एकनाथी भागवत - श्लोक ३४ व ३५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


निःसङगो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रिय ॥३४॥

रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः ।

सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥३५॥

करुनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती ।

ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥२६॥

तेणें अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी ।

दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥२७॥

ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण ।

सर्वेंद्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥२८॥

तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन ।

शुद्धसत्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥२९॥

केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण ।

जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥४३०॥

मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद ।

ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्वबोध साधकां ॥३१॥

ऐसा उरला जो सत्वगुण । तो निवारावया साधन कोण ।

मी स्वयें सुखस्वरुप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥३२॥

गूळ गुळा गोडपणें पांगे । कीं दुधा दूढ गोड लागे ।

तैसा सुखरुप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥३३॥

ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्वगुण स्वरुपीं विरे ।

तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥३४॥

ऐसे निवारल्या तिनी गुण । केवळ उरे निर्गुण ।

तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP