मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता|

प्रासंगिक कविता - मारुतीची प्रार्थना

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


फणिवर उठवीला वेग अद्भूत केला । त्रिभुवन जनलोकीं कीर्तिचा घोप केला ।
रघुपति उपकारें दाटले थोरभारे । परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥१॥
सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड  झाले । कपिकटक निमालें पाहतां येश गेलें ।
परदळशरघातें कोटिच्या कोटि प्रेतें । अभिनव रणपातें दु:ख बीभीषणातें॥२॥
कपिरिसघनदाटी जाहली थोर दाटी । म्हणवुनि जगजेठी धांवणे चार कोटी ।
मृतविर उठवीले मोकळे सिद्ध झाले । सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणदाता । उठवी मज अनाथा दूर सारूनि व्येथा ।
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया । रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥
तुजविण मजलगिं पाहतां कोण आहे । म्हणवुनि मन माझें तूआझि रे वास पाहे ।
मज तुज निरवीलें पाहिले आठवीलें । सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ॥५॥
उचित हित करावें उद्धरावें धरावें । अनुचित न करावें त्वां जनीं येश ध्यावें ।
अघटित घडवावें सेवका सोडवावें । हरिभजन घडावें दु:ख तें वीघडावें ॥६॥
प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया । परदळ निवदाया दैत्यकूळें कुडाया ।
गिरिवर तुडवाया रम्य वेशें नटाया । तुजचि अलगडाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥
बहुत सकळ सांठा भागतों अल्प वांटा । न करित हित कांटा थोर होईल ताठा ।
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें । अनुदिन करुणेचें चिन्ह पोटीं वसावें ॥८॥
जलधर करुणेचा अंतरामाजिं राहो । तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हो ।
कठिणहदय झालें काय कारुण्य केलें । न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ॥९॥
वडिलपण करावें सेवका सांवरावें । अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।
निपटचि हटवावें प्रार्थिला शब्दभेदें । कपि घन करुणेचा वोळला राम तेथें ॥१०॥
बहुतचि करुणा ही लोटली देवराया । सहजचि कफ गेलें जाहली दृढ काया ।
परम सुख विलासे सर्वदा दास. नूसे । पवनज तनुतोषें वंदिला सावकाशें ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP