स्फुट श्लोक - श्लोक ५१ ते ५३

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


५१
प्रसन्न मुख सुंदरा । तुझेन हे वसुंधरा । धराधरें फणीवरे । तुलचि भाविलें खरे ॥१॥
कळेचिना तुझी कळा । श्रुती चतुर वीकळा । अनंत भाविनी लिळा । अगम्य तूचि नीवळा ॥२॥
तुझेनि सर्व बोलणें । तुझेनि सर्व चालणें । nतुझेनि योग धारणें । तुझेनि राजकारणें ॥३॥
तुझेनि नांव रूप हो । तुझें दिसे स्वरूप हो । विधी भुगोळचाळके । अनंत लोकपाळके ॥४॥
तुझीच चालते सता । बुझेले तोचि फुगता । तुझी करूनि आस तो । फिरे उदास दास तो ॥५॥
५२
प्रमाण बाण सोडिला । गिरी कठोर फोडिला । आराम रामतीर्थ हो । उदास पावले मोहो ॥१॥
बळ मळीत निर्मळे । वरी जळें सुसीतळें । सतंत वोघ वाहाती । कितेक लोक पाहाती ॥२॥
तरुवरी फळें फुलें । बहु निबीद दाटलें । रसाल वृक्ष डोलती । अनेक जीव बोलती ॥३॥
सदा अनानिळ सीतळु । सुखावळा पळेंपळु । स्वयें करील धन्य तो । भला जनासि मान्य तो ॥४॥
कितेक जीव जन्मले । तयामधें भले भले । धने समस्त वेचलें । विसंचितां विसंचलें ॥५॥
५३
वदे उदंड उत्तरे । परंतु कोणतें खरें । उगेचि वाउगेंचि तें । फटेल येर पोर तें ॥१॥
विनोदिया भरें भरें । उदंड उंच उत्तरें । तुरंग हस्त आणितो । मुखें जना नवाजितो ॥२॥
परंतु तें नव्हे खरें । उगीच पोच उत्तरें । विचार पाहातां कळे । भुलेनि जाति बावळे ॥३॥
धनेंचि निर्मितो कसा । दिसे बरा धणी तसा । पाहा पाहा बरें पाहा । भ्रमादिला प्रपंच हा ॥४॥
भ्रमासि भुलणें घडे । भलें चि वेसनीं पडे । विवेक शुध पाहिजे । तरीच देव लहिजे ॥५॥
उगीच चाकरी करी । अव्हा सव्हा भरे भरीं । धण्याकडे न पाहाणें । उगेचि वेर्थ राहाणें ॥६॥
उगाचि लौंद येरसा । निसंगळु गयाळसा । धणी निशाण चुकला । उदंड त्यास बुकला ॥७॥
धण्यासमागमें असे । मनोगत चि वीलसे ।  कदापि तो चुकेचिना । बहु जनीं तुकेचिना ॥८॥
धणी उरेल येकला । तरी अखंड टीकला । कुडी गळेल बापुडी । मनची जाये तांतडी ॥९॥
धन्यासी वेगळा नसे । जना धणीचसा दिसे । अभेद भक्त जाणिजे । खुणेसि खुण बाणिजे ॥१०॥
उदंड देव ते भले । उदंड भक्त शोभले । विवेक भक्त ता भला । येथार्थ वाक्य शोभला ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP