मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता|

प्रासंगिक कविता - श्रेष्ठांस पत्र

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


सकळ तीर्थांचें सार । सत्यस्वरूप निर्विकार । तुमचें चित्त तदाकार । निरंतर ॥१॥
विमल ब्रह्मपरायण । सगुणभक्तिसंरक्षण विशेष वैराग्यलक्षण । तुमचे ठायीं ॥२॥
मुक्त क्तियेचा अनादरु । स्वधर्मकमीं अत्यादरु । आग्रहनिह्रहांचा विचारु । तोहि नसे ॥३॥
नसे कामनेचा लेश । जयंत्या पर्वांचा हव्यास । अंतरीं माने विशेष । हरिकथा निरूपण ॥४॥
तुमचें देह सार्थकाचें । सर्वदा परोपकाराचें । भगवंतें निर्मिलें बहुतांचें । समाधान ॥५॥
तुमचेनि वाग्विलासें । बहु पाखंड नासे । संशयातीस प्रकाशे । विमळवस्तु ॥६॥
सन्मार्गींचा कैपक्षी । अनमार्ग करणें अलक्षी । लोक पावती प्रत्यक्षी समाधान ॥७॥
दक्षता आणि चातुर्यता । व्युत्पन्नता आणि लीनता । उतमगुण सर्वज्ञता । तुमचे ठायीं ॥८॥
तुमचें स्वरूप वर्णवेना । म्हणोनि देहाची वर्णना । युक्त अयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP