयोमाने चांगली मोठी असून मनेही विद्येने चांगली सुसंस्कृत असली पाहिजेत हे स्पष्टच आहे. आजच्या स्थितीत दोन्ही गोष्टींत दोघांचेही पाऊल पडावे तितके पुढे पडलेले नाही, यामुळे तूर्त काही दिवस तरी सध्याचाच मार्ग चालू राहणे केवळ अपरिहार्य होय. अशा वेळी स्वत: मातापितरे अगर पालकवर्ग विचारी असतील, तर त्यांनी विवाह्य वरास अथवा वधूस केवळच स्वातंत्य न दिले, व त्यांचे मनोदय समजून घेऊन नंतर सारासार विचाराने स्वत:च्या हेतूप्रमाणे वर्तन केले, तरी ते गैर म्हणता येणार नाही. परंतु अशी मातापितरादी मंडळीदेखील सांप्रतच्या स्थितीत प्राय: दुर्मिलच आहे. कसेही असो, पुरुषवर्ग आणि स्त्रीवर्ग यांबद्दल निरनिराळा विचार करू गेल्या स्त्रियांपेक्षा पुरुषांस विवाहस्वातंत्र्य अधिक लवकर मिळू शकेल यात संशय नाही.पुरुषांची लग्ने लौकर होतात ती केवळ आईबाप इत्यादिकांच्या नुसत्या हौसेखातर होतात. याहून वस्तुत: त्यात निराळा अर्थ असत नाही. परंतु स्त्रियांचा प्रकार याहून निराळा आहे. त्याचे मुळाशी धर्मशास्त्राने घालून दिलेल्या नियमांमुळे उत्पन्न झालेली अडचण असून त्या अडचणीचे प्रस्थही रूढीमुळे फ़ारच वाढले आहे. या रूढीचे अतिक्रमण केले असता पित्यास पातक लागते असे शास्त्रकारांनी सांगितले असल्याने जनसमुदाय त्याला भितो हे साहजिकच आहे. तथापि त्यातल्या तात समाधानाची गोष्ट आहे ती ही की, पित्याकडून रूढीचे अतिक्रमण झाले असता होणार्या पातकची निष्कृती थोड्याशा प्रायश्चित्ताने होण्यासारखी असल्याचे त्या शास्त्रकारांनीच सांगून ठेविले आहे. असा ज्या अर्थी प्रकार आहे, त्या अर्थी शास्त्रदृष्टीचा हा पातकदोष काही काळपर्यंत पत्करण्याचे धैर्य कन्यापित्याच्या अंगी पाहिजे, व तेवढे तो दाखवील तर अखेर शास्त्राची मर्यादा कायम राहून वरील कलमात सांगितलेला हेतू पार पडण्यास तितक्या अंशाने आपोआप साधन होण्याजोगे आहे. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP