प्रासंगिक कविता - उत्तर

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


चिरंजीव ते निश्चळ । निश्चळीं जाहलें चंचळ । चंचळीं जाणावा निश्चळ । निश्चळरूपी ॥१॥
सदासर्वदा निश्चळ । निश्चळींच पाहावें सकळ । सकळ पाहतां केवळ । आपणच वस्तु ॥२॥
वस्तुरूप आपण । अधिष्ठानीं पाहतां कोण । पाहतां पाहाणें ज्यालागून । ओचि तो आत्मा ॥३॥
आत्मारामीं आत्मा पहा । जाणूनियां सुखी हा । स्वानंदामृत सेवूनि पहा । निखिल निजरूपा ॥४॥
रूप तेंचि पाहतां सगुण । सगुण तेंचि आपण । आपणापरतें ज्ञान । वेगळें नाही ॥५॥
वेगळेपणें पहावें । मग तें वेगळेंचि जाणावें । मग मिळेना स्वभावें । मुक्त जैसा ॥६॥
म्हणून वेगळें न साहे । न साहे म्हणणेंचि बाह्मे । बाह्याबाह्य तें अबाह्य । जाण बापा ॥७॥
ऐसें जें अधिष्ठान । तेथें जावया जाण । जाण-जाणोनि परिछिन्न । आपणचि ॥८॥
शरण जावें सद्नुरूसी । म्हणजे कळे आपणासी । आपपर नाहीं त्यासी । दास म्हणे ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP