प्रासंगिक कविता - ब्रह्मपिसा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


पळा पळा ब्रह्मपिसा येतो जवळी । रामनामें हांक देऊनि डोई खांजोळी ॥धु०॥
वृत्ति शेंडी बंधनेंविण सदा मोकळी । संसाराची धुळी करुनी अंगीं उधळी ॥१॥
प्रपंच उकरडया-वर बैसणें ज्याचें । भोंवता पाळा फिरून पाहे जन अविद्येचे ॥२॥
धांवूनि बैसे उठोनि पळे दृश्य वाटतें अदृश्याचें । राहणें घेतां न चले कोणाचें ॥३॥
औट हात गज नवां ठायीं वितु-ळलें । दहावा ठाव म्हणोनि तेथें ठिगळ दिधळें ॥४॥
ऐसें मन हें चंचल वृत्तींत गुंतलें । परतोनि आलें म्हणऊनि जिवेंचि मारिलें ॥५॥
मीपणाचें शहाणपण जळालें माझें । कोण वाहे देहबुद्धिवस्राचेम ओझें ॥६॥
नलगे आम्हा मानपानाचें ओझें । तुझी शुद्धि घेतां गेलें मीपण माझें ॥७॥
आम्ही जन धन देखोनी वार करितों । आपण ऐसें म्हणउनी समज धरितों ॥८॥
आर्ते भेटों येती त्यांस वेड लवितों । रामीं रामदास ऐसें अबद्ध बोलतों ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP