ह्याळसेन कथा - अभंग २५१ ते २८२

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


धगधगीत तत्क्षणीं । शस्त्र आलें गगनींहुनी । तें हाणितले गदे करुनी । थोर निघातें ॥२५१॥
घायें उसळला बाण । गेला र-विमंडळा भेदून । पुनरपी मावळतां दीन । उतरलें भूमी ॥२५२॥
रणीं भीडता महावीरं । द्यावो लागला पाठीमोरा । बाण खडतरल सामोरा । ह्लदयावरी ॥२५३॥
बाण ह्लदयीं खडतरला । मूर्च्छागतु भूमीं पडला । जैसा मेरु उलंडला । पृथ्वीवरी ॥२५४॥
रामकृष्ण गोविंद ह्मणत । धरणीं झाला मूर्च्छागत । ह्लदयीं आला श्रीअनंत । अविनाश मूर्ती ॥२५५॥
काळें सलिला महाकाळू । कीं सागरें दा-हिला वडवानळू । कीं उलथला भूमिगोळू । येरी वाही ॥२५६॥
तैसा उलंडला धरणी । हाहा:कारू झाला सैनीं । एकटाळी आ-रणीं । गर्जिन्नलीं ॥२५७॥
तंव ह्माळसेनाचे वीर । विधितलें समोर । जैसे वर्षताती जलभर । प्रळयकाळीं ॥२५८॥
ब्रह्मशस्त्राचा प्रतापू । वरी द्रोणाचार्याचा कोपू । रणीं मालविला दिपू । अर्जुनाचा ॥२५९॥
सूर्योदय होउनी मावळला । त्रैलोक्या अंधार पडिला । तैसा पां-डवकुळीं झाला । अंधकारू ॥२६०॥
वीर चालिले थोर रणीं । तेही भंगीलिया आरणी । कौरव गेले पळोनी । मेळीकारा ॥२६१॥
मग तेहि सैन्यकीं वीरीं । ह्याळसेनु घातला रथावरी । वेगीं आले मेळीकारीं । पांडवाचे ॥२६२॥
आणुनी घातला श्रीकृष्णाचे चरणीं । तो पांडवीं देखिला नयनीं । आंग टाकिलें धरणीं । पांचही जणीं ॥२६३॥
तंव ह्माळसेनु सावधु झाला । तेणें । श्रीकृष्ण विनविला । च-रणीं स्थापावें घननीळा । कृपानिधी ॥२६४॥
आजी पितयाच्या काजा । प्राणु वेंचला माझा । अंतकाळीं वैकुंठ राजा । भेटला मज ॥२६५॥
आजी धन्य मी ये सृष्टीं । मज जोडला जगजेठी । पावन झालों वैकुंठीं । कल्प कोटी ॥२६३॥
ऐसें बोलत बोलतां । प्राण गेला अवचिता । तें देखोनी पंडुसुता । दु:ख झालें ॥२६७॥
तंव बोले सारड्गधरू । याचा शोक नक करूं । तुह्मीं घ्यावा विचारू । अंतर्गतू ॥२६८॥
ब्रह्मशस्त्र दारुन । घेतें पांचा-जणाचे प्राण । तें झालें निर्माण । ह्माळसेनासी ॥२६९॥
यासी संस्कारू कीजे । ऐसें बोलोनी गरुडध्वजें । ह्मणे सकळ जनीं निधीजे । भागीरथीसी ॥२७०॥
तयासी संस्कारू करूनी । मग तिलांजुली देउगी । मेळीकारासी येउनी । रात्रीमाजी ॥२७१॥
पांडवासी दु:ख झालें । अन्न उदक वर्जिलें । पाहा वो कैसें झालें । ह्माळसेनासी ॥२७२॥
मग बोलिले नारायण । धन्य या कौर-वांचें जिणें । नित्य होताहे संहारणें । महावीरांचें ॥२७३॥
मागुते संग्रामी येती । परी साभिमानु न सांडिती । तुह्मी वांयांविण चित्तीं । दु:ख धरितां ॥२७४॥
कर्वतु जातसे सैरा । परी कर्वताती दोन्ही धारा । तैसा संग्रामु अवधारा । परस्परें ॥२७५॥
स्मशान वैराग्य धरणें । तरी कायसें राज्याचें कारणें । मागुता वनवासु सेवनें । साही जणीं ॥२७६॥
आमुची संगति ऐसी । जें दु:ख न धरावें मा-नसीं । ऐसें बोले ह्लषिकेशी । तयांप्रती ॥२७७॥
तंव भीम बोलिला वचनीं । हे सर्व माया तुझी करणी । जें जें असेल तुझ्या मनीं । तैसें वर्तूं आह्मी ॥२७८॥
तंव ह्माळसेनाचा वीरीं । तेंहि विनविला श्रीहरी । तूम आव्याप्पु मुरारी । परमपुरुषु ॥२७९॥
आतां आह्मां आशिर्वाद देणें । तुवां पांडवाचें साह्य करणें । अनाथांसी रक्षणें । तुझ्या चरणीं ॥२८०॥
मग तेहि आज्ञा घेऊनि । पांडवासी पुसोनि । मागा काय करील करणीं । नारायणू ॥२८१॥
नाना विष्णुदास विनवितु । तो लाघवी श्रीअनंतु । कौरवां करूनि नि:पातु । जय देणें पांडवां ॥२८२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP