एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


द्रव्यं देशः फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः ।

श्रद्धाऽवस्थाऽऽकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥३०॥

द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्दें वनग्रामभेद ।

फळशब्दें सुखउद्बोध । सत्वसंबंधविभागें ॥९३॥

काळशब्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नांव ज्ञान ।

कर्म म्हणिजे मदर्पण । कर्ता तो जाण असंगी ॥९४॥

श्रद्धाशब्दें आध्यात्मिकी । अवस्थाशब्दें जागरणादिकी ।

आकृतिशब्दें उपरिलोकीं । देवतादिकीं क्रीडन ॥९५॥

जो गुण वाढे देहांतीं । जेणें गुणें होय अंतःस्थिती ।

त्या नांव निष्ठा म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९६॥

भिन्न भिन्न भाग अनेक । किती सांगूं एकेक ।

अवघें जगचि त्रिगुणात्मक । जाण निष्टंक निजभक्ता ॥९७॥

संसार समस्त त्रिगुण । यांमाजीं मी अवघा निर्गुण ।

ते तुज कळावया निजखूण । गुणनिरुपण म्यां केलें ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP