भक्तवत्सलता - अभंग ६१ ते ६५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


६१.
हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥
म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवा चालली । मागें विठ्ठल माउली ॥३॥
६२.
पुंडलिकापाशीं ।  नामा उभा कीर्तनासी ॥१॥
येऊनियां पांडुरंगें । स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥
गाऊं लागे बरोबरी । नाहीं बोलायाची उरी ॥३॥
स्वर देवाचा उमटला । दासी जनीनें ओळखिला ॥४॥
६३.
ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥
आपण वैकुंठींच नसे । भक्तापासीं जाण वसे ॥२॥
जनी म्हणे कृपानिधी । भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥
६४.
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करी ॥१॥
राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥२॥
सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥
६५.
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥
हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥
जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP