मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता|

प्रासंगिक कविता - मातुश्रीस पत्र

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


सकल गुणांचा निधि । निर्गुणाची कार्यसिद्धि । विवेकाची दृढबुद्धि । तुझोनि गुणें ॥१॥
तूं भवसिंधूचें तारूं । तूं भक्तांचा आधारू । तूं अनाथाचे अवसरू । वैष्णवी माया ॥२॥
तूं भावार्थाची जननी । तूं विरक्तांस जीवनी । तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ॥३॥
तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस । तुझेनि चुकती सायास । संसारींचे ॥४॥
तूं परमार्थाविषयीं आग्रगण । सद्रुरु दासांचें मंडण । समाधानाची खूण । अंतरीं वसे ॥५॥
सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर । धूर्त कुशळ अति सादर । परोपकारी ॥६॥
श्रीगुरुभजनीं तत्पर । स्वामिकृपा निरंतर । म्हणोनि शुद्ध क्तियेचा उद्धार तुमचे ठायीं ॥७॥
आत्मचर्चेसी मुगुटमणी । अत्यंत सादरता निरूपणीं । बोलणें अमृत वाणी । मृदु चचनीं ॥८॥
विवेकनिधि केवळ । अंतर शुद्ध निर्मळ । ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायीं ॥९॥
क्रियाशुद्धि निर्मळ मन । निरभिमानी परम सज्जन । निरंतर अनुसंधान । अंतरीं वसे ॥१०॥
भावार्थाचें आगरू । प्रबळ शांतीचा सागरू । पाहतां उपमे मेरू । तोही उणा ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP