मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर इति श्रीमद्गुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायां यादवविजयो नामैकादशप्रसंगः ॥११॥वक्ष्यमाणश्लोकोत्तरार्धमासच्छायाव्याख्यानेन संबंध उच्यते ॥निजमंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऐकोनि विकळ पडियेला ॥३१५॥पांडुरवर्ण झाले डोळे । मुखांहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळें । गात्रें विकळ पडियेलीं ॥१६॥भीमकी अप्राप्तीचे बाण । हृदयीं लागले दारुण । घायेंविण घेतला प्रान । अकाळमरण वोढवलें ॥१७॥वोखतवाणें दिसे मुख । नाडी तुटल्या निःशेख । कृष्णधाकाची धुकधुक । हृदयामाजी उरलीसे ॥१८॥महाशब्द उठिला मंडपद्वारीं । मिळालिया नगरनारी । शिशुपाळमाता रुदन करी । कपाळ करीं पीटित ॥१९॥सिद्धि न पवेचि गे शोभन । वायां गेलें वरमायपण । अंबिका क्षोभली जाण । वराचे प्राण वांचोत कां ॥३२०॥थोर वोढवलें दुःख । न देखोंचि सुनमुख । बुडालें सोहळियाचें सुख । हरिखीं विख कालवलें ॥२१॥अगे हा रुक्मिया दुर्बुद्धि । न पाहेचि लग्नशुद्धि । मृत्युपंचकाचे संधीं । लग्नसिद्धि मांडिली ॥२२॥कृष्ण ज्योतिषी गे निका । वश्य नव्हे पांचां पंचकां । काळ साधिला नेटका । समय देखा तो जाणे ॥२३॥तेणेंचि साधिली गे वेळ । साधूनि नेली भीमकबाळ । आमुचेंचि करंटें कपाळ । आतां शिशुपाळ वांची कां ॥२४॥विलाप करूनि अनेक । सिंपिलें शिशुपाळाचें मुख । वारा घालिती एक । झाला नावेक सावध ॥३२५॥उठोनि बैसला एकसरें । श्वास घातला पैंसें थोरें । दुःख हृदयींचें नावरे । नेत्रद्वारें जळ वाहे ॥२६॥शिशुपाळासि आलें रुदन । नधरत चाललें स्फुंदन । धीरें आवरोनिया जाण । शहाणपण मांडिलें ॥२७॥नोवरी नेली रे सुंदर । पडिलें समर्थासि वैर । कृष्ण नेटका जुंझार । आणि बलभद्र महाबळी ॥२८॥हेचि दोघे नावरती । येर यादव ते किती । ऐसें विचारूनि चित्तीं । काय विरांप्रति बोलिला ॥२९॥सैन्यपाळणा पाळणा । घावो घातला निशाणा । रथ संजोगोनि आणा । रणाङ्गणा जावों वेगीं ॥३३०॥सन्नद्ध करूनियां दळ । रथीं चढला शिशुपाळ । नगरद्वारा आला भूपाळ । पुढें घायाळ भेटले ॥३१॥घायीं तुटले सबळ । रुधिरें झाले बंबाळ । बाण भेदले कपाल । वीर विकळ पडताती ॥३२॥वीरीं घेतले घायावारें । म्हणती पळा रे पळा रे । मारिले जाल भलभद्रवीरें । साह्य दुसरें कोण्ही नाहीं ॥३३॥एकीं घेतला भेदरा । कांपताती थरथरा । मारूं नको गा बलभद्रवीरा । दास डिंगरा आम्ही तुझे ॥३४॥एकाचें तुटले पैं हात । एकीं विचकिले पैं दांत । एक कण्हत कुंथत । तवा देत पैं एक ॥२३५॥एक घायीं जर्जर बहुतें । एकाचे मोडिले जी हाते । एकाचीं लोंबताती आंतें । घाईं कोंतें अडकलीं ॥३६॥एक रडत पडत । एक अत्यंत चरफडीत । एक पाणी जी मागत । खुणा हातें दाऊनी ॥३७॥मस्तक फुटोनि वाहे रुधिर । एकाचें अर्ध तुटलें शिर । एकाचे घाईं बुडाले तीर । तेणें वीर तळमळती ॥३८॥भले गौरविले वर्हाडी । थितीं गेलीं लेणीं लुगडीं । एके नांगवीं उघडीं । मेलीं मढीं वोढिती ॥३९॥घायाळ घालूनि वोढणी । धनुष्यदंडाच्या आडणी । उचलोनि दोघीं जणीं । वीरश्रेणी आणिल्या ॥३४०॥एक मार्गीं झाले पुरे । एकाचे आनिले खटारे । वीर आटिलेजी वीरें । बलभद्रें मारिलें ॥४१॥राजे खोंचले मुकुटाचे । अत्यंत प्राण विकळ त्यांचे । सेवक उचलिती पायांचे । ढाले मोरकुंचे वीजिती ॥४२॥देखोनि दचकला शिशुपाळ । धाकिन्नलें त्याचें दळ । राजे मारिले सबळ । प्रबळ बळ यादवांचें ॥४३॥युद्धीं झाले पराड्मुख । राजे भंगले अनेक । आले जरासंधादिक । मोडले कटक घेवोनी ॥४४॥दुःखें मुख काळवंडलें । दोन्ही ओंठ जी वाळले । लाजा न बोलवे बोलें । तें देखिलें जरासंधें ॥३४५॥भेटला शिशुपाळ सम्मुख । अत्यंत कोमाइलें मुख । बुडालें सोहळियाचें सुख । हृदयीं दुःख भीमकीचें ॥४६॥शिशुपालं समभ्येत्य हृतदारमिवाऽऽतुरम् ।नष्टत्विषं गतोत्साहं सुष्यद्ग्वदनमब्रुवन् ॥११॥भो भोः पुरुषशार्दूल दौर्मनस्यमिदं त्यज । न प्रियाप्रिययो राजन्निष्ठा देहिषु दॄश्यते ॥१२॥यथा दारुमयी योषिन्नृत्यते कुहकेच्छया ।एवमीश्वरतंत्रोऽयमीहते सुखदुःखयोः ॥१३॥मग म्हणे पुरुषपंचानना । व्यर्थ खेद कां करिसी मना । प्राप्ताप्राप्तांची गणना । अधीन कोण्हा पैं नाहीं ॥४७॥संसार म्हणिजे खांबसूत्र । चौर्यांसीं लक्ष पुतळ्या विचित्र । त्यांचा सूत्रधारी ईश्वर । त्याचे इच्छे नाचती ॥४८॥आपण राहोनियां दुरी । हालवी प्राचीनाची दोरी । भूतें तंव तदनुसारी । निजव्यापारीं वर्तती ॥४९॥तेथ सुख दुःख निजतंत्र । मांडोनि ठेविलें स्वतंत्र । ते ते तिये गती पात्र । अहोरात्र होताती ॥३५०॥येथ यश आलियाचें सुख । अथवा अपयशाचें दुःख । अहंपणें मानिती मूर्ख । कर्ता देख तो नव्हे ॥५१॥ येथें कर्ता जो मी म्हणे । तो पडे सुखदुःखांचे नागवणे । जन्ममरणांसि आवंतणें । दिधलें तेणें सर्वथा ॥५२॥अहंकर्तेपणाचा भावो । तोचि सुखदुःखासि ठावो । जन्ममरणांचा निर्वाहो । येणेंचि पाहो होतसे ॥५३॥यालागिं अहंकर्तव्यता । तुवां न धरावी सर्वथा । भीमकीअप्राप्तीची व्यथा । दुर्गमता येवों नेदीं ॥५४॥शौरेः सप्तदशाहं वै संयुगानि पराजिथ ।त्रयोविंशतिभिः सैन्यैर्जिग्य एकमहं परम ॥१४॥म्यांचि पाहें पां केवळ । तेवीस अक्षौहिणी दळ । युध केलें सत्रा वेळ । एक वेळ जय आला ॥३५५॥तथाऽप्यहं न शोचामि न प्रहृष्यामि कर्हिचित् ।कालेन दैवयुक्तेन जानन्विद्रावितं जगत् ॥१५॥भंग झालियाचें दुःख । अथवा यश आलियाचें सुख । न मनूनियां मी देख । यथासुख वर्त्ततसें ॥५६॥एवं सुख दुःख जें आहे । तें तंव काळाधीन पाहें । तो काळ ज्यासि साह्य होय । तोचि लाहे यशातें ॥५७॥काळ होऊनि दैवयुक्त । सकळ जगातें विद्रावित । लाभ विषय हानि मृत्य । त्रिजगीं प्रपत तद्योगें ॥५८॥आजि तुज युद्धासि जातां । यश नये गा सर्वथा । काळ साह्य कृष्णनाथा । झाला तत्वता निजबळें ॥५९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP