मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह ३|
नारद सांगे मृत्युलोकीं । ...

संत जनाबाई - नारद सांगे मृत्युलोकीं । ...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


नारद सांगे मृत्युलोकीं । हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥१॥

कैसा सत्त्वाचा समुद्र । ऐसा नाहीं नृपवर ॥२॥

नारदाची ऐकून गोष्‍ट । सुखावला तो वसिष्‍ठ ॥३॥

कोप विश्वामित्रा आला । कैसा वाढविता शिष्‍याला ॥४॥

तपतेजें सूर्यराशी । छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥

उदय पश्चिमे दिनकर । सत्त्व ढाळीना नृपवर ॥६॥

वसिष्‍ठाच्या ऐकुनी बोला । विश्वामित्रा क्रोध आला ॥७॥

जरी उतरेल माझ्या तुकीं । देईन आपुल्या तपासी ॥८॥

ऐसा दोघांचा संवाद । होतां उठला नारद ॥९॥

इंद्र म्हणे का निर्फळ । शब्दाशब्दीं वाढेल कळ ॥१०॥

ऐसें ऐकतां वचन । जनी म्हणे केलें गमन ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP