स्फुट श्लोक - श्लोक ६

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  



प्रचीत सप्रचीत रे । सुचीत सावचीत रे ।
तुलचि तूं न भावसी । तरी प्रचीत पावसी ॥१॥
समस्त संग सोडितां । प्रशस्त वस्त जोडितां ।
उरोन पाहासी किती । नुरोन राहासी रिती ॥२॥
विकारवंत जाणसी । खुणेसि खुण बाणसी ।
तुझीच तूज भावना । विचार येउं दे मना ॥३॥
समस्त संग सोडणें । परंतु हेत जोडणें ।
मनास वृत्ति नाडळे । तरीच पाहातां कळे ॥४॥
मनें मनासि जाणिजे । मनें खुणेसि बाणिजे ।
मनें मनासि कल्पना । पुसोन घे विकल्पना ॥५॥
उदास दृश्य वास तो । मनास भास भासतो ।
निसंग तो निरंजनी । मनास होय जन्मनी ॥६॥
न बोलणें न चालणें । न देखणें न चाखणें ।
न जाणतां न बाणतां । विकारवंत नेणतां ॥७॥।
विकारवंत लक्षितो । विवेक त्यास भक्षितो ।
अनंत संत वीवळा । विशाळ पंथ नीवळा ॥८॥
विकारवंत हेत रे । अहेत तो अहेत रे ।
गुणें गुणासि वारिलें । मनें मनासि सारिलें ॥९॥
बळेंचि वारिलें गुणा । पाहावयासि निर्गुणा ।
गुणात हेत वारला । अभेद भक्त थोरला ॥१०॥
विचार घे तदुपरीं । नसेल दुसरी सरी ।
विवंचना परोपरीं । अनंत हेत वीवरीं ॥११॥
विवेक हा पळेंपळु । उदास दास वीकळु ।
हरी पतीतपावनु । निरंजनी निरंजनु ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP