श्रीविठ्ठलमाहात्म्य - अभंग ८७

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


८७.
पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥
तया पंचक्रोसी म्हणती मरावें । मरोनियां व्हावें जीवन्मुक्त ॥२॥
नको गा विठोबा मज धाडूं काशी । सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥
मरचीमात्र वेरण स्तंभीं घाली । घालोनियां गाळी पापपुण्य ॥४॥
जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥
आई आई बाबा म्हणती काय करूं । ऐसें दु:ख थोरू आहे तेथें ॥६॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥
लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील र्‍यातना नको देवा ॥८॥
न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादु:खें ॥९॥
अमरादिक थोर थोर भांबातले । भुलोनियां गेले मुक्तीसाठीं ॥१०॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरीं । आणि भीमातीरीं मोक्ष आला ॥१२॥
सख्या पुंडलिका लागतांचि पाया । मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥
घर रिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥
मोक्ष सुखासाठीं मुक्ति लोळे । बीं नेघे कोणी कदा काळीं ॥१५॥
मोक्ष मुक्ति जिंहीं हाणितल्या पायीं । आमुची ती काय धरिती सोय़ी ॥१६॥
समर्थाचे घरीं भिक्षा नानापरी । मागल्या पदरीं घालिताती ॥१७॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सांराजाचें सुख तुझें ॥१८॥
जनी म्हणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP