मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
भैरव

भैरव

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


नटवर तो हर ध्यावा,

प्रभातकाळीं उठोनि आधीं त्रिभुवनजनक नमावा ध्रु०

जगदंगीं ज्यातें नटवाया

अघटितघटनासमर्थ माया

नटी नाचवी ज्याची जाया;

भावें भैरव गावा. १

अरुणरूपधर सूत्रधार जो

घालुनि कंठीं रत्‍नहार जो

पीतांबरधर करि विहार जो

उधळि गुलाल, भजावा, २

सूर्यचंद्र अगणित नक्षत्रें,

गिरि, सागर, तरु, असंख्य पात्रें

सजुनि नटे जो लीलामात्रें,

शिवसत्याचा ठावा. ३

अपूर्व सुंदर नाटक हें जग,

मांगल्याचें आगर सौभग,

कसें म्हणावें दुःखमूल मग ?

जयजयकार करावा ! ४

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति- भूपदंड

राग - भैरव

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - १५ डिसेंबर १९३३

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP