मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता|

प्रासंगिक कविता - श्रेष्ठ यांस पत्र

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


सकल तीर्थांचें माहेर । सकळ गुणांचें भांडार । सकळ विद्यांचा सागर । स्वरूप तुमचें ॥१॥
तूं धीरपणें मेरू । तूं उदारपणें जळधरू । तूं गंभीरपणें सागरू । पीयूषाचा ॥२॥
तूं पवित्रपणें वैश्वानरू । तूं समर्थपणें ईश्वरू । तूं प्रतापाचा दिनकरू । धगधगायमान ॥३॥
तूं सकळ तीर्थांचें यथ । तूं उंच आकाश । तूं मायेचा मूळपुरूष । सकळकर्ता ॥४॥
तूं विष्णूचें मूलस्थान । तूं योगियांचें घ्यान । तूं वेदशास्रांचें मथन । सार वेदान्ताचें ॥५॥
तूं सकळ सत्तेचा साक्षी । अनंत माया तुझे कुक्षीं । तुमचें निजरूप लक्षी । ऐसा कवणू ॥६॥
झंझा -वायूसि आकळावें । गगन ओलांडूनि जावें । महातेजासि आच्छादावें । कवणे परी ॥७॥
सप्तपाताळां तळवटीं । एकवीस स्वर्गांचें शेवटीं । पवाड करीन ऐशीं पोटीं । हांव कैंची ॥८॥
वसुंधराही एकसरी । घालेनियां मस्तकावरी । अंतरिक्षगमन करी । ऐसा कवणू असे ॥९॥
आवरणोदकांचा अंत । कैसा घ्यावा तो अद्भुत । तुमचे स्वरूपाचा निश्चितार्थ कवण करी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP