भक्तवत्सलता - अभंग ५२ ते ५५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५२.
एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं उभा कोण आहे ॥२॥
प्रभा घरांत दाटली । एक सराद सुटली ॥३॥
एकमेकां आलिंगन । नामा म्हणे जनी धन्य ॥४॥
५३.
जनी जाय पाणीयासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥
पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥
पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥
धुणें धुऊनियां आणी । म्हणे नाम याची जनी ॥४॥
५४.
शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥
बुद्धि सांगे राजाईसी । तुम्ही न छळावें नाम्यासी ॥२॥
अवघ्या वित्तासी वेंचावें । सरल्या मजपासीं मागावें ॥३॥
विठ्ठलशेट नाम माझें । नामयाला सांगावें ॥४॥
आतां उचित दासी । ऐसें बोले राजाईसी ॥५॥
ऐसे बोलोनियां गेला । म्हणे जनी नामा आला ॥६॥
५५.
नामदेवाचे घरीं । चोदाजण स्मरती हरी ॥१॥
चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायण ॥२॥
आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP