अभंग - ६१ ते ७०

निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.

Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner.


६१

महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासुर निवटिला । म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥

मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा । विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥

जो तो जाउनी घातचि पावे । नये परतोनियां जीवें । यावरी आतां शरण जावें । कवणिया वीरा महीतळीं ॥३॥

तंव तो उठोनी अघासुर । करी रायासी जोहार । म्हणे न व्हावें चिंतातुर । विदया अपार मजपाशीं ॥४॥

राया तुझिया हितावरी । करीन गोकुळाची बोहरी । अवघेचि घालूनियां उदरीं । येईन कृष्णासमवेत ॥५॥

ऐसें तोषवूनियां राया । म्हणे गर्वारुढ । यावरी होऊनिया मूढ । काळासवें मांडूनियां होड । खेळों पाहे मश्यक ॥७॥

६२

येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रात:काळी । मिळले नंदाच्या राऊळीं । करिती जागे श्रीकृष्ण ॥१॥

दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हषिकेशी । पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥

काल बहुत श्रमला कृष्ण । वात्सेसीं करितां संघाटण । बळें वांचला सांगती जन केलें मर्दन मग त्याचें ॥३॥

तेव्हा कळला तो असुर । होउली वत्स आला क्रूर । कृष्णें ताडितां निशाचर । एक योजन पडियला ॥४॥

ऐकोनि म्हणती गोरक्ष । सत्वर पाठवीं यदुनायक । आम्ही जातों अवश्यक । पश्चिम दिशेसी सांगावे ॥५॥

मग ते हाकूनियां खिल्लारें । सवेग चालिले एंकाचि भारें । चौताळती गोधनें थोरें । आवेशेंसी धांवती ॥६॥

निळा म्हणे नेधती पुढें । अवघें पसरिलें ते जाभडें । तळी महीवरी जेवढें । मेघमंडपापर्यंत ॥७॥

६३

ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प । गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥

पुढे चालतां मार्ग न दिसे । अंध:कारी पडिलें ऐसें । मागे फिरावें तंव तो श्वासें । ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥

मग म्हणती येर येरासी । प्रात:काळींचि झाली निशी । गडदे पडिले न दिसे शशी । ग्रह तारांगणे ना भानु ॥३॥

पडिलों दरकुटिमाझारी । किंवा धुई दाटली भारी । अथवा मेहुडे आले वरी । कांवांहिंचि न दिसे न तर्क ॥४॥

जाभाडीं मेळविंता आघासुर परि मागें राहिला सारंगधर । म्हणोनियां तो झाला स्थिर । तयाहि सगट गिळावया ॥५॥

तव दिवस घटिका चारी । आला चढोनियां वरी । गाई गोवळे भिन्न अंधारी । पडिलीं अघासुरा पोटीं ॥६॥

निळा म्हणें यावरी आतां । जागृत झालिया कृष्णनाथा । पुढें कैशी वर्तली कथा ते परिसावी सात्विकीं ॥७॥

६४

कृष्ण बळराम उठिले । मुखमार्जनें सारिलें । तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठी ॥१॥

गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते । मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्नताटें ॥२॥

उभयतां जेऊनियां उठिले । गोपशृंगार आणविले । विचित्र चोळणे कसिले । काचे वेष्टिले सुरंग ॥३॥

शिरीं मोरविसा टोप । कर्णीं कुंडला तेज अमूप । केशर चंदनाचे विलेप । टिळे लल्ल:टी रेखियेले ॥४॥

गुंजाहार घातले कंठी । खांदी कांबळी हाती वेताटी । मोहरी पावा गांजिवा पावा गांजिवा पाठी । माजि दिव्यान्ने  भरियेलीं ॥५॥

दंडी रुमाल करीं कंकणे । पायी वाहाणा शोभलें लेणें । ऐसे चालतां अतिसत्राणें । पुढे अघयातें ओळखिलें ॥६॥

एक जाभाडें गगनावरी । दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी । गाई गोपाळ गेले भीतरीं । निळा म्हणे हें जाणवलें ॥७॥

६५

मग म्हणे गिळिले गोप । गाई खिल्लारांचे कळप । तारि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन सूड या सकळांचा ॥१॥

कृष्ण शिरतीं त्याच्या वदनी । अधासुरा हर्ष न समाय मेदिनी ।  म्हणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥

ऐसा आनंदला अघ । तंव लाघविया श्रीरंग । वाढला पाताळवरी स्वर्ग । नेदी जाभाडी मेळवूं त्या ॥३॥

नुगळवेचि तो उगळूं जातां । पुढेहि न चलेचि तत्वतां । फाडूनि वदन केल्या चळथा । व्दिभाग करुनि सांडियेले ॥४॥

तेणें उघडया पडल्या गाई । गोवळ म्हणती थोर नवाई । निमिषमात्रेंचि गेली धुई । पहारे स्मरणांचे खेवा । देखिला श्रीहरी दृष्टिपुढें ॥६॥

निळा म्हणे सांगती नवल । आजी अंधारिमाजी गाई गोवळ । पडिले होते आणि वायो प्रबळ । माघारेंही सरों नेदी ॥७॥

६६

मग होसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पे गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥

बरें झालें हातों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगे । पैल पहारे महाभुजंगे । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥

पहाती तंव भरोनियां दरा । पडिला वाहती शोणित धारा । म्हणती दाऊं वडिलांतें नवल हें ॥४॥

ऐंसा अघासुर मर्दिला । कृष्णें पवाडा हा केला । गोवळ नाचती विजयी झाला । श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥

कंसातेंहि विदित झालें । जाउनी वार्तिकीं सांगितलें । तेणें चपपक त्याचें गेंलें । म्हणे ओढवलें दुर्मरण ॥६॥

निळा म्हणे इकडे गाई । चरतां फांकल्या दिशा दाही । वळत्या करुनियां त्या लवलाही । आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥

६७

तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळां भुकेची झाली वेळ । मग पाहोनियां उत्तम स्थळ । सुरुतरु शीतळ छायातळीं ॥१॥

तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालूनियां खलती । कृष्ण म्हणे गाडियांपगती । शिदोया एकत्र कालवूं ॥२॥

गोवळ म्हणती बहुत बरें । कृष्णा तुझिया निजकरें । होईल अमृतचि तें दुसरें । जेवूं आदरें शेष तुझें ॥३॥

नारदें ते ऐकिलें कानीं । सांगे सत्यलोका जाउनी । ब्रम्हयातें म्हणें चक्रपाणी आजि ब्रम्हरस वांटितो ॥४॥

देवा जाऊनियां तेथें । शेष घ्यावेंजी कृष्णहातें । तरी हें पद राहेल निरुतें । नाही तरी अल्पायु ॥५॥

कृष्णशेषाचा हा महिमा । सांगतां अति निरुपमा । पावोनियां निष्काम कामा । पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥

निळा म्हणे नारदवचनीं । ब्रम्हदेव चािलिले तेथुनी । पाहाती तंव वृंदावनीं । गोवळ नाचती चौफेरीं ॥७॥

६८

मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं । कवळ त्यांचियें मुखों भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥

हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मंने । मग म्हणे हें सध्यास्नानें । काहींची न करिती गोंवळ ॥२॥

आम्ही याचें शेष घेणें । तैं ब्रम्हत्वा मुकणें । यज्ञी अग्रपूजेचें आवंतणें । कैंचे येईल मग आम्हां ॥३॥

यातें नाही यज्ञाचार । दीक्षा अथवा शिखासूत्र । आम्ही सोवळे  निरंतर । करुं उच्चारु वेदाचा ॥४॥

सोंवळें ओेंवळे नाही यांसी । केलें अपोषण्‍ कर्मासी । सेवितां याचिया उच्छिष्टासी । होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥

प्रायश्चितेंही घेतां । न फिटे विटाळ तत्वतां । ऐसें विचारुनियां विधाता । पालटी तत्वतां ब्रम्हपण ॥६॥

निळा म्हणे ज्याचा तया । संदेह बाधी त्या नांव माया । मग तो रुप पालटूनियां । झाला गोंवळ वेषधारी ॥७॥

६९

यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरी । करुनियां मोहरी करीं । कांठी कांवळा गांजिवा ॥१॥

उफराटी पडदणीं खेविली टिरी । सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी । दृष्टी चोरुनियां माझारी । माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥

येऊनियां कृष्णाजवळा । मुख पसरी इच्छूनि कवळा । तंव हा दावूनियां आणिका गोवळां । मुखीं भरी स्वानंदे ॥३॥

सर्वांग देखणा श्रीहरी । व्यापक सकळांचे अंतरी । ब्रम्हा पाडियला फेरी । नेदी शितंबोटी आतळों ॥४॥

म्हणे ठकूनियां घेऊ आला । कैसेचि अधिकारी तो झाला । नव्हे सोंगादिन मी दादुला । भंल कोणचा सांगाती ॥५॥

मग म्हणे वांकुल्या दावा यासी । न पवे भाग कृत्रिमवेषी । तुम्ही सेवारे सावकाशी । आजिचिया सुखासी पार नाहीं ॥६॥

ऐसे जेविले समस्त । ब्रम्हा राहिला टोकत । निळा म्हणे हा हदगत । जाणे सकळां अंतरीचें ॥७॥

७०

ब्रम्हा विचार करी मनी । ठकडा मोठा हा चक्रपाणी । आता येईल आंचवणी । तेथें उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥

एकांचे सीत उदंड याचें । पोट भरणें नाही साचें । वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥

तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण । आजिचिया जेवणा अंचवण । न घेई तो आम्हां सज्जन । जिवलग प्राण निजांचा ॥३॥

गोंवळ म्हणती भलाभला । मनींचाचि हेत जाणितला । आजीचिया धणी जो जो धला । तो तो पावला समाधीसुखा ॥४॥

ऐसें बोलानियां गोंवळ । बैसले आत्मस्थितीचि निश्रचळ । तंव ब्रम्हा डोहीं करी तळमळ । कां पां न येतिची आझुनी ॥५॥

मग डोकाउनी बाहेरी पाहें । मागुती जळी लीन होये । म्हणे मी ब्रम्हा आणि विचंबला ठाय । धिग महत्व ते माझें ॥६॥

चोरुनियां वत्सें गोंवळ । नेंऊ आडवूं हा गोपाळ । सत्ता बळें घेऊनि कवळ । मग ते देऊं याचें या ॥७॥

ऐसें विचारुनियां परमेष्टी । राहिला निश्रचळ कातरदृष्टी । निळा म्हणे हेंही जगजेठी । हदगत तयाचें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 21, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP